शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

Ganesh Visarjan 2018 : कोल्हापूरात बाप्पांसह ‘कर्णकर्कश वाद्या’लाही निरोप, २३ तासांनी विसर्जन मिरवणुकीची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 12:24 IST

विचारांचा वारसा लाभलेल्या आणि सातत्याने नव्या बदलाच्या प्रक्रियेची कास धरणाऱ्या पुरोगामी ‘कोल्हापूर’ने रविवारी याच परंपरेतील मानदंडात आणखी एक मानाचा तुरा खोवला.

ठळक मुद्देबाप्पांसह ‘कर्णकर्कश वाद्या’लाही निरोप, पारंपारिक वाद्यांचा गजर २३ तासांनी विसर्जन मिरवणुकीची सांगता

कोल्हापूर : विचारांचा वारसा लाभलेल्या आणि सातत्याने नव्या बदलाच्या प्रक्रियेची कास धरणाऱ्या पुरोगामी ‘कोल्हापूर’ने रविवारी याच परंपरेतील मानदंडात आणखी एक मानाचा तुरा खोवला. मोठ्या कर्णकर्कश आवाजाच्या यंत्रणेला यंदा शंभर टक्के फाटा देत गणेशोत्सवाचे पावित्र्य तर जपलेच शिवाय महाराष्ट्रीय संस्कृतीचे प्रदर्शन घडवत, पारंपारिक वाद्यांचा गजरात गणरायाला निरोप दिला.

भक्तीचा आणि उत्साहाचा रविवारी सकाळी नऊ वाजता सुरु झालेला हा जल्लोष सोमवारी सकाळी आठ वाजता म्हणजे अखंडपणे २३ तासांनी संपला. सकाळी मिरवणुकीच्या सुरवातीस महापौर शोभा बोंद्रे यांना झालेली धक्काबुक्की तसेच गणपती पुढे घेण्यावरुन मंगळवार पेठेतील प्रॅक्टीस क्लब व पोलिसांमध्ये झालेला गैरसमज आणि त्यातून कार्यकर्त्यांवर झालेला लाठीमार वगळता संपूर्ण मिरवणुकीत कोठेही खुट्ट झाले नाही. या लाठीमारात मंडळाचे १३ कार्यकर्ते जखमी झाले.कोल्हापूर शहर आणि परिसरात गेल्या दहा दिवसापासून सुरु असलेल्या गणेशोत्सवाची सांगता रविवारी विसर्जन मिरवणुकीने झाली. सकाळी नऊ वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महापौर शोभा बोंद्रे, उपमहापौर महेश सावंत, पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, माजी महापौर आर. के. पोवार, अ‍ॅड. धनंजय पठाडे, वसंत मुळीक, विजय देवणे, दिलीप देसाई, लाला गायकवाड, उदय गायकवाड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून आणि श्रींची आरती करुन मिरवणुकीला सुरवात झाली.

परंपरेनुसार मंगळवार पेठेतील तुकाराम माळी तालीम मंडळाला यंदाही मिरवणुकीत अग्रभागी राहण्याचा मान मिळाला. मंडळाची मूर्ती पालखीत ठेवण्यात आली होती. ही पालखी काही अंतर मान्यवरांनी वाहून नेली. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणलेल्या श्रीमंत प्रतिष्ठाणच्या ढोल ताशा पथकाने वातावरणात जल्लोष निर्माण केला. हा जल्लोष पुढे सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत अखंडपणे टिकून राहिला.मिरवणुकीला प्रारंभ होण्याआधीच शहरातील अनेक मंडळांनी आपल्या मूर्ती परस्पर विसर्जनाकरीता पंचगंगा नदी घाट तसेच इराणी खण येथे नेल्या. सकाळी लवकर बाहेर पडून विसर्जन करण्याच्या हेतूने मंडळांचे कार्यकर्ते बाहेर पडल्यामुळे सकाळी नऊ वाजल्यापासूनच सातत्य निर्माण झाले.

मिरवणुकीत कर्णकर्कश ध्वनी यंत्रणेला पूर्णपणे बगल देत सर्वच मंडळांनी प्रत्यक्ष कृतीतून डॉल्बीमुक्तीचा संदेश दिला. हालगी, ढोल - ताशे, झांज, बेंजो, धनगरी ढोल, बी ढबाक, बॅँड, सनई चौघडे अशा पारंपारिक वाद्यांचा गजर केला. अगदी मोजक्या मंडळांनी मिरवणुकीत कमी तिव्रतेचा स्टेरिओ लावल्याचे पहायला मिळाले. अनेक मंडळांनी तर त्याही पुढे जात केवळ टाळ्यांचा गजर करत मूर्ती विसर्जनासाठी नेली.|डॉल्बीला पर्याय म्हणून मोठ्या मंडळांनी लेसर शो, लाईटस् इफेक्ट आणले होते. त्याच्या सोबतील आॅक्रेस्ट्रा पथके होती. मिरवणुकीचे तेच मुख्य आकर्षण ठरले. मंगळवार पेठेतील प्रक्टीस क्लब - सुबराव गवळी तालीम, पाटाकडील तालीम, दिलबहार तालीम, बालगोपाल, शिवाजी पेठेतील वेताळ तालीम, खंडोबा तालीम, बीजीएम स्पोर्टस, झुंजार क्लब, हिंदवी स्पोर्टस्, दयावान, शहाजी तरुण मंडळ, उत्तरेश्वर पेठेतील वाघाची तालीम, जुना बुधवार तालीम, गुजरी मित्र मंडळ आदी मंडळांचा त्यामध्ये समावेश होता. तटाकडील तालीम मंडळाने मुंबई येथील कलापथक आणले होते. या पथकाने बहारदार लोकनृत्य सादर करुन कोल्हापूरकरांची मने जिंकली. शाहूपुरी युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणलेला ‘हिंदवी स्वराज्याची शपथ’हा चित्ररथ लक्षवेधी ठरला.मोठे थर लावून रचलेल्या लाईट इफेक्टस् व लेसर शो आणणाऱ्या मंडळांचे गणपती पोलिसांनी लवकर मुख्य मिरवणुकीत येऊ दिले नाहीत. बिनखांबी गणेश मंदिर आणि तारावाई रोडवरील सरस्वती चित्रमंदिर येथे पोलिस व्हॅन आडव्या लावल्या होत्या. मिरवणुक न रेंगाळता ती लवकर पुढे सरकत रहावी हा हेतू पोलिसांचा होता. मात्र तरीही मिरजकर तिकटीकडून आलेल्या प्रॅक्टीस क्लब, पाटाकडील, दिलबहार तालीम तर खरी कॉर्नरकडून आलेल्या शहाजी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुढे सरकण्यास बराच वेळ घेतल्यामुळे मिरवणुक रेंगाळली.

सायंकाळी सात नंतर मिरवणुक चांगलीच रेंगाळली. सायंकाळी सात ते रात्री साडे नऊ या वेळेत महाद्वार चौक ते पापाची तिकटी या मार्गावर एकही मंडळ नव्हते. त्यामुळे पोलिसांनी थोडा दबाब तंत्राचा अवलंब करत आधी शहाजी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांना पुढे ढकलत नेले. त्यानंतर मिरवणुकीला गती प्राप्त झाली. ती सोमवारी पहाटेपर्यंत कायम राहिली.मुख्यमिरवणुकीचा सांगता सोमवारी सकाळी साडेसात वाजता मिरजकर तिकटी येथे झाली. त्याठिकाणी पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, पोलिस उपाधीक्षक प्रशांत अमृतकर, सुरज गुरव, आर. आर. पाटील यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मिरवणुकीतील शेवटचा गणपती क्रांतीवीर भगतसिंह तरुण मंडळ विक्रमनगर यांनी पंचगंगा नदीत विसर्जीत केला.

 

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनkolhapurकोल्हापूर