शहरं
Join us  
Trending Stories
1
विकणाऱ्याला अटक, मग विकत घेणाऱ्याला का नाही?, अंबादास दानवेंचा पार्थ पवारांना अडचणीत आणणारा सवाल
2
पश्चिम बंगालमध्ये बाबरी बांधण्याची घोषणा केलेली; ममता बॅनर्जींनी आमदाराला पक्षातून निलंबित केले
3
High Tide Mumbai: चार दिवस समुद्राला मोठी भरती; साडेचार मीटरपेक्षा अधिक उंच लाटा
4
२८ वर्ष जुन्या मित्राला सोबत घेण्यासाठी भाजपाच्या हालचाली?; पुन्हा समीकरणे जुळवण्याची तयारी
5
VIDEO ...अन् रोहितनं केली रिषभ पंतची इच्छापूर्ती! पण हिटमॅननं काय विश मागितली असेल बरं?
6
OnePlus Ace 6T: 'इतकी' मोठी बॅटरी...! वनप्लसनं बाजारात आणलाय दीर्घकाळ टिकणारा फोन, किंमत किती?
7
"...तर शिवसैनिक तुम्हाला पळवून लावतील"; शिंदेसेनेचा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना इशारा
8
Dhule Crime: मौजमज्जा करण्यासाठी बी. टेकच्या विद्यार्थ्याने मित्रांच्या मदतीने स्वतःच्याच घरावर टाकला दरोडा; १० तोळे सोने चोरले
9
VIDEO: बाबाजी का ठुल्लू... विराट कोहलीचे मजेशीर हावभाव, विकेट पडताच मैदानात धमाल-मस्ती
10
सडकून ताप, अंगदुखी अन् अचानक मृत्यू! जंगलात राहणाऱ्या 'या' किड्याने घातला राज्यभरात धुमाकूळ
11
'सेन्यार'चा कहर थांबेना; थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया अन् श्रीलंका पूरामुळे बेजार! १४००हून अधिक लोकांचा मृत्यू 
12
महापालिका निवडणुकीच्या तयारीला झाली सुरुवात, नागपूर आणि चंद्रपूरसाठी नव्याने आरक्षण सोडत
13
भयंकर! "माझ्यापेक्षा सुंदर कोणीच असू नये"; ४ लहान मुलांना मारणाऱ्या सायको किलरचा पर्दाफाश
14
१० वर्षात १ कोटींच्या निधीचं स्वप्न पूर्ण करायचंय? जाणून घ्या दर महिन्याला किती करावी लागेल SIP
15
गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा
16
Sheetal Tejwani: पुणे पोलिसांनी अटक केलेली शीतल तेजवानी कोण? पार्थ पवारांच्या कंपनीसोबत केला होता जमिनीचा व्यवहार
17
इंडिगोची 'साडेसाती' संपेना... आज एकाच दिवशी तब्बल १००हून जास्त उड्डाणे रद्द, गोंधळ सुरूच
18
Sunny Leone : 'बेबी डॉल' झळकली शेतात; सनी लिओनीचे फोटो शेतकऱ्यांनी चक्क बांधावर लावले, कारण...
19
प्रणित मोरे 'बिग बॉस १९'चा विजेता? फिनालेआधीच हातात ट्रॉफी घेतलेला फोटो होतोय व्हायरल
20
कोण आहे 'ती' इराणी मुलगी; जिच्यावर अमेरिकेनं लावलंय हाफिज सईद इतकं इनाम!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीतील वंचितांना न्याय देऊ : सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 19:21 IST

परतफेडीच्या मुदतीवरून ऊस उत्पादन पट्ट्यातील प्रामाणिकपणे परतफेड करणारे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिल्याचे सरकारच्या लक्षात आले आहे. कर्जमाफीची ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेचच त्या शेतकऱ्याच्याबाबत निर्णय घेतला जाईल. कर्जमाफीत पात्र असलेला एकही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देजिल्हा बँकेच्या पुनर्गठीत लाभार्थ्यांसाठीही प्रयत्नशीलकर्जमाफीत पात्र असलेला एकही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाहीसोमवारपासून पुन्हा चावडी वाचन...त्यात कसली अब्रू जाते?

कोल्हापूर , दि. १८ :  परतफेडीच्या मुदतीवरून ऊस उत्पादन पट्ट्यातील प्रामाणिकपणे परतफेड करणारे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिल्याचे सरकारच्या लक्षात आले आहे. कर्जमाफीची ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेचच त्या शेतकऱ्याच्याबाबत निर्णय घेतला जाईल. कर्जमाफीत पात्र असलेला एकही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

कर्जमाफीच्या याद्या अपलोड करण्याचे काम पूर्ण झाले असून आयुक्त कार्यालयाकडून त्याची छाननी होऊन त्या अंतिम मंजुरीसाठी तालुकास्तरीय कमिटीकडे पाठविल्या जाणार आहेत. या याद्या पोर्टलवर प्रसिद्ध करून शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे वर्ग केले जातील.

ऊस पट्ट्यातील परतफेडीचा कालावधी व कर्जमाफीचे निकष यामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत जिल्हा उपनिबंधकांनामार्फत सविस्तर अहवाल मागविला आहे. त्यावर उच्चस्तरीय कमिटी निर्णय घेणार आहे, शेतकऱ्याची अडचण सरकारच्या लक्षात आल्याने त्याही शेतकऱ्याना कर्जमाफीचा लाभ मिळेल.

केंद्राच्या कर्जमाफीतील अपात्र ११२ कोटींचे पुनर्गठन व राज्य सरकारची कर्जमाफीचा पेच निर्माण झाल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे म्हणाले, हे कर्ज सन २००९ पूर्वी घेतल्याने अडचणी आहेत, पण त्याचे पुनर्गठन सन २०१२ झाल्याची नोंद सहकार विभागाने घेतली आहे, याबाबतही लवकर निर्णय होईल. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक धनंजय पाटील, रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटील आदी उपस्थित होते.

सोमवारपासून पुन्हा चावडी वाचनमध्यंतरी झालेल्या चावडी वाचनात ५८७ हरकती आलेल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे होऊ न शकलेल्या चावडी वाचनाचा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. सोमवार (दि. २३) पासून उर्वरित गावांत वाचन केले जाणार असल्याचे खोत यांनी सांगितले.

...त्यात कसली अब्रू जाते?चावडी वाचनाला राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी विरोध केल्याचे निदर्शनास आणल्यानंतर, खोत म्हणाले, कसली अपमानास्पद वागणूक, उलट त्यातून एखादा अपात्र ठरला असेल तर तो हरकत घेऊन पात्र ठरू शकतो. कर्ज घेतले, त्यातील काही थकले याचे वाचनाने अब्रू कसली जाते.

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Farmerशेतकरी