शहरं
Join us  
Trending Stories
1
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
2
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
3
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
4
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
7
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
8
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
11
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
12
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
13
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
14
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
15
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
16
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
17
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
18
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
19
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
20
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल

कर्जमाफीतील वंचितांना न्याय देऊ : सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 19:21 IST

परतफेडीच्या मुदतीवरून ऊस उत्पादन पट्ट्यातील प्रामाणिकपणे परतफेड करणारे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिल्याचे सरकारच्या लक्षात आले आहे. कर्जमाफीची ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेचच त्या शेतकऱ्याच्याबाबत निर्णय घेतला जाईल. कर्जमाफीत पात्र असलेला एकही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देजिल्हा बँकेच्या पुनर्गठीत लाभार्थ्यांसाठीही प्रयत्नशीलकर्जमाफीत पात्र असलेला एकही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाहीसोमवारपासून पुन्हा चावडी वाचन...त्यात कसली अब्रू जाते?

कोल्हापूर , दि. १८ :  परतफेडीच्या मुदतीवरून ऊस उत्पादन पट्ट्यातील प्रामाणिकपणे परतफेड करणारे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिल्याचे सरकारच्या लक्षात आले आहे. कर्जमाफीची ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेचच त्या शेतकऱ्याच्याबाबत निर्णय घेतला जाईल. कर्जमाफीत पात्र असलेला एकही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

कर्जमाफीच्या याद्या अपलोड करण्याचे काम पूर्ण झाले असून आयुक्त कार्यालयाकडून त्याची छाननी होऊन त्या अंतिम मंजुरीसाठी तालुकास्तरीय कमिटीकडे पाठविल्या जाणार आहेत. या याद्या पोर्टलवर प्रसिद्ध करून शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे वर्ग केले जातील.

ऊस पट्ट्यातील परतफेडीचा कालावधी व कर्जमाफीचे निकष यामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत जिल्हा उपनिबंधकांनामार्फत सविस्तर अहवाल मागविला आहे. त्यावर उच्चस्तरीय कमिटी निर्णय घेणार आहे, शेतकऱ्याची अडचण सरकारच्या लक्षात आल्याने त्याही शेतकऱ्याना कर्जमाफीचा लाभ मिळेल.

केंद्राच्या कर्जमाफीतील अपात्र ११२ कोटींचे पुनर्गठन व राज्य सरकारची कर्जमाफीचा पेच निर्माण झाल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे म्हणाले, हे कर्ज सन २००९ पूर्वी घेतल्याने अडचणी आहेत, पण त्याचे पुनर्गठन सन २०१२ झाल्याची नोंद सहकार विभागाने घेतली आहे, याबाबतही लवकर निर्णय होईल. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक धनंजय पाटील, रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटील आदी उपस्थित होते.

सोमवारपासून पुन्हा चावडी वाचनमध्यंतरी झालेल्या चावडी वाचनात ५८७ हरकती आलेल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे होऊ न शकलेल्या चावडी वाचनाचा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. सोमवार (दि. २३) पासून उर्वरित गावांत वाचन केले जाणार असल्याचे खोत यांनी सांगितले.

...त्यात कसली अब्रू जाते?चावडी वाचनाला राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी विरोध केल्याचे निदर्शनास आणल्यानंतर, खोत म्हणाले, कसली अपमानास्पद वागणूक, उलट त्यातून एखादा अपात्र ठरला असेल तर तो हरकत घेऊन पात्र ठरू शकतो. कर्ज घेतले, त्यातील काही थकले याचे वाचनाने अब्रू कसली जाते.

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Farmerशेतकरी