शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

जे काही द्यायचं आहे ते लगेच द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:24 IST

कोल्हापूर : तुम्ही पॅकेज किंवा मदत म्हणा, पूरग्रस्तांना मदत देण्यात आधीच उशीर झालाय. तेव्हा जे काही द्यायचं आहे ...

कोल्हापूर : तुम्ही पॅकेज किंवा मदत म्हणा, पूरग्रस्तांना मदत देण्यात आधीच उशीर झालाय. तेव्हा जे काही द्यायचं आहे ते तातडीने जाहीर करा, असे आवाहन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती पाहिल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते.

गेल्यावेळच्या आणि आत्ताच्या पावसाची आकडेवारी सांगून फडणवीस म्हणाले, कोल्हापूरची अवस्था बशीसारखी झाली आहे. त्यामुळे या पुराकडे गंभीरपणे बघण्याची गरज आहे. त्यासाठी दीर्घकालीन उपायोजनांची गरज आहे. २०१९ला आम्ही पूरग्रस्तांना तातडीने आधी पाच हजार तर नंतर दहा हजार रुपये दिले, व्यापाऱ्यांना निधी दिला. आता वीज मीटरसाठी पुन्हा अनामत मागत आहेत. आम्ही ती मागितली नव्हती तर वीज खात्याच्या खर्चाने मीटर दिले होते. आता असेच निर्णय हाेण्याची गरज आहे.

पुराचे पाणी दुष्काळी भागात नेण्यासाठी आम्ही योजना तयार केली होती. दि. २५ सप्टेंबर २०१९ला जागतिक बॅंकेने या प्रकल्पासाठी साडेतीन हजार कोटी रुपये देण्याचे मान्यही केले. परंतु, आमचे सरकार गेले आणि हा प्रकल्प राहिला. या प्रकल्प पुढे नेला पाहिजे. ज्या घटकांना पुराचा फटका बसला आहे, त्यांना कमी व्याजाने कर्ज दिले पाहिजे.

यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रकाश आवाडे, धनंजय महाडिक, अमल महाडिक, समरजित घाटगे, राहुल चिकोडे, महेश जाधव यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

चौकट

फडणवीस म्हणाले

१ केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करण्यासाठी समन्वय अधिकारी नेमावा.

२ २० वर्षांपूर्वीची बांधकामे तोडून उपयोग नाही, नव्याने होऊ नयेत यासाठी कडक अंमलबजावणी करावी.

३ पूर अडविण्यासाठी सरसकट भिंत बांधून चालणार नाही.

४ पूरग्रस्तांचे कर्ज माफ करावे.

५ कुंभार समाजाला नुकसानभरपाई मिळावी.

चौकट

ही मूल्यमापनाची वेळ नव्हे

पूरस्थिती हाताळण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरले का? या प्रश्नावर ही वेळ मूल्यमापनाची नाही. पूरग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, याला आमचे प्राधान्य आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.