शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

Kolhapur News: कष्टकऱ्यांच्या वस्तीत, गुंडांची मस्ती; बोंद्रेनगर दहशतीखाली

By उद्धव गोडसे | Updated: March 17, 2023 12:04 IST

चौकात किंवा गल्लीच्या कोपऱ्यावर थांबून टवाळक्या करणारी तरुणांची टोळकी मुलींची छेड काढण्यात आघाडीवर

उद्धव गोडसेकोल्हापूर : उपनगर आणि खेड्याची संमिश्र वस्ती. काही कुलूपबंद घरे, तर काही घरांच्या बाहेर खेळणारी चार-पाच लहान मुले. एक-दोन ठिकाणी लसूण निवडत बसलेल्या वयोवृद्ध बायका, तर एका ठिकाणी म्हशींचा चारा-पाणी करण्यात गुंतलेला म्हातारा आणि मुख्य रस्त्यालगत एका पान टपरीसमोर दंगामस्तीत दंग असलेलं छपरी तरुणांचं टोळकं. हे चित्र आहे बोंद्रेनगरातील धनगरवाड्याचे. नात्यातीलच तरुणाच्या त्रासाला कंटाळून बुधवारी (दि. १५) एका तरुणीने आत्महत्या केल्यानंतर यावर बोलणेही स्थानिक नागरिक टाळत आहेत.हातावरचे पोट असलेल्या कष्टकऱ्यांची वसाहत म्हणून ओळख असलेल्या बोंद्रेनगर परिसरात मागील पिढीने स्वत:चे अस्तित्व निर्माण केले. गगनबावडा, राधानगरी आणि शाहूवाडी तालुक्यांच्या धनगरवाड्यांमधून कामाच्या शोधात कोल्हापुरात आलेल्या लोकांनी बोंद्रेनगरात आपला तळ ठोकला.

सुरुवातीला आसपासच्या खेड्यात शेतीची कामे केली. झाडांच्या फांद्या तोडणे, जांभूळ, करवंदे विकणे अशी कामे सुरूच असतात. हळूहळू महिलांना धुणीभांडी, घरकाम अशी मोलकरणीची कामे मिळू लागली. यात चार पैसे मिळत असल्याचे लक्षात येताच त्यांचे नातेवाईक, पै-पाहुणे असा गोतावळा जमा झाला. काही तरुणांनी लक्ष्मीपुरीत हमाली केली, तर काहींनी कांदे-बटाटे आणि लसूण विक्रीचा व्यवसाय करून आपला जम बसवला. आज सुमारे दोनशे कुटुंबे या परिसरात राहत आहेत.कष्टाच्या कामात मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आता दुसरी पिढी भरकटल्याचे दिसत आहे. गेल्या काही वर्षांपासून बेरोजगारी, व्यसनाधीनता, खासगी सावकारी आणि तरुणांच्या हुल्लडबाजीमुळे या परिसराला समस्यांचे ग्रहण लागले आहे. काही कुटुंबांचा अपवाद सोडला तर अनेक कुटुंबातील तरुणांचे शिक्षण अर्ध्यावरच सुटले आहे. मिळेल ते काम करून चार पैसे मिळवण्याचा प्रयत्न यांच्याकडून होतो.

मात्र, यातील बराच पैसा व्यसनांवर खर्च होतो. काही तरुण तर आई-वडिलांच्या पैशावर केवळ मजा मारत फिरतात. त्यातून हुल्लडबाज तरुणांची टोळकी निर्माण झाली आहेत. त्यांचाच शालेय मुलांवर प्रभाव वाढताना दिसतोय.

छपरी तरुणांची टोळकीचित्रविचित्र हेअरस्टाईल्स, हातावर, मानेवर काढलेले टॅट्यू, आखूड पँट किंवा बरमुडे, भडक रंगाचे शर्ट आणि तोंडात मावा किंवा गुटख्याचा तोबरा. चौकात किंवा गल्लीच्या कोपऱ्यावर थांबून टवाळक्या करणारी तरुणांची टोळकी मुलींची छेड काढण्यात आघाडीवर आहेत. अशा टोळक्यांचा बंदोबस्त व्हावा, अशी अपेक्षा या परिसरातील महिला व्यक्त करतात.पाच वर्षांत तीन घटनागेल्या पाच वर्षांत या परिसरात तीन तरुणींनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली. यातील दोन तरुणींनी हुल्लडबाजांच्या त्रासाला कंटाळून गळफास घेतला, तर एका तरुणीसाठी नात्यातील व्यक्तीच जीवघेणी बनली. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी