शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
9
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
10
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
11
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
12
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
13
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
14
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
15
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
16
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
17
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
18
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
19
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
20
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा

गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचा अपघात, एकाच कुटुंबातील तिघे ठार

By उद्धव गोडसे | Updated: November 23, 2023 08:39 IST

नीलू गौतम ( वय ४३), रिद्धिमा गौतम (वय १७) आणि  सार्थक गौतम (वय १३) अशी मृतांची नावे आहेत.

कोल्हापूर : गोव्याहून मुंबईला जाणारी व्हीआरएल ट्रॅव्हल्स गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास कोल्हापूर शहराजवळ राधानगरी मार्गावर पुईखडी येथे उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात पुण्यातील मांजरी बुद्रुक येथील एकाच कुटुंबातील तिघांना दुर्दैवी मृत्यू झाला. नीलू गौतम ( वय ४३), रिद्धिमा गौतम (वय १७) आणि  सार्थक गौतम (वय १३) अशी मृतांची नावे आहेत. तर चौघेजण जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, व्हीआरएल कंपनीची मुंबईला जाणारी खाजगी स्लीपर कोच बस बुधवारी रात्री आठ वाजता गोव्यातील पणजी येथून निघाली. गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास कोल्हापूर शहराजवळ पुईखडी येथे भरधाव बस उलटली. अपघाताची माहिती मिळताच कोल्हापूर महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे जवान, मुख्य अग्निशमन अधिकारी आणि करवीर पोलिस घटनास्थळी पोहोचले. 

तातडीने बचाव कार्य राबवून जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये पाठवले. बसखाली अडकल्यामुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला. बसमध्ये २५ प्रवाशी होते अशी माहिती अग्नी शामक दलाच्या जवानांनी दिली. चिफ फायर ऑफिसर मनीष रणभिसे, फायरमन प्रमोद मोरे, सौरभ पाटील, चेतन जानवेकर, युवराज लाड , प्रभाकर खेबूडे, अमित जाधव,  योगेश जाधव , संजय पाटील यांनी बचावकार्य राबवले.

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर