शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

गव्यास बेशुद्ध करून वनक्षेत्रात सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 11:08 IST

गवा बिथरलेला असल्याने वनविभागाच्या वतीने गव्यास ट्रॅन्क्युलाइझिंग (बेशुद्ध) करून वनक्षेत्रात सोडणार आहेत. गव्याच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू झाल्यानंतर वनविभाग खडबडून जागे झाले असून, शोधमोहीम सुरू केली आहे.

शिये : भुयेवाडी (ता. करवीर) येथील नागरिकांवर हल्ला करणारा गवा बिथरलेला असल्याने वनविभागाच्या वतीने गव्यास ट्रॅन्क्युलाइझिंग (बेशुद्ध) करून वनक्षेत्रात सोडणार आहेत. गव्याच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू झाल्यानंतर वनविभाग खडबडून जागे झाले असून, शोधमोहीम सुरू केली आहे.

गव्याने केलेल्या हल्ल्यात सौरभ खोत याचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बिथरलेल्या गव्यास लोकवस्तीपासून लांब नेण्यासाठी रविवारी वनविभागाच्या वतीने भुयेवाडी, कुशिरे, सादळे मादळे परिसरात वनविभागाने शोधमोहीम चालवली आहे. दरम्यान, भुयेवाडी येथे गव्याने हल्ला केलेल्या ठिकाणाचा पंचनामा वनविभागाच्या वतीने करण्यात आला.

रविवारी सकाळी गायमुख परिसरात गवा दिसल्याने त्याच्या शोधासाठी वनविभागाच्या वतीने सहा टीम तयार केल्या असून, त्यातील चार टीम जंगल भागात शोध घेण्यासाठी, तर दोन टीम परिसरातील गावातील नागरिकांना सतर्क राहण्यासाठी सुचित केल्या आहेत.

गवा दिसल्यास त्यास ट्रॅन्क्युलाइझिंग (तात्पुरता बेशुद्ध) करण्यासाठी कराडहून प्रशिक्षित कर्मचारी शुटर गनसह कुशिरे येथे आले आहेत. गवा दिसल्यास त्यास तात्पुरता बेशुद्ध करून सुरक्षितस्थळी नेणार आहेत. दरम्यान, खोत कुटुंबीयांचे आमदार पी. एन. पाटील, वनविभागाचे अधिकारी यांनी सांत्वन केले. जखमी प्रल्हाद पाटील यांची शस्त्रक्रिया केली असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. भीमराव पाटील यांची प्रकृती चांगली असून, त्यांना घरी आणण्यात आले आहे.

भुयेवाडी येथील युवकावर हल्ला करणारा गवा बिथरलेला असण्याची शक्यता असल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून भुयेवाडी, सादळे, मादळे, कुशीरे, जोतिबा परिसरात गव्याची शोधमोहीम सुरू आहे. या भागातील नागरिकांनी सावधानता बाळगावी, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आव्हान वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

भुयेवाडी येथे सहा महिन्यांपूर्वी बिबट्यासदृश प्राण्याने श्वानांवर हल्ला केला होता. काल गव्याच्या हल्ल्यात येथील युवकाचा मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.

वारंवार भुयेवाडी येथे वन्यप्राणी येत असून, एका युवकास आपला जीव गमवावा लागल्याने वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारली पाहिजे. - सचिन देवकुळे, सरपंच, भुयेवाडी ग्रामपंचायत

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforestजंगल