शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

गव्यास बेशुद्ध करून वनक्षेत्रात सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 11:08 IST

गवा बिथरलेला असल्याने वनविभागाच्या वतीने गव्यास ट्रॅन्क्युलाइझिंग (बेशुद्ध) करून वनक्षेत्रात सोडणार आहेत. गव्याच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू झाल्यानंतर वनविभाग खडबडून जागे झाले असून, शोधमोहीम सुरू केली आहे.

शिये : भुयेवाडी (ता. करवीर) येथील नागरिकांवर हल्ला करणारा गवा बिथरलेला असल्याने वनविभागाच्या वतीने गव्यास ट्रॅन्क्युलाइझिंग (बेशुद्ध) करून वनक्षेत्रात सोडणार आहेत. गव्याच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू झाल्यानंतर वनविभाग खडबडून जागे झाले असून, शोधमोहीम सुरू केली आहे.

गव्याने केलेल्या हल्ल्यात सौरभ खोत याचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बिथरलेल्या गव्यास लोकवस्तीपासून लांब नेण्यासाठी रविवारी वनविभागाच्या वतीने भुयेवाडी, कुशिरे, सादळे मादळे परिसरात वनविभागाने शोधमोहीम चालवली आहे. दरम्यान, भुयेवाडी येथे गव्याने हल्ला केलेल्या ठिकाणाचा पंचनामा वनविभागाच्या वतीने करण्यात आला.

रविवारी सकाळी गायमुख परिसरात गवा दिसल्याने त्याच्या शोधासाठी वनविभागाच्या वतीने सहा टीम तयार केल्या असून, त्यातील चार टीम जंगल भागात शोध घेण्यासाठी, तर दोन टीम परिसरातील गावातील नागरिकांना सतर्क राहण्यासाठी सुचित केल्या आहेत.

गवा दिसल्यास त्यास ट्रॅन्क्युलाइझिंग (तात्पुरता बेशुद्ध) करण्यासाठी कराडहून प्रशिक्षित कर्मचारी शुटर गनसह कुशिरे येथे आले आहेत. गवा दिसल्यास त्यास तात्पुरता बेशुद्ध करून सुरक्षितस्थळी नेणार आहेत. दरम्यान, खोत कुटुंबीयांचे आमदार पी. एन. पाटील, वनविभागाचे अधिकारी यांनी सांत्वन केले. जखमी प्रल्हाद पाटील यांची शस्त्रक्रिया केली असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. भीमराव पाटील यांची प्रकृती चांगली असून, त्यांना घरी आणण्यात आले आहे.

भुयेवाडी येथील युवकावर हल्ला करणारा गवा बिथरलेला असण्याची शक्यता असल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून भुयेवाडी, सादळे, मादळे, कुशीरे, जोतिबा परिसरात गव्याची शोधमोहीम सुरू आहे. या भागातील नागरिकांनी सावधानता बाळगावी, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आव्हान वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

भुयेवाडी येथे सहा महिन्यांपूर्वी बिबट्यासदृश प्राण्याने श्वानांवर हल्ला केला होता. काल गव्याच्या हल्ल्यात येथील युवकाचा मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.

वारंवार भुयेवाडी येथे वन्यप्राणी येत असून, एका युवकास आपला जीव गमवावा लागल्याने वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारली पाहिजे. - सचिन देवकुळे, सरपंच, भुयेवाडी ग्रामपंचायत

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforestजंगल