शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

गावरान आंबा होतोय ‘दुर्मीळ’

By admin | Updated: May 6, 2015 00:16 IST

शासनाने काही तरी उपाययोजना करण्याची गरज

कृष्णा सावंत- पेरणोली -आजरा व चंदगड तालुक्यांतील शेतकऱ्यांचा खजिना असलेल्या गावरान आंब्यावर सातत्याने दव्याचा परिणाम होत असल्याने या दोन्ही तालुक्यांतील चवीला मधुर असलेला गावरान आंबा संपुष्टात आला आहे.आजरा, चंदगड व भुदरगड तालुक्यांतील नैसर्गिक साधनसंपत्ती एकच आहे. तिन्ही तालुक्यांतील डोंगराळ भागात पावसाचे प्रमाण एकसारखे असल्याने आंबा व काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे. आजरा व चंदगडमधील गावरान आंबा हा चवीला मधुर असल्याने हा आंबा ग्रामीण भागात लोकप्रिय आहे.गत १५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून या आंब्याच्या उत्पादनाचे प्रमाण कमी आले आहे. या आंब्याच्या विविध जातींमुळे प्रत्येक आंब्याच्या जातीला वेगळी चव आहे. मात्र, हा आंबा आता नाहीसा होऊ लागल्याने याची चवही नाहीसी झाली आहे. शेतातील प्रत्येक झाडाला शेकडो आंबे लागत असत. परंतु, आता सर्वच झाडे भकास झाली आहेत. दहा-पंधरा वर्षांपूर्वी शेतकरी झाडाखालील आंबे भरून आणण्यासाठी पोती घेऊन जात होता. आता मात्र आंब्याच्या झाडांकडेच बघण्याची वेळ आली आहे. कच्चे आंबे काढून प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात अढी घातली जायची. ती अढीही आता नष्ट झाली आहे. या आंब्यामुळे शेतकऱ्याला व ग्रामीण भागातील नागरिकांना पौष्टिक मेवा मिळायचा, तो आता बंद झाला आहे. शेतकऱ्यांना आर्थिक हातभारही लागायचा, तोही बंद झाला आहे. त्यामुळे शेतकरी एका चांगल्या आंब्याच्या रानमेव्याला मुकला आहे.आम्हाला लहानपणी शेतातील भरपूर आंबे खायला मिळायचे. परंतु, दरवर्षी दव पडत असल्याने आंब्याचा मोहर गळू लागला आहे. त्यामुळे आंबा नष्ट झाला. यावर शासनाने काही तरी उपाययोजना करण्याची गरज आहे.- चंद्रकांत वंजारी, शेतकरी पेरणोली, ता. आजरा.