शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

आठवडाभर आधीच श्रीगणेशा, कोल्हापुरात मंडळाच्या सोयीने मिरवणुका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 17:12 IST

अनंत चतुर्दशीलाच मिरवणुका काढण्याच्या पोलिसांनी केलेल्या आवाहनाला फाटा

कोल्हापूर : खरेतर वर्षभर गणपती बाप्पाच्या आगमनाची सर्वांना ओढ लागून राहिलेली असते. कोल्हापुरातील अनेक सार्वजनिक गणेश मंडळे गणेश आगमन आणि विसर्जनासाठी सोयीनुसार मिरवणुका काढतात. श्रीगणेश चतुर्थी ७ सप्टेंबरला आहे. मात्र, आठवडाभर आधीच शहरातील मोठ्या गणेश मंडळांनी दणक्यात आगमन सोहळ्याच्या मिरवणुका सुरू केल्या आहेत. पहिल्याच दिवशी मूर्ती भाविकांना खुली व्हावी, हा यामागचा खरा हेतू आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव सोहळा जोषपूर्ण वातावरणात साजरा होत आहे. तिथी, मुहूर्त, प्रमाण वेळा पाहून आगमन सोहळा, प्रतिष्ठापना केली जाते. मात्र, यंदा सार्वजनिक मंडळांनी याचे भान ठेवलेले दिसत नाही. गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशीलाच मिरवणुका काढण्याचे आवाहन पोलिसांनी केले असले तरी त्याला फाटा दिला जात आहे. यंदा २१ फुटी अनेक गणेशमूर्ती मुंबईहून मागवण्यात आल्यामुळे त्यांचा आगमन सोहळा मंडळांकडून थाटात होत आहे. मुंबईत लालबाग येथे तयार झालेल्या रंकाळवेशचा २१ फुटी लालबागचा राजा सर्वांत प्रथम कोल्हापुरात दाखल झाला. 

गणेश चतुर्थीलाच दर्शन खुले करण्याचे नियोजनअनेक मोठ्या गणेश मंडळांना त्यांच्या गणेशमूर्ती मंडपात विराजमान झाल्यानंतर सजावट, देखावे करण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे देखावे खुले करण्यासाठी गणेश चतुर्थीनंतर दोन ते तीन दिवस जातात. ते टाळण्यासाठी यंदा आठवडाभर आधीच मूर्ती मंडपात विराजमान केली तर देखावे आणि सजावट करणे सोयीचे जाते आणि चतुर्थीलाच देखावे सर्वांसाठी खुले करता येतात, म्हणून हे नियाेजन मंडळांनी केले आहे.ढोलपथक, लेसर शोच्या तारखांनुसार मिरवणुकामिरवणुकांसाठी ढाेल पथके, ध्वनियंत्रणा, लेसर शोची यंत्रणा एकाच दिवशी सर्वांना उपलब्ध होत नाही. त्यामुळे सोयीच्या दिवशी मिरवणूक काढल्या जात असल्याचे कारण मंडळांकडून दिले आहे.

साउंड सिस्टमवर निर्बंधसाउंड सिस्टमवर निर्बंध असल्यामुळेही पारंपरिक वाद्यांसोबत ढोल-ताशा पथक, इतर ध्वनियंत्रणा, लेसर शो यासारख्या यंत्रणांवर मंडळांनी भर दिला आहे.

स्वत:चे अस्तित्व दाखवण्याची संधीअनेक मंडळांना गर्दीत आपल्या गणेशमूर्तीचे आगमन सोहळा साजरा करायचा नसतो. आपल्याच मंडळाची मूर्ती कशी चांगली आणि आमचेच मंडळ कसे चांगले याकडे लक्ष वेधण्याची आणि स्वत:चे अस्तित्व दाखवण्याची ही संधी मंडळ साधून घेत आहेत.

पाटाकडील तालीम मंडळाची गणेशमूर्ती जेथे विराजमान होते, ती जागा चिंचोळी आहे. तेथे सजावट लवकर करणे सोयीचे व्हावे, तसेच ३५ ते ४० देणगीदारांचा योग्य सन्मान व्हावा, भक्तांना पहिल्या दिवसांपासूनच दर्शन मिळावे, कार्यकर्त्यांना घरचा व गल्लीतल्या छोट्या मंडळांच्या गणपती उत्सवात सहभागी होता यावे यासाठी तालमीचा गणपती लवकर आणण्याचे ठरवले. -प्रसाद अनिल देवणे, अध्यक्ष, पाटाकडील तालीम मंडळ, गणेशोत्सव समिती.तुकाराम माळी तालमीला यंदा दीडशे वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने गणपतीसाठी ३० बाय ६० मंडप घातला आहे. दहा दिवसांच्या विविध कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. त्यासाठी तसेच पहिल्या दिवसांपासून दर्शन मिळावे यासाठी गणपती आगमन सोहळा लवकर केला. -प्रफुल्ल मेथे, अध्यक्ष, तुकाराम माळी तालीम मंडळ.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGanesh Mahotsavगणेशोत्सव