शहरं
Join us  
Trending Stories
1
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
3
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
4
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
5
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
6
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
7
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
8
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
9
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
10
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
11
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
12
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
13
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
14
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
15
"उदय सामंतांसारखे खुर्ची पाहून पळून जाणारे ते नाहीत"; अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण
16
'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...
17
तपोवन वृक्षतोड प्रकरणी सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; बैठकीत काय चर्चा झाली?
18
"परीक्षेच्या चार दिवस आधी…" T20 वर्ल्ड कप तयारीच्या प्रश्नावर सूर्यानं दिला थेट शाळेचा दाखला
19
आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद दिलं तर काय करणार? भास्कर जाधव यांचं मोठं विधान, म्हणाले...
20
'सध्यातरी' शब्दात अडकले वडेट्टीवार; मग म्हणाले, "मुद्दाम बोललो..., जेलमध्ये जाईन, पण भाजपमध्ये जाणार नाही...!" नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

बकरी ईदची दुआ पूरग्रस्तांसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 17:06 IST

कोल्हापूरसह महाराष्ट्रावर आलेले महापुराचे संकट दूर व्हावे, पूरग्रस्त नागरिकांना लवकरात लवकर या अवस्थेतून बाहेर पडता यावे, अशी दुआ करीत मुस्लिम बांधवांनी सोमवारी बकरी ईदचे नमाज पठण केले. यानंतर अनेकांनी पूरग्रस्तांना धान्यासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

ठळक मुद्देबकरी ईदची दुआ पूरग्रस्तांसाठीमुस्लिम बोर्डिंगसह शहरातील मस्जिदींमध्ये नमाज पठण

कोल्हापूर : कोल्हापूरसह महाराष्ट्रावर आलेले महापुराचे संकट दूर व्हावे, पूरग्रस्त नागरिकांना लवकरात लवकर या अवस्थेतून बाहेर पडता यावे, अशी दुआ करीत मुस्लिम बांधवांनी सोमवारी बकरी ईदचे नमाज पठण केले. यानंतर अनेकांनी पूरग्रस्तांना धान्यासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.बकरी ईदनिमित्त सोमवारी सकाळी मुस्लिम बोर्डिंग परिसरात मौलाना मुफ्ती इर्शाद कुन्नुरे यांनी महाराष्ट्रावरचे पुराचे संकट दूर होऊ दे, अशी दुआ केली. यानंतर सर्व मुस्लिम बांधवांनी पूरग्रस्तांच्या निवाऱ्याच्या ठिकाणी खिरीचे वाटप केले व पूरग्रस्तांसोबत खीर खाऊन बकरी ईद साजरी केली.

यावेळी मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी, रफिक मुल्ला, फारुख पटवेगार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. दरवर्षी जिल्ह्यातील नेतेमंडळी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. मात्र यंदा अवघे कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी झटत असल्याने नेत्यांनीही येणे टाळत पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला.  शहरातील विविध मस्जिदींमध्ये नमाज पठण करण्यात आले.बकरी ईदला बकऱ्याची कुर्बानी देण्याची पद्धत आहे. मात्र हीच रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वापरण्यात यावी, असे आवाहन मुस्लिम बोर्डिंगने केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत दिवसभरात अनेक मुस्लिम बांधवांनी गहू, तांदूळ, साखर, चहापूड, तेल, साबण असे जीवनावश्यक साहित्य पूरग्रस्तांना दिले.

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरkolhapurकोल्हापूर