शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

बहिरेवाडीत गंजींना अज्ञातांकडून आगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:15 IST

उत्तूर : गेल्या महिन्याभरात रात्रीच्यावेळी अज्ञात माथेफिरूने बहिरेवाडी (ता. आजरा ) येथील ग्रामस्थांच्या गवताच्या गंजी व खोपी पेटविण्याचे प्रकार सुरू केले आहेत. चार दिवसांतून एक तरी गवताची गंजी व खोप जाणूनबुजून पेटविली जात आहे. सतत होत असलेल्या या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या माथेफिरूचा तातडीने शोध घ्यावा, ...

उत्तूर : गेल्या महिन्याभरात रात्रीच्यावेळी अज्ञात माथेफिरूने बहिरेवाडी (ता. आजरा) येथील ग्रामस्थांच्या गवताच्या गंजी व खोपी पेटविण्याचे प्रकार सुरू केले आहेत. चार दिवसांतून एक तरी गवताची गंजी व खोप जाणूनबुजून पेटविली जात आहे. सतत होत असलेल्या या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या माथेफिरूचा तातडीने शोध घ्यावा, अशी येथील शेतकºयांची अपेक्षा आहे.सध्या शेतकरी उन्हाळ्यातील चाºयासाठी गवताच्या गंजी रचून ठेवत आहेत, तर शेतातील व गावातील खोपीत शेतीची अवजारे, जळण ठेवले जात आहे, ते माथेफिरू जाळत आहे. यामध्ये ग्रामस्थांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. आठवड्यातून दोन ते चार तरी आगीचे प्रकार घडत आहेत. बंद घरांनाही माथेफिरू लक्ष्य करतो. रात्री अकरापूर्वी लागलेल्या आगी ग्रामस्थांनी विझविल्या आहेत. या माथेफिरूला ग्रामस्थ पकडण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्यांना अद्याप तो हाती लागलेला नाही. पहाटे चारपर्यंत केव्हाही तो आग लावून पसार होत आहे. आगीमुळे चाºयाचा प्रश्न गंभीर बनला आहे. गावात मोठा अनर्थ केव्हाही घडू शकतो, अशी भावनाही ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.शोध सुरूचमाथेफिरूकडून सुरू असलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे पोलीस यंत्रणाही बुचकळ्यात पडली आहे. त्याचा पोलीसही शोध घेत आहेत. तरी ग्रामस्थांनी हे कृत्य जो कोणी करीत असेल त्याचे नाव पोलिसांना सांगावे. त्याचे नाव सांगणाºया व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवले जाईल, अशी ग्वाही उत्तूर पोलीस दूरक्षेत्राचे सहायक फौजदार पांडुरंग दोरुगडे यांनी दिली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा