शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

बहिरेवाडीत गंजींना अज्ञातांकडून आगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:15 IST

उत्तूर : गेल्या महिन्याभरात रात्रीच्यावेळी अज्ञात माथेफिरूने बहिरेवाडी (ता. आजरा ) येथील ग्रामस्थांच्या गवताच्या गंजी व खोपी पेटविण्याचे प्रकार सुरू केले आहेत. चार दिवसांतून एक तरी गवताची गंजी व खोप जाणूनबुजून पेटविली जात आहे. सतत होत असलेल्या या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या माथेफिरूचा तातडीने शोध घ्यावा, ...

उत्तूर : गेल्या महिन्याभरात रात्रीच्यावेळी अज्ञात माथेफिरूने बहिरेवाडी (ता. आजरा) येथील ग्रामस्थांच्या गवताच्या गंजी व खोपी पेटविण्याचे प्रकार सुरू केले आहेत. चार दिवसांतून एक तरी गवताची गंजी व खोप जाणूनबुजून पेटविली जात आहे. सतत होत असलेल्या या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या माथेफिरूचा तातडीने शोध घ्यावा, अशी येथील शेतकºयांची अपेक्षा आहे.सध्या शेतकरी उन्हाळ्यातील चाºयासाठी गवताच्या गंजी रचून ठेवत आहेत, तर शेतातील व गावातील खोपीत शेतीची अवजारे, जळण ठेवले जात आहे, ते माथेफिरू जाळत आहे. यामध्ये ग्रामस्थांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. आठवड्यातून दोन ते चार तरी आगीचे प्रकार घडत आहेत. बंद घरांनाही माथेफिरू लक्ष्य करतो. रात्री अकरापूर्वी लागलेल्या आगी ग्रामस्थांनी विझविल्या आहेत. या माथेफिरूला ग्रामस्थ पकडण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्यांना अद्याप तो हाती लागलेला नाही. पहाटे चारपर्यंत केव्हाही तो आग लावून पसार होत आहे. आगीमुळे चाºयाचा प्रश्न गंभीर बनला आहे. गावात मोठा अनर्थ केव्हाही घडू शकतो, अशी भावनाही ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.शोध सुरूचमाथेफिरूकडून सुरू असलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे पोलीस यंत्रणाही बुचकळ्यात पडली आहे. त्याचा पोलीसही शोध घेत आहेत. तरी ग्रामस्थांनी हे कृत्य जो कोणी करीत असेल त्याचे नाव पोलिसांना सांगावे. त्याचे नाव सांगणाºया व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवले जाईल, अशी ग्वाही उत्तूर पोलीस दूरक्षेत्राचे सहायक फौजदार पांडुरंग दोरुगडे यांनी दिली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा