शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

कर्जमाफीतील वंचितांना न्याय देऊ : सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 19:21 IST

परतफेडीच्या मुदतीवरून ऊस उत्पादन पट्ट्यातील प्रामाणिकपणे परतफेड करणारे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिल्याचे सरकारच्या लक्षात आले आहे. कर्जमाफीची ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेचच त्या शेतकऱ्याच्याबाबत निर्णय घेतला जाईल. कर्जमाफीत पात्र असलेला एकही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देजिल्हा बँकेच्या पुनर्गठीत लाभार्थ्यांसाठीही प्रयत्नशीलकर्जमाफीत पात्र असलेला एकही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाहीसोमवारपासून पुन्हा चावडी वाचन...त्यात कसली अब्रू जाते?

कोल्हापूर , दि. १८ :  परतफेडीच्या मुदतीवरून ऊस उत्पादन पट्ट्यातील प्रामाणिकपणे परतफेड करणारे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिल्याचे सरकारच्या लक्षात आले आहे. कर्जमाफीची ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेचच त्या शेतकऱ्याच्याबाबत निर्णय घेतला जाईल. कर्जमाफीत पात्र असलेला एकही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

कर्जमाफीच्या याद्या अपलोड करण्याचे काम पूर्ण झाले असून आयुक्त कार्यालयाकडून त्याची छाननी होऊन त्या अंतिम मंजुरीसाठी तालुकास्तरीय कमिटीकडे पाठविल्या जाणार आहेत. या याद्या पोर्टलवर प्रसिद्ध करून शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे वर्ग केले जातील.

ऊस पट्ट्यातील परतफेडीचा कालावधी व कर्जमाफीचे निकष यामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत जिल्हा उपनिबंधकांनामार्फत सविस्तर अहवाल मागविला आहे. त्यावर उच्चस्तरीय कमिटी निर्णय घेणार आहे, शेतकऱ्याची अडचण सरकारच्या लक्षात आल्याने त्याही शेतकऱ्याना कर्जमाफीचा लाभ मिळेल.

केंद्राच्या कर्जमाफीतील अपात्र ११२ कोटींचे पुनर्गठन व राज्य सरकारची कर्जमाफीचा पेच निर्माण झाल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे म्हणाले, हे कर्ज सन २००९ पूर्वी घेतल्याने अडचणी आहेत, पण त्याचे पुनर्गठन सन २०१२ झाल्याची नोंद सहकार विभागाने घेतली आहे, याबाबतही लवकर निर्णय होईल. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक धनंजय पाटील, रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटील आदी उपस्थित होते.

सोमवारपासून पुन्हा चावडी वाचनमध्यंतरी झालेल्या चावडी वाचनात ५८७ हरकती आलेल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे होऊ न शकलेल्या चावडी वाचनाचा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. सोमवार (दि. २३) पासून उर्वरित गावांत वाचन केले जाणार असल्याचे खोत यांनी सांगितले.

...त्यात कसली अब्रू जाते?चावडी वाचनाला राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी विरोध केल्याचे निदर्शनास आणल्यानंतर, खोत म्हणाले, कसली अपमानास्पद वागणूक, उलट त्यातून एखादा अपात्र ठरला असेल तर तो हरकत घेऊन पात्र ठरू शकतो. कर्ज घेतले, त्यातील काही थकले याचे वाचनाने अब्रू कसली जाते.

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Farmerशेतकरी