शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

गावाकडचा गणेशोत्सव...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 00:25 IST

राजाराम लोंढेगणेशोत्सव म्हणजे लहानपणी पर्वणी असायची, त्याला कारणेही तशीच होती. पूर्वी गणेशोत्सव काळात शाळेला सुटी नसायची. पाच दिवस शाळेला दांडीच असायची. ज्येष्ठ मंडळी दिवसभर शेतात राबून आली तरी घरातील मंगलमय वातावरणाने त्यांच्या अंगातील कामाचा शीण निघून जायचा. गणेशोत्सवाच्या आठ दिवस अगोदर घरी लगबग सुरू व्हायची. तरुणांची आकर्षक सजावट (आरास) करण्यासाठी ...

राजाराम लोंढेगणेशोत्सव म्हणजे लहानपणी पर्वणी असायची, त्याला कारणेही तशीच होती. पूर्वी गणेशोत्सव काळात शाळेला सुटी नसायची. पाच दिवस शाळेला दांडीच असायची. ज्येष्ठ मंडळी दिवसभर शेतात राबून आली तरी घरातील मंगलमय वातावरणाने त्यांच्या अंगातील कामाचा शीण निघून जायचा. गणेशोत्सवाच्या आठ दिवस अगोदर घरी लगबग सुरू व्हायची. तरुणांची आकर्षक सजावट (आरास) करण्यासाठी गल्लीत स्पर्धा असायची. केळीच्या मोन्यापासून घरातच मंदिर उभे करून मंदिरासमोर सामाजिक प्रबोधनपर, तांत्रिक देखावे उभे करायचे. घराबरोबरच सहकारी संस्था, शाळांमध्येही गणपतीसमोर आकर्षक सजावट केली जायची. सजावट व तांत्रिक देखावे पाहण्याच्या निमित्ताने एकमेकांच्या गाठीभेठी होत; त्यातून विचारपूस व्हायची आणि आपलेपणा वृद्धिंगत व्हायचा, हा यामागील हेतू होता.गणेश चतुर्थीदिवशी तर घरातील सगळ्यांच्या आनंदाला पारावार राहत नव्हता. महिला वर्ग सकाळी लवकर उठून घरातील कामे उरकण्याच्या गडबडीत असायच्या, तर पुरुष मंडळी गणपती आणण्यासाठी एकमेकांना ‘झाली का तयारी?’ असे विचारत. त्यानंतर गल्लीतील सर्वजण एकत्रपणे कुंभारवाड्यात जात आणि टाळ-मृदंगांच्या निनादात गणरायाचे आगमन व्हायचे. फटाक्यांची आतषबाजी होत नव्हती. लहान केपांची पिस्तुले असायची. पिस्तुले मिळाली नाही तर केपांतील माळ दगडावर आपटून वाजवली जायची. पाच हजारांची भलीमोठी फटाक्यांची माळ लावल्यानंतर जेवढा आनंद मिळायचा नाही, तेवढा आनंद केपा वाजवून मिळत होता. केपा उडवत ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर व तितक्याच भक्तिभावात बाप्पांचे जल्लोषात व उत्साही स्वागत केले जायचे. सकाळची आरती झाल्यानंतर सायंकाळी गहू, गूळ आणि त्यात ओल्या नारळाचे खोबरे घालून बनविलेली खीर, मोदकाचा नैवैद्य असायचा. सायंकाळी जेवताना नुसते गव्हाच्या खिरीत कोरे दूध घालून खाण्याचा आनंद काही वेगळाच होता. तिसऱ्या दिवशी गौराईचे आगमन व्हायचे. त्या दिवशी तर घरातील महिला वर्गाची कमालीची लगबग असायची. गौराईला घरात घेऊन तिला सजविण्यासाठी शेजारी-पाजाºयांची ईर्षाच लागायची. सायंकाळी गौराईला भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखविला जायचा. गल्लीतील प्रत्येक घरातून भाजी-भाकरीची देवाणघेवाण व्हायची. वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या भाज्या, तांदळाच्या भाकरीची गोडी काही औरच होती. आठ दिवस महिला गौरी गीतांनी रात्री जागवायच्या; पण गौरी आल्यानंतर गावातील प्रत्येक तिकटीवर महिला एकत्रित येत. दिवसभर शेतात काम करून कितीही कंटाळा आला तरी जेवण उरकून खेळायला जाण्यासाठी प्रत्येकीची लगबग असायची. झिम्मा-फुगडी, काटवटकणा, घागर घुमविणे, आदी खेळांत महिलांच्या ईर्षा लागायच्या. अस्सल ग्रामीण ढंगात गौरीगीतांत दंग झालेल्या महिलांचे खेळ पाहून डोळ्यांचे पारणे फिटायचे. एरव्ही सार्वजनिक ठिकाणी आपली कला सादर करण्यास आडवी येणारी संस्कृती यावेळी मात्र झुगारली जायची. घरातीलही ज्येष्ठांचीही त्याला आडकाठी नसल्याने माहेरवाशीण पदर खोचून मनमुरादपणे खेळाचा आनंद घ्यायच्या. पाच-सहा दिवस घरातील, गल्लीतील आबालवृद्ध गणेशोत्सवात दंग होऊन जायचे.विसर्जनाचा दिवस आला की मन दु:खी व्हायचे. मंगलमय वातावरणात कधी पाच-सहा दिवस गेले हे कळतच नव्हते. विसर्जनादिवशी जड अंत:करणाने गौरी-गणपती नियोजन करायचे. हमखास पावसाने ओढ दिल्याने खरपाड पडायचे, त्यामुळे उन्हाचा तडाखाही जास्त असायचा. त्यामुळे दुपारनंतर हळूहळू गल्लीतील ज्येष्ठ मंडळी गोळा व्हायची. चार-साडेचार वाजता गणराया घराबाहेर पडायचे. त्याचवेळी गौराई आणि शंकरोबाही विसर्जनासाठी बाहेर निघायचे. महिला वर्ग नटून-थटून गौराई डोक्यावर घेऊन गणपतीबरोबर असायचा. गणराया बाहेर पडले की, लहान मुलांची पिस्तुले आणि केपा बाहेर निघायच्या. घरातील महिलांनी गणरायांच्या पायांवर पाणी घातल्यानंतर तीन वेळा मागे वळून पाहिले की गणराया पुढे सरकायचे. ‘गजानना गजानना, श्रीपाद वल्लभ गजानन....’, ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, ‘गणेश गणेश मोरया’चा जयघोष आणि चिरमुºयांची उधळण करीत नदी, तलावाकडे वाटचाल सुरू व्हायची. विसर्जनाच्या ठिंकाणी शेवटची आरती सामुदायिकपणे आणि एका सुरात व्हायची; त्यामुळे विसर्जन ठिकाणचे वातावरणही भावनिक व्हायचे. नारळ वाढविल्यानंतर त्याचे काढलेले खोबरे व चिरमुरे एकत्रित करून घरी येईपर्यंत वाटेत भेटेल त्याला प्रसाद दिला जायचा. ही कामगिरी लहान मुलांकडे असल्याने उरल्यासुरल्या केपा संपवत भेटेल त्याला प्रसाद देत कधी घर आले हे कळायचे नाही. घरात आल्यानंतर मन सुन्न व्हायचे. पाच दिवस सुरू असलेली लगबग एकदमच थंड झाल्याने मन उदास व्हायचे.