शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लज साखर कारखाना :ब्रिस्क कंपनी जाणार..मग कोण येणार..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 13:22 IST

ब्रिस्क कंपनीच्या विनंतीनुसार गडहिंग्लज साखर कारखान्याचा ताबा १० एप्रिलपर्यंत संचालक मंडळाकडे सोपविण्याचा आदेश सहकार खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंदकुमार यांनी बुधवारी (३१ मार्चला) दिला. त्यामुळे ब्रिस्क जाणार हे नक्की झाले. परंतु, त्यानंतर कारखाना चालविण्यासाठी दुसरी कंपनी येणार ? की संचालक मंडळ स्व:बळावर कारखाना चालविणार ? याकडे गडहिंग्लजसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आहे.

ठळक मुद्देगडहिंग्लज साखर कारखाना :ब्रिस्क कंपनी जाणार..मग कोण येणार..?संचालक स्वबळावर चालविणार की दुसरी कंपनी बोलविणार ?

राम मगदूम

गडहिंग्लज : ब्रिस्क कंपनीच्या विनंतीनुसार गडहिंग्लज साखर कारखान्याचा ताबा १० एप्रिलपर्यंत संचालक मंडळाकडे सोपविण्याचा आदेश सहकार खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंदकुमार यांनी बुधवारी (३१ मार्चला) दिला. त्यामुळे ब्रिस्क जाणार हे नक्की झाले. परंतु, त्यानंतर कारखाना चालविण्यासाठी दुसरी कंपनी येणार ? की संचालक मंडळ स्व:बळावर कारखाना चालविणार ? याकडे गडहिंग्लजसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आहे.२०१३-१४ मध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी आर्थिक अरिष्टात सापडलेला हा कारखाना शासनाच्या आदेशानुसार ब्रिस्कला ४३ कोटीच्या बदल्यात १० वर्षांसाठी सहयोग तत्वावर चालवायला दिला. परंतु, कारखान्याची जुनी मशिनरी साथ देत नसल्यामुळे आणि पोषक वातावरण नसल्यामुळे मुदत संपण्यापूर्वीच कारखाना सोडण्याचा निर्णय कंपनीने घेतल्याने सहकार खात्याने त्याला मान्यता दिली आहे.दरम्यान, दबावापोटी किंवा अत्यावश्यक बाब म्हणून सभासदांना वाटलेली सवलतीची साखर वाटप, कामगारांचे फिटमेंट, प्रदूषण नियंत्रणासाठी उभारलेला प्लँट, युनियन बँक आणि स्टेट बँकेची देणी, मशिनरीचे आधुनिकीकरण यामुळे कराराव्यतिरिक्त सुमारे ३८ कोटीचा अतिरिक्त खर्च झाल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. स्व:बळावर चालवायचा असेल तर कारखान्याने किंवा चालवायला घेणाऱ्यांनी ही रक्कम द्यावी अशी ब्रिस्कची मागणी आहे.याउलट, तत्कालीन संचालक मंडळ आणि कंपनीतील चर्चेनुसार वाटलेल्या सवलतीच्या साखरेच्या दरातील फरकाची रक्कम विद्यमान संचालकांना मान्य नाही. ४३ कोटीपैकी ३ कोटी २६ लाख, कार्यालयीन खर्चासाठी १ कोटी २५ लाख, कामगार सोसायटीचे २ कोटी आणि कारखान्याच्या स्टोअरमधील साहित्याचे व ऊस बिलातील कपातीचे मिळून ६३ लाख अशी कोट्यवधीची रक्कम कंपनीकडूनच येणे आहे असे कारखान्याचे म्हणणे आहे. त्यामुळे दोघांच्याही येणी-देणीचा विषय वादाचा ठरण्याची शक्यता आहे. स्व. नलवडे यांचा विचारच तारेल !१९७० च्या दशकात संस्थापक आप्पासाहेब नलवडे यांनी अवघ्या ११ महिन्यात कारखान्याची उभारणी करून सरकारचे भागभांडवल परत देण्याचा पराक्रम केला. परंतु, राजकारणी मंडळींना गेटच्या आत येवू न देण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे तालुक्यातील सर्व पुढाऱ्यांनी एकत्र येवून त्यांना सत्तेवरून दूर केले. त्यानंतर  आघाडयांचे राजकारण आणि गैरव्यवस्थापन यामुळेच कारखाना आर्थिक अडचणीत आला. त्याची परिणीती म्हणूनच खाजगी कंपनीला कारखाना चालवायला देण्याची वेळ आली. म्हणूनच, आता पुन्हा स्व. नलवडे यांच्या विचारानेच पुढे जाण्याची गरज आहे, असे जाणकारांचे मत आहे.

कामगारांची देणी कळीची ठरणारसेवानिवृत्त कामगारांनी आपल्या थकित देणीसाठी गेल्या अडीच महिन्यापासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. याशिवाय कामावरील कामगारांची व त्यांच्या सोसायटीच्या देणीचा मुद्दाही कळीचा ठरणार आहे.शेतकऱ्यांना ऊसाची..कामगारांना भाकरीची चिंता..!ब्रिस्कने शेतकऱ्यांची ऊसबीले, तोडणी-वाहतूकदारांची बीले व कामगारांचा पगार वेळेवर दिला. म्हणूनच शेतकरी व कामगार निश्चिंत होते. परंतु, कंपनीने कारखाना सोडायचा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या ऊसाच्या गाळपाची तर कामगारांना भाकरीची चिंता लागली आहे.

 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर