शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

सावधान! कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील गरुड मंडप खचतोय

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: November 10, 2022 13:08 IST

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरातील महत्त्वाची वास्तू असलेला गरुड मंडप खचत चालला आहे. वर्षानुवर्षे अभिषेकाचे पाणी जमिनीखाली गेल्याने येथील सहा खांब खालून पूर्णतः पोकळ होऊन जमिनीखाली जात आहेत.

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरातील महत्त्वाची वास्तू असलेला गरुड मंडप खचत चालला आहे. वर्षानुवर्षे अभिषेकाचे पाणी जमिनीखाली गेल्याने येथील सहा खांब खालून पूर्णतः पोकळ होऊन जमिनीखाली जात आहेत. परिणामी खांब आणि छतामध्ये गॅप (दरी) पडून तो वाढत चालल्याने आता छतही हळूहळू खाली येऊ लागले आहे. देवस्थान समितीने वेळीच याची दखल घेतली नाही तर भविष्यात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर: ऐतिहासिक व प्राचिन अंबाबाई मंदिर परिसरातील गरुड मंडप लाकडाचा असून, तो १५ खांबांवर आधारला आहे. गेल्या दहा वर्षांपासून याचे छत आणि खांबांमध्ये अंतर पडत असून अलीकडे जास्त वेगाने हे अंतर वाढत आहे; पण आजवर त्याचे कारण आणि गांभीर्य कळत नव्हते.

काही महिन्यांपूर्वी गरुड मंडपातील संगमरवरी काढल्यावर त्याखाली सर्वत्र अभिषेकाचे पाणीच पाणी दिसले.फरशीखाली चेंबर असेल असे समजून वर्षानुवर्षे अभिषेकाचे पाणी येथेच टाकले जायचे. हे पाणी जमिनीखाली साठून सहा खांब तळातून सडून पोकळ झाले आहेत व जमिनीत रुतत चालले आहेत. त्यामुळे उभे खांब आणि छतावरील आडवे खांब या दोन्हींमध्ये मोठे अंतर पडत आहे. आडव्या खांबांचाही आकार बदलून ते खाली आले आहेत, त्यामुळे छताची मधली बाजू खाली कलली आहे.

पहाटेपासूनचे सगळे अभिषेक येथे पार पडतात. भजन, कीर्तनाचे कार्यक्रम, देवस्थानचे उपक्रम होतात. मोठ्या संख्येने भाविक येथे शांत चित्ताने देवीचे नामस्मरण करतात. त्यामुळे देवस्थानने तातडीने याची दुरुस्ती करून घेणे गरजेचे आहे.

काय करता येईल

• छत आणि खांबांमध्ये जेवढे अंतर पडले आहे, तेवढ्या अंतरापर्यंत गरुड मंडपाचे खांब व वास्तू जॅकनेवर उचलून घ्यावी लागेल. - खाली दगडी फरशी घालून पाया मजबूत करावा लागणार आहे. त्यासह गरुड मंडपाच्या नूतनीकरणासाठी ५५ लाखांचा खर्च अपेक्षित आहे.

असा आहे गरुड मंडप

छत्रपती तिसरे शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीत सन १८३८ ते १८४५ दरम्यान गरुड मंडप बांधला गेला. त्याला तीन दालन असून, लाकडी सभामंडप आहे. मोठे लाकडी उभे १५ खांब आणि आडवे खांब यावर हा मंडप उभा असून, नक्षीदार कमानी आहेत. छताला कौलं आहेत. खाली काळ्या दगडाची घोटीव फरशी आहे. येथील दगडी चबुतऱ्यावर श्री अंबाबाईची पालखी विराजमान होते. येथेच गणपतीची प्रतिष्ठापना, अक्षय्य तृतीयेला अंबाबाईची झोपाळ्यातील पूजा बांधली जाते.

वर्षानुवर्षे अभिषेकाचे पाणी साचल्याने गरुड मंडपाचे खांब खराब होऊन जमिनीत खचत आहेत. वास्तूच्या दुरुस्तीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हेरिटेज समितीच्या सहमतीने पुरातत्त्व खात्याला पत्र पाठविण्यात येणार आहे.

- शिवराज नाईकवाडे, सचिव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTempleमंदिर