शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

दोन लाख द्या; कृषी पर्यवेक्षक म्हणून हवी तिथे बदली देतो, कृषी खात्यात बदल्यांचा बाजार  

By विश्वास पाटील | Updated: June 1, 2023 16:15 IST

पैशाच्या मागणीने अस्वस्थ झालेल्या काही कृषी सहायकांनीच ‘लोकमत’ला या मागणीबद्दल अत्यंत जबाबदारीने माहिती दिली

विश्वास पाटीलकोल्हापूर : राज्य शासनाच्या सेवेतील कृषी सहायकांनी स्वत: परिश्रम करून विभागांतर्गत परीक्षा दिली, त्याचा निकाल नुकताच लागला आणि आता त्यांना कृषी पर्यवेक्षक (सुपरव्हायझर) म्हणून पदस्थापना देताना सरासरी दोन लाख रुपयांची मागणी होऊ लागली आहे. या कर्मचाऱ्यांना विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातून फोन जात आहेत. बदल्याची मुदत वाढली तरी हे व्यवहार थांबलेले नाहीत.पैशाच्या मागणीने अस्वस्थ झालेल्या काही कृषी सहायकांनीच ‘लोकमत’ला या मागणीबद्दल अत्यंत जबाबदारीने माहिती दिली. राज्यात एकूण ७५० पदे आहेत. कोल्हापूर विभागात कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत मिळून ८२ पदे आहेत. त्यासाठी ४०० उमेदवारांनी परीक्षा दिली. खात्यांतर्गत सहायकांतून पर्यवेक्षक करण्यासाठी ही परीक्षा होती.सध्या कृषी सहायकांना २४०० रुपये ग्रेड पे मिळते. ही परीक्षा गुणवत्तेनुसार उत्तीर्ण झाल्यावर ग्रेड पे ४२०० रुपये होतो व भविष्यात मंडळ कृषी अधिकारी म्हणून पदोन्नतीची संधी असते. त्यामुळे या सहायकांनी कष्ट घेतले. चांगला अभ्यास केला. चांगले गुण मिळविले आणि आता पदस्थापना होताना पैशाची मागणी होऊ लागल्याने ते विषण्ण झाले आहेत.कुठेही करा बदली, आम्ही तिकडे जातो किंवा आम्हाला ते पदच नको, अशीही उद्विग्न भावना त्यातील काहींनी बोलून दाखविली. आंतरसहभागीय म्हणजे एका विभागातून दुसऱ्या विभागात यायचे असल्यास दोन्ही विभागांची ना-हरकत लागते. हे पत्र देण्यासाठी ५० हजार ते १ लाखापर्यंतची मागणी केली जात आहे.

कोण म्हणते पैशाची मागणी केली..

  • ‘लोकमत’ने कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार यांच्याशी संपर्क साधला. कृषी सहायकांतून पर्यवेक्षक म्हणून पदोन्नतीवर बदली करताना तुमच्या कार्यालयातील आस्थापना विभागाचे कर्मचारी कर्मचाऱ्यांकडे दोन लाख रुपयांची मागणी करीत आहेत, अशा तक्रारी ‘लोकमत’कडे आल्या असल्याचे त्यांना थेटच विचारले. त्यावर बिराजदार अगोदर हसले. ते म्हणाले, असा कोणताही प्रकार बदल्यांसाठी केला जात नाही.
  • पारदर्शकपणे आणि कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊनच हे काम सुरू आहे. मुद्दाम काम डिस्टर्ब व्हावे, यासाठी कोणीतरी हे सांगत असावे. तुमच्याकडे कोण, असे लोक आहेत का, अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर असे पाच-सहा लोक ‘लोकमत’ कार्यालयात येऊन गेल्याचे सांगितल्यावर त्यांनी तुम्ही त्यांना पैसे देऊ नका, असे सांगा, असे उत्तर दिले.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरagricultureशेतीCorruptionभ्रष्टाचार