शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शाहू महाराजांना ‘भारतरत्न’ द्या : मराठा सेवा संघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 21:57 IST

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे विविध क्षेत्रांतील कार्य लक्षात घेता त्यांना केंद्र शासनाच्यावतीने ‘भारतरत्न’ ही पदवी देऊन त्यांचा यथोचित सन्मान करावा, अशी मागणी अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्यावतीने जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.यावेळी पाटील म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात समाजबांधणी, अस्पृश्यता निर्मूलन, ...

ठळक मुद्देमहाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाकडे शिफारस करावी

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे विविध क्षेत्रांतील कार्य लक्षात घेता त्यांना केंद्र शासनाच्यावतीने ‘भारतरत्न’ ही पदवी देऊन त्यांचा यथोचित सन्मान करावा, अशी मागणी अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्यावतीने जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.

यावेळी पाटील म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात समाजबांधणी, अस्पृश्यता निर्मूलन, धार्मिक आणि जातीय सलोखा, शिक्षण प्रसार, स्त्री-पुरुष समानता, सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक सलोखा, दलितोद्धार, कला, क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन, वसतिगृहाद्वारे गरीब विद्यार्थ्यांची राहणे व शिक्षणाची केलेली सोय, आदी दूरदृष्टी देणारी महान कार्ये केली आहेत. त्यांचा सामाजिक समता व सलोखा हा संदेश देशभर पोहोचावा यासाठी त्यांना ‘भारतरत्न’ ही पदवी देणे आवश्यक आहे. त्यांचे हे आदर्श कार्य आजच्या युवा पिढीसमोर ठेवावे.

महाराष्टÑ शासनाने या ‘भारतरत्न’ पदवीसाठी केंद्र शासनाकडे शिफारस करावी, अशीही विनंती पाटील यांनी यावेळी केली.या पत्रकार परिषदेस प्राचार्य डॉ. आय. एच. पठाण, मराठा सेवा संघाचे राज्य सरचिटणीस दिग्विजय मोहिते, प्रा. डॉ. कविता गगराणी, प्रा. डॉ. चंद्रकांत कुरणे, वैभव घोरपडे, किरण साळुंखे, उदय पाटील, प्रमोद बोंडगे, शिवाजी घाडगे, शशिकांत नलवडे, आदी उपस्थित होते.सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी ठराव करावात्यांना ‘भारतरत्न’ ही पदवी मिळण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर जिल्हा परिषद, जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपरिषदा, ग्रामपंचायती, सर्व साखर कारखाने व सर्व शिक्षण संस्था, सर्व सहकारी संस्था यांनी ठराव करून महाराष्ट शासनाकडे पाठवावेत. कोल्हापूरच्या शाहूप्रेमी जनतेने यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovernmentसरकार