शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

गव्यास बेशुद्ध करून वनक्षेत्रात सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 11:08 IST

गवा बिथरलेला असल्याने वनविभागाच्या वतीने गव्यास ट्रॅन्क्युलाइझिंग (बेशुद्ध) करून वनक्षेत्रात सोडणार आहेत. गव्याच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू झाल्यानंतर वनविभाग खडबडून जागे झाले असून, शोधमोहीम सुरू केली आहे.

शिये : भुयेवाडी (ता. करवीर) येथील नागरिकांवर हल्ला करणारा गवा बिथरलेला असल्याने वनविभागाच्या वतीने गव्यास ट्रॅन्क्युलाइझिंग (बेशुद्ध) करून वनक्षेत्रात सोडणार आहेत. गव्याच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू झाल्यानंतर वनविभाग खडबडून जागे झाले असून, शोधमोहीम सुरू केली आहे.

गव्याने केलेल्या हल्ल्यात सौरभ खोत याचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बिथरलेल्या गव्यास लोकवस्तीपासून लांब नेण्यासाठी रविवारी वनविभागाच्या वतीने भुयेवाडी, कुशिरे, सादळे मादळे परिसरात वनविभागाने शोधमोहीम चालवली आहे. दरम्यान, भुयेवाडी येथे गव्याने हल्ला केलेल्या ठिकाणाचा पंचनामा वनविभागाच्या वतीने करण्यात आला.

रविवारी सकाळी गायमुख परिसरात गवा दिसल्याने त्याच्या शोधासाठी वनविभागाच्या वतीने सहा टीम तयार केल्या असून, त्यातील चार टीम जंगल भागात शोध घेण्यासाठी, तर दोन टीम परिसरातील गावातील नागरिकांना सतर्क राहण्यासाठी सुचित केल्या आहेत.

गवा दिसल्यास त्यास ट्रॅन्क्युलाइझिंग (तात्पुरता बेशुद्ध) करण्यासाठी कराडहून प्रशिक्षित कर्मचारी शुटर गनसह कुशिरे येथे आले आहेत. गवा दिसल्यास त्यास तात्पुरता बेशुद्ध करून सुरक्षितस्थळी नेणार आहेत. दरम्यान, खोत कुटुंबीयांचे आमदार पी. एन. पाटील, वनविभागाचे अधिकारी यांनी सांत्वन केले. जखमी प्रल्हाद पाटील यांची शस्त्रक्रिया केली असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. भीमराव पाटील यांची प्रकृती चांगली असून, त्यांना घरी आणण्यात आले आहे.

भुयेवाडी येथील युवकावर हल्ला करणारा गवा बिथरलेला असण्याची शक्यता असल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून भुयेवाडी, सादळे, मादळे, कुशीरे, जोतिबा परिसरात गव्याची शोधमोहीम सुरू आहे. या भागातील नागरिकांनी सावधानता बाळगावी, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आव्हान वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

भुयेवाडी येथे सहा महिन्यांपूर्वी बिबट्यासदृश प्राण्याने श्वानांवर हल्ला केला होता. काल गव्याच्या हल्ल्यात येथील युवकाचा मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.

वारंवार भुयेवाडी येथे वन्यप्राणी येत असून, एका युवकास आपला जीव गमवावा लागल्याने वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारली पाहिजे. - सचिन देवकुळे, सरपंच, भुयेवाडी ग्रामपंचायत

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforestजंगल