शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

‘गोकुळ’, ‘केडीसीसी’तील फॉर्म्युला बाजार समितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2015 01:07 IST

हालचाली गतिमान : संस्थाने ताब्यात ठेवण्यासाठी दोन्ही काँग्रेसची व्यूहरचना

राजाराम लोंढे / कोल्हापूर ‘गोकुळ’, ‘केडीसीसी’पाठोपाठ बाजार समितीतही दोन्ही काँगे्रसच्या ‘आघाडीचा फॉर्म्युला’ कायम राहण्याची शक्यता आहे. कोणत्याही परिस्थितीत आपआपली संस्थाने ताब्यात ठेवत शिवसेना-भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची खेळी बाजार समितीतही खेळली जाऊ शकते. त्यादृष्टीने हालचाली गतिमान झाल्या आहेत. पंधरा वर्षे राज्यात व दहा वर्षे केंद्रात सत्तेत राहत सहकारी संस्थांसह स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने एकमेकांविरोधात शड्डू ठोकले. सरकारमध्ये सत्तेत पण इतर निवडणुकीत दोन्ही काँग्रेसमध्येच कायम कुस्ती करत प्रत्येकाने आपआपली संस्थाने ताब्यात ठेवली. पण २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही कॉँग्रेसचे पानिपत झाले आणि युती सत्तेवर आली. संस्थात्मक पातळीवर युतीची ताकद नसली तरी सरकार हातात असल्याने दोन्ही काँग्रेसची गोची झाली. सरकारची ताकद वापरून प्रत्येक संस्थेत प्रवेश करण्याचा मनसुभा शिवसेना- भाजपचा आहे पण त्यांना संधी दिली तर आगामी सर्वच निवडणुकीत ती डोकेदुखी ठरू शकते, यासाठीच दोन्ही काँग्रेस नेत्यांनी सर्व मतभेद विसरून एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातूनच ‘गोकुळ’मध्ये काँग्रेसला बाय, जिल्हा बॅँकेत राष्ट्रवादीला बाय देऊन पद्धतशीरपणे युतीला बाजूला ठेवले. बाजार समितीसाठी येत्या आठ-दहा दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. समितीची निवडणूक शिवसेना-भाजपने ताकदीने लढविण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेसने सावध भूमिका घेतली आहे. ‘गोकुळ’, जिल्हा बँकेप्रमाणे येथेही आघाडी करण्याबाबत चाचपणी सुरू आहे. करवीर, पन्हाळा, गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड व कागल असे साडेसहा तालुक्यांचे कार्यक्षेत्र आहे. गेल्यावेळेला दोन्ही काँग्रेस स्वतंत्र लढली होती, त्यावेळी राष्ट्रवादी-जनसुराज्य पक्षाला १९ पैकी १७ जागा मिळाल्या होत्या. कॉँग्रेसला पणन प्रक्रिया व अडते-व्यापारी गटातील एक अशा दोन जागा मिळाल्या. विकास संस्था गटात अकरा जागा आहेत, येथे करवीरवगळता राष्ट्रवादी व जनसुराज्य पक्षाची ताकद आहे. ग्रामपंचायत गटात चार जागा आहेत, यासह पणन प्रक्रिया संस्थांमध्ये राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. अडते-व्यापारी, हमाल-तोलाईदार गटातील तीन जागा या पक्षापेक्षा व्यक्तीवर अवलंबून आहे. एकंदरीत विकास संस्था, ग्रामपंचायतमधील ताकद पाहिली तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, जनसुराज्य पक्ष एकत्र आले तर विरोधकांच्या हातात फारसे लागणार नाही हे निश्चित आहे. त्यादृष्टीने हालचाली सुरू आहेत.