शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

Kolhapur: 'गडहिंग्लज जनता दल'  कोणत्या वाटेने?; श्रीपतराव शिंदे यांच्या पश्चात पहिलाच व्यापक मेळावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 13:00 IST

लोकांचे प्रश्न सत्तेमुळे नव्हे तर संघर्षातूनच सुटतात,यावरच शिंदेंचा ठाम विश्वास होता

राम मगदूमगडहिंग्लज : धर्मनिरपेक्ष जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिवंगत माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या पश्चात गडहिंग्लज विभागातील कार्यकर्त्यांचा पहिलाच  मेळावा आज, मंगळवारी होत आहे. त्यामुळे 'गडहिंग्लज'चा जनता दल देवेगौडांच्या की शिंदेंच्या वाटेने जाणार? याची उत्सुकता कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला आहे.गेल्या तीन दशकात महाराष्ट्रासह देशातील राजकारणात अनेक उलथापालथी झाल्या. एकेकाळी देशात आणि राज्यातील सत्तेत भागीदार असलेल्या जनता दलाचीही अनेक छकले झाली. परंतु, माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी कर्नाटकात आणि महाराष्ट्रात केवळ शिंदेनी आपल्या तालुक्यात अस्तित्व टिकवले.'समाजवादी पक्ष ते जनता दल' वाटचालीत शिंदे अखेरपर्यंत पक्षाशी एकनिष्ठ राहिले. म्हणूनच कोल्हापूर जिल्हयासह राज्याच्या राजकारणात त्यांचे नाव चर्चेत राहिले. देशात- राज्यात पक्षाची कुठेही सत्ता नसतानाही त्यांनी गडहिंग्लज नगरपालिका व कारखान्यावरील वर्चस्व कायम राखले. त्यामुळे चंदगड व कागल मतदारसंघात  त्यांची भूमिका निर्णायक राहिली.शिंदेंच्या कन्या माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनीही वडीलांचा विचार आणि वारसा पुढे चालवण्याचा इरादा शोकसभेतच स्पष्ट केला आहे. दरम्यान,कार्यकर्त्यांनी पक्षनेतृत्वाची धुरा त्यांच्याकडेच सोपवल्यामुळे त्यांच्या भूमिकेवरच येथील वाटचाल अवलंबून आहे.दरम्यान,माजी पंतप्रधान देवेगौडा,त्यांचे सुपुत्र माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी घेतलेला भाजपप्रणित आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय महाराष्ट्रातील अनेक  कार्यकर्त्यांना रूचलेला नाही. त्यामुळे कांहीजण आमदार अबु आझमी यांच्या समाजवादी पक्षात गेले. परंतु, शिंदेंनी घडवलेल्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर अजूनही 'मोळीवाल्या बाई'चीच पताका आहे. 

तर 'तिथे'च पोहचणार!गडहिंग्लज शहरात राष्ट्रवादी हाच जनता दलाचा पारंपरिक राजकीय शत्रू आहे. अलिकडेच तीन प्रमुख माजी नगरसेवकांनी  राष्ट्रवादीत जावून मुश्रीफांच्या नेतृत्वाखाली काम सुरू केले आहे. त्यामुळे 'तिथे' अजिबात जाणार नाही,असे स्वाती कोरींनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. परंतु,देवगौडांच्या वाटेने गेल्यास त्या तिथेच पोहचणार आहेत.

'इंडिया आघाडी'च पर्याय स्वाती कोरींच्याकडे नगरपालिका, कारखाना, कुक्कुटपालन, तंत्रनिकेतनमधील कामाचा अनुभव, संघटन कौशल्य, वक्तृत्व कला आहे.त्यामुळे येत्या विधानसभेला कागल व चंदगड दोन्ही मतदारसंघात त्यांना उमेदवारीची आहे.परंतु, त्यासाठी 'इंडिया आघाडी' हाच चांगला पर्याय असून लोकसभा निवडणुकीतच निर्णय घ्यावा लागणार आहे.

'शिंदें'चा विश्वास संघर्षावरच !लोकांचे प्रश्न सत्तेमुळे नव्हे तर संघर्षातूनच सुटतात,यावरच शिंदेंचा ठाम विश्वास होता.त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या अमिषाला बळी न पडता ते अखेरपर्यंत रस्त्यावरची लढाई लढत राहिले.धर्मांध व जातीयवादी शक्तींशी कधीच हातमिळवणी केली नाही.त्यांचा हाच विचार लोकांचे मनोबल वाढवणारा आणि पक्षाला उभारी देणारा आहे.त्याचे भान ठेवूनच निर्णय व्हावा, अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण