शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

युद्धाचे घाव.. रक्त सळसळणारं कोल्हापुरातील सैनिक गिरगाव; गावात १३१ माजी सैनिक तर सद्या ८१ जण बॉर्डरवर

By पोपट केशव पवार | Updated: May 10, 2025 12:48 IST

गावात देशप्रेमाने भारावलेले वातावरण

पोपट पवारकोल्हापूर : गाव सैनिक गिरगाव..वेळ दुपारी एकची..सूर्य आग ओकत असल्याने गावात संचारबंदी असल्यासारखं वातावरण.. मात्र, एका छोट्याशा कौलारू घरात एक आजोबा आत-बाहेर सारख्या येरझऱ्या घालत भारत-पाकिस्तान युद्धाचे काय झाले, म्हणून येणाऱ्या-जाणाऱ्यांना विचारत होते. ‘अरे पाकड्यांच्या घरात तीन-तीन मैल मी आतमध्ये शिरलोय, आता सरकारने पुन्हा संधी दिली, तर पुन्हा सीमेवर जाऊन लढेन, इथं उन्हात तळपण्यापेक्षा सीमेवर तळपलेलं कधीबी चांगलंच की, म्हणत त्या आजोबांनी वयाच्या ८४ व्या वर्षीही मी देशसेवा करायला तयार असल्याचा संदेश दिला. दत्तात्रय रामचंद्र पाटील, असे या आजोबांचे नाव. सैन्याची पूर्वापार परंपरा असलेल्या या गावात, असे शंभरहून अधिक दत्तात्रय पाटील सीमेवर जाऊन लढायला तयार आहेत. ज्यांच्यामुळे आमच्या कैक आया-बहिणींचे कुंकू पुसले त्यांना कायमचा धडा शिकवण्याची हीच वेळ आहे. त्यामुळे सरकारला गरज पडली, तर पुन्हा सीमेवर जाऊन पाकला कायमचे नेस्तनाबूत करू, या शब्दांत दत्तात्रय पाटील, शशिकांत साळोखे, किसन जाधव या माजी सैनिकांनी मनामनाचे आक्रंदन उलगडले.भारत-पाक युद्धाने उभा देश एकसंघ झाला असताना, सैनिक गिरगावसारखे देशप्रेमाने भारावलेले गाव, तर त्याला कसे अपवाद असेल. या गावात १३१ माजी सैनिक असून, सध्या जम्मू-काश्मीर, राजस्थान या पाकच्या सीमेवर याच गावातले तब्बल ८१ सैनिक डोळ्यात तेल घालून शत्रूचा सामना करत आहेत. पाकिस्तानबरोबर युद्ध सुरू झाल्यापासून, तर माजी सैनिकांचे रक्त सळसळत आहे. कार्यरत ८१ सैनिकांमधील बहुतांशजण सीमेवरच असल्याने त्यांच्याबद्दलची माहिती माजी सैनिकांबरोबरच त्यांच्या कुटुंबाकडूनही रोज घेतली जाते. शिवाय, आजी-माजी सैनिक एकत्र येऊन युद्धाच्या घडामोडीवर सकाळ-संध्याकाळ चर्चा करतात.

दोन गोळ्या लागूनही जोश कायम१९७१ च्या बांग्लादेश-पाक युद्धात भारत बांगलादेशकडून लढाईत उतरला होता. याच लढाईत कर्तृत्व गाजवलेले दत्तात्रय पाटील यांचा जोश आजही वाखणण्यासारखा आहे. या लढाईत पाटील यांच्या गुडघ्या व खांद्यातून दोन गोळ्या आरपार गेल्या. पण, ते मागे हटले नाहीत. १९६५ च्या युद्धातही तब्बल तीन मैल पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन टेहळणी केल्याची आठवण ते अभिमानाने सांगतात.

काय आहे गावचा इतिहास ?या गावाला मोठी सैन्यपरंपरा आहे. १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यावेळी कोल्हापूरच्या चिमासाहेब महाराजांना इंग्रजांनी भवानी मंडपात कैद केले होते. त्यांना सोडवण्यासाठी गिरगावमधून फिरंगोजी शिंदे यांनी ५०० सहकाऱ्यांसह कोल्हापुरात येत इंग्रजांशी लढा दिला. यात फिरंगोजी यांना वीरमरण आले. त्यांचे स्मारक गावात उभे करण्यात आले आहे, तेव्हापासून या गावाला सैनिकी परंपरा आहे.

आमच्या गावाला सैनिकांची मोठी परंपरा आहे. आमचा देश आणि सैनिक हाच आमचा आत्मा आहे. सध्या युद्धाच्या काळात देशाला गरज पडली, तर सर्वच्या सर्व १३१ माजी सैनिक पुन्हा सीमेवर जाऊन लढायला तयार आहेत. - शशिकांत साळोखे, निवृत्त सुभेदार.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरIndian Armyभारतीय जवान