शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
5
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
6
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
7
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
8
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
9
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
10
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
11
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
12
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
13
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
14
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
15
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
16
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
17
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
18
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?
19
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

शाहू महाराजांना ‘भारतरत्न’ द्या : मराठा सेवा संघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 21:57 IST

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे विविध क्षेत्रांतील कार्य लक्षात घेता त्यांना केंद्र शासनाच्यावतीने ‘भारतरत्न’ ही पदवी देऊन त्यांचा यथोचित सन्मान करावा, अशी मागणी अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्यावतीने जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.यावेळी पाटील म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात समाजबांधणी, अस्पृश्यता निर्मूलन, ...

ठळक मुद्देमहाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाकडे शिफारस करावी

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे विविध क्षेत्रांतील कार्य लक्षात घेता त्यांना केंद्र शासनाच्यावतीने ‘भारतरत्न’ ही पदवी देऊन त्यांचा यथोचित सन्मान करावा, अशी मागणी अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्यावतीने जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.

यावेळी पाटील म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात समाजबांधणी, अस्पृश्यता निर्मूलन, धार्मिक आणि जातीय सलोखा, शिक्षण प्रसार, स्त्री-पुरुष समानता, सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक सलोखा, दलितोद्धार, कला, क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन, वसतिगृहाद्वारे गरीब विद्यार्थ्यांची राहणे व शिक्षणाची केलेली सोय, आदी दूरदृष्टी देणारी महान कार्ये केली आहेत. त्यांचा सामाजिक समता व सलोखा हा संदेश देशभर पोहोचावा यासाठी त्यांना ‘भारतरत्न’ ही पदवी देणे आवश्यक आहे. त्यांचे हे आदर्श कार्य आजच्या युवा पिढीसमोर ठेवावे.

महाराष्टÑ शासनाने या ‘भारतरत्न’ पदवीसाठी केंद्र शासनाकडे शिफारस करावी, अशीही विनंती पाटील यांनी यावेळी केली.या पत्रकार परिषदेस प्राचार्य डॉ. आय. एच. पठाण, मराठा सेवा संघाचे राज्य सरचिटणीस दिग्विजय मोहिते, प्रा. डॉ. कविता गगराणी, प्रा. डॉ. चंद्रकांत कुरणे, वैभव घोरपडे, किरण साळुंखे, उदय पाटील, प्रमोद बोंडगे, शिवाजी घाडगे, शशिकांत नलवडे, आदी उपस्थित होते.सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी ठराव करावात्यांना ‘भारतरत्न’ ही पदवी मिळण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर जिल्हा परिषद, जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपरिषदा, ग्रामपंचायती, सर्व साखर कारखाने व सर्व शिक्षण संस्था, सर्व सहकारी संस्था यांनी ठराव करून महाराष्ट शासनाकडे पाठवावेत. कोल्हापूरच्या शाहूप्रेमी जनतेने यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovernmentसरकार