शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Ganesh Visarjan 2018 : कोल्हापूरात बाप्पांसह ‘कर्णकर्कश वाद्या’लाही निरोप, २३ तासांनी विसर्जन मिरवणुकीची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 12:24 IST

विचारांचा वारसा लाभलेल्या आणि सातत्याने नव्या बदलाच्या प्रक्रियेची कास धरणाऱ्या पुरोगामी ‘कोल्हापूर’ने रविवारी याच परंपरेतील मानदंडात आणखी एक मानाचा तुरा खोवला.

ठळक मुद्देबाप्पांसह ‘कर्णकर्कश वाद्या’लाही निरोप, पारंपारिक वाद्यांचा गजर २३ तासांनी विसर्जन मिरवणुकीची सांगता

कोल्हापूर : विचारांचा वारसा लाभलेल्या आणि सातत्याने नव्या बदलाच्या प्रक्रियेची कास धरणाऱ्या पुरोगामी ‘कोल्हापूर’ने रविवारी याच परंपरेतील मानदंडात आणखी एक मानाचा तुरा खोवला. मोठ्या कर्णकर्कश आवाजाच्या यंत्रणेला यंदा शंभर टक्के फाटा देत गणेशोत्सवाचे पावित्र्य तर जपलेच शिवाय महाराष्ट्रीय संस्कृतीचे प्रदर्शन घडवत, पारंपारिक वाद्यांचा गजरात गणरायाला निरोप दिला.

भक्तीचा आणि उत्साहाचा रविवारी सकाळी नऊ वाजता सुरु झालेला हा जल्लोष सोमवारी सकाळी आठ वाजता म्हणजे अखंडपणे २३ तासांनी संपला. सकाळी मिरवणुकीच्या सुरवातीस महापौर शोभा बोंद्रे यांना झालेली धक्काबुक्की तसेच गणपती पुढे घेण्यावरुन मंगळवार पेठेतील प्रॅक्टीस क्लब व पोलिसांमध्ये झालेला गैरसमज आणि त्यातून कार्यकर्त्यांवर झालेला लाठीमार वगळता संपूर्ण मिरवणुकीत कोठेही खुट्ट झाले नाही. या लाठीमारात मंडळाचे १३ कार्यकर्ते जखमी झाले.कोल्हापूर शहर आणि परिसरात गेल्या दहा दिवसापासून सुरु असलेल्या गणेशोत्सवाची सांगता रविवारी विसर्जन मिरवणुकीने झाली. सकाळी नऊ वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महापौर शोभा बोंद्रे, उपमहापौर महेश सावंत, पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, माजी महापौर आर. के. पोवार, अ‍ॅड. धनंजय पठाडे, वसंत मुळीक, विजय देवणे, दिलीप देसाई, लाला गायकवाड, उदय गायकवाड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून आणि श्रींची आरती करुन मिरवणुकीला सुरवात झाली.

परंपरेनुसार मंगळवार पेठेतील तुकाराम माळी तालीम मंडळाला यंदाही मिरवणुकीत अग्रभागी राहण्याचा मान मिळाला. मंडळाची मूर्ती पालखीत ठेवण्यात आली होती. ही पालखी काही अंतर मान्यवरांनी वाहून नेली. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणलेल्या श्रीमंत प्रतिष्ठाणच्या ढोल ताशा पथकाने वातावरणात जल्लोष निर्माण केला. हा जल्लोष पुढे सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत अखंडपणे टिकून राहिला.मिरवणुकीला प्रारंभ होण्याआधीच शहरातील अनेक मंडळांनी आपल्या मूर्ती परस्पर विसर्जनाकरीता पंचगंगा नदी घाट तसेच इराणी खण येथे नेल्या. सकाळी लवकर बाहेर पडून विसर्जन करण्याच्या हेतूने मंडळांचे कार्यकर्ते बाहेर पडल्यामुळे सकाळी नऊ वाजल्यापासूनच सातत्य निर्माण झाले.

मिरवणुकीत कर्णकर्कश ध्वनी यंत्रणेला पूर्णपणे बगल देत सर्वच मंडळांनी प्रत्यक्ष कृतीतून डॉल्बीमुक्तीचा संदेश दिला. हालगी, ढोल - ताशे, झांज, बेंजो, धनगरी ढोल, बी ढबाक, बॅँड, सनई चौघडे अशा पारंपारिक वाद्यांचा गजर केला. अगदी मोजक्या मंडळांनी मिरवणुकीत कमी तिव्रतेचा स्टेरिओ लावल्याचे पहायला मिळाले. अनेक मंडळांनी तर त्याही पुढे जात केवळ टाळ्यांचा गजर करत मूर्ती विसर्जनासाठी नेली.|डॉल्बीला पर्याय म्हणून मोठ्या मंडळांनी लेसर शो, लाईटस् इफेक्ट आणले होते. त्याच्या सोबतील आॅक्रेस्ट्रा पथके होती. मिरवणुकीचे तेच मुख्य आकर्षण ठरले. मंगळवार पेठेतील प्रक्टीस क्लब - सुबराव गवळी तालीम, पाटाकडील तालीम, दिलबहार तालीम, बालगोपाल, शिवाजी पेठेतील वेताळ तालीम, खंडोबा तालीम, बीजीएम स्पोर्टस, झुंजार क्लब, हिंदवी स्पोर्टस्, दयावान, शहाजी तरुण मंडळ, उत्तरेश्वर पेठेतील वाघाची तालीम, जुना बुधवार तालीम, गुजरी मित्र मंडळ आदी मंडळांचा त्यामध्ये समावेश होता. तटाकडील तालीम मंडळाने मुंबई येथील कलापथक आणले होते. या पथकाने बहारदार लोकनृत्य सादर करुन कोल्हापूरकरांची मने जिंकली. शाहूपुरी युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणलेला ‘हिंदवी स्वराज्याची शपथ’हा चित्ररथ लक्षवेधी ठरला.मोठे थर लावून रचलेल्या लाईट इफेक्टस् व लेसर शो आणणाऱ्या मंडळांचे गणपती पोलिसांनी लवकर मुख्य मिरवणुकीत येऊ दिले नाहीत. बिनखांबी गणेश मंदिर आणि तारावाई रोडवरील सरस्वती चित्रमंदिर येथे पोलिस व्हॅन आडव्या लावल्या होत्या. मिरवणुक न रेंगाळता ती लवकर पुढे सरकत रहावी हा हेतू पोलिसांचा होता. मात्र तरीही मिरजकर तिकटीकडून आलेल्या प्रॅक्टीस क्लब, पाटाकडील, दिलबहार तालीम तर खरी कॉर्नरकडून आलेल्या शहाजी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुढे सरकण्यास बराच वेळ घेतल्यामुळे मिरवणुक रेंगाळली.

सायंकाळी सात नंतर मिरवणुक चांगलीच रेंगाळली. सायंकाळी सात ते रात्री साडे नऊ या वेळेत महाद्वार चौक ते पापाची तिकटी या मार्गावर एकही मंडळ नव्हते. त्यामुळे पोलिसांनी थोडा दबाब तंत्राचा अवलंब करत आधी शहाजी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांना पुढे ढकलत नेले. त्यानंतर मिरवणुकीला गती प्राप्त झाली. ती सोमवारी पहाटेपर्यंत कायम राहिली.मुख्यमिरवणुकीचा सांगता सोमवारी सकाळी साडेसात वाजता मिरजकर तिकटी येथे झाली. त्याठिकाणी पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, पोलिस उपाधीक्षक प्रशांत अमृतकर, सुरज गुरव, आर. आर. पाटील यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मिरवणुकीतील शेवटचा गणपती क्रांतीवीर भगतसिंह तरुण मंडळ विक्रमनगर यांनी पंचगंगा नदीत विसर्जीत केला.

 

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनkolhapurकोल्हापूर