शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

कारभार सुधारल्यास गोडवे, अन्यथा जोडे : उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 01:01 IST

कोल्हापूर / कोपार्डे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहीला व त्या कागदाला या राज्यात काडीचीही किंमत नाही. मग हे सरकार नेमकं कोण चालवतंय.

ठळक मुद्देसरकार नेमकं कोण चालवतंय? फडणवीस की चंद्रकांतदादातिहेरी तलाकचे विधेयक अधिवेशनात आणणार आहात, मग समान नागरी कायदा, राम मंदिराबाबत तुमची भूमिका काय?

कोल्हापूर / कोपार्डे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहीला व त्या कागदाला या राज्यात काडीचीही किंमत नाही. मग हे सरकार नेमकं कोण चालवतंय. चंद्रकांतदादा पाटील राज्य चालवतात का? असा सवाल करत सर्वच पातळीवर सरकार अपयशी ठरले असून अशावेळी सरकारची आरती ओवाळायची का? चांगला कारभार केला तर तुमचे गोडवे गाऊ, अन्यथा जोडे मारू, असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.

कुडित्रे (ता. करवीर) येथे शुक्रवारी सायंकाळी झालेल्या शेतकरी मेळाव्यात ठाकरे यांनी राज्य व केंद्र सरकारच्या कारभाराचे अक्षरश: वाभाडे काढले, कुठे आहेत अच्छे दिन?, १५ लाख सोडा १५ पैसे तरी सामान्यांच्या बँक खात्यात जमा झाले का? असा सवाल करत उद्धव ठाकरे म्हणाले, दिवसभर कोल्हापूर जिल्ह्यात फिरत असताना निवेदनांचा पाऊस पडत आहे. वीज, कर्जमाफी, हमीभाव, कीटकनाशक येथे शेतकºयांना मिळत नाही, येथे फक्त त्रास मिळत आहे.

दोन्ही काँग्रेसच्या काळातही संवादयात्रा काढली. त्यावेळच्या व आताच्या परिस्थितीत फरक दिसत नाही. केंद्रीय मंत्री वीज धोरणाबाबत तत्कालीन काँग्रेस सरकारवर टीका करत होते, आता काय परिस्थिती आहे. पंतप्रधानांनी ‘सौभाग्य’ योजना आणली, येथे शेतकºयांकडे वीज बिल भरण्यासाठी पैसे नाहीत आणि हे कनेक्शन मोफत देण्यास निघाले आहेत. कर्जमाफीचा तर फज्जा उडाला असून मुख्यमंत्री आकडा फुगवून सांगत आहेत. नोटाबंदीने दहशतवाद मोडला नाही तर वाढल्याचे सांगत ठाकरे म्हणाले, ऊस आंदोलन पेटले आहे, शेतकºयांच्या छातीवर गोळ्या झाडल्या जातात, शेतकºयांचा जीव एवढा स्वस्त झाला का? गोळ्या छातीवर न झाडता पायावर झाडण्याचा सल्ला रावसाहेब दानवे देतात. सत्ताधारी पक्षाचे असले प्रदेशाध्यक्ष असल्याची लाज वाटते.

इरिगेशन फेडरेशनच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी वीज दरवाढ अर्धी करण्याचा शेरा मारला, पण त्याची अंमलबजावणी झालीच नाही. शेतकºयांना त्रास देऊ नका, अन्यथा तो पिसाळून उठला तर तुमची किंमत दाखवून देईल. हिंदुत्व हे आमचे राष्टÑीयत्व असून त्यासाठीच भाजपसोबत आहोत. केवळ गायीला वाचविण्यासाठी नव्हे, तर शेतकºयांना वाचवणे हे आमचे हिंदुत्व आहे. तिहेरी तलाकचे विधेयक अधिवेशनात आणणार आहात, मग समान नागरी कायदा, राम मंदिराबाबत तुमची भूमिका काय? असा सवालही त्यांनी केला.

मेळाव्याचे संयोजक आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, शेती पंपांना रात्रीच्या वेळी वीजपुरवठा होत असल्याने शेतकºयांचा जीव धोक्यात आला आहे. धामणी प्रकल्पाची सुधारित मान्यता मिळाली पण अद्याप निधी मिळालेला नाही, त्यासाठी प्रयत्न करावेत. कोल्हापुरातून टोल हद्दपार करण्यात करवीरच्या जनतेचा मोठा वाटा असून फक्त पडद्यावर आलो नाही. आभार ‘कुंभी’चे उपाध्यक्ष दादासो लाड यांनी मानले. ‘कुंभी’च्या पहिल्या साखर पोत्याचे पूजन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संपर्क नेते खासदार गजानन किर्तीकर, खासदार विनायक राऊत, राज्यमंत्री विजय शिवतारे, मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव, अरुण दुधवडकर, संजय मंडलिक, प्रकाश आबिटकर, सत्यजित पाटील, सुजित मिणचेकर, संजय पवार, विजय देवणे, अजित नरके, संजय घाटगे, सर्जेराव पाटील आदी उपस्थित होते.नरकेंचे जोरदार शक्तिप्रदर्शनआमदार चंद्रदीप नरके यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. सभेला महिलांसह तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती. साखर कारखाना उत्तम चालविल्याबद्दल नरके यांचे कौतुक करीत, जंगली झाडे खूप वाढतात; पण फळे देणारी व कीड न लावणारी झाडे निर्माण केली पाहिजेत, ते काम चंद्रदीप यांनी केल्याचे ठाकरे यांनी सांगितले. 

अपशकुन नको म्हणून पाठिंबादोन्ही कॉँग्रेसना कंटाळून जनतेने आम्हाला साथ दिली. त्यामुळे अपशकुन नको म्हणूनच भाजपला पाठिंबा दिल्याचे सांगत लोकसभेला नेमके काय बिनसले आणि युती तोडली हे कळले नसल्याचे ठाकरे यांनी सांगितले. 

हार्दिकने गुजरातमध्ये फोडला घाम...गुजरातमध्ये हवा टाईट आहे. अटीतटीची लढाई आहे. हार्दिक पटेलने तिथे भाजपला घाम फोडला असून, पंतप्रधानांना ५० सभा घ्याव्या लागत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.शरद पवार यांच्यावर निशाणाशरद पवार यांना चोरून भेटलो नाही, आमचे उघड असते. होय, आम्ही सरकारवर नाराज आहोत; पण परवा तुम्ही मुख्यमंत्र्यांना कशासाठी भेटलात? मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीऐवजी शेतकºयांच्या प्रश्नांसाठी चर्चा केली असतीत तर ते बरे वाटले असते, अशा शब्दांत त्यांनी पवार यांच्यावर निशाणा साधला.मग मागेल ते देतो...कोल्हापूरकरांकडून खूप अपेक्षा आहेत. महाराष्टÑात शिवसेनेचा मुख्यमंंत्री करण्यासाठी अशीच साथ द्या. मग तुमच्या मनात जे आहे, जे मागाल ते देतो. आम्हाला जे जमते तेच बोलतो, असे सांगत मंत्रिमंडळ विस्तारात कोल्हापूरला संधी देणार नसल्याचे संकेत त्यांनी दिले.‘ईव्हीएम’मध्ये घोटाळाउत्तर प्रदेशात ‘ईव्हीएम’मध्ये घोटाळा केला, गुजरातमध्ये काय होणार? ही लोकशाही मानायची का? मतदान प्रक्रिया पारदर्शकपणे राबविली पाहिजे. माझे मत कोणाला दिले गेले हे मतदाराला कळले पाहिजे. त्यासाठी मतपत्रिकेवर मतदान घ्या, असेही ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :Politicsराजकारणkolhapurकोल्हापूर