शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

गडहिंग्लज कारखाना : बिनपैशाचा कारखाना प्रशासक मंडळ चालवणार तरी कसा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 11:25 IST

शासनाने संचालकांतील संघर्षापेक्षा लोकभावनेचा आदर करावा, अशी अपेक्षा कारखान्याच्या सभासदांतून व्यक्त होत आहे.

राम मगदूमगडहिंग्लज : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा ४३ वा गळीत हंगाम केवळ शेतकरी व कामगारांच्या प्रबळ इच्छाशक्तीतूनच सुरू झाला. त्यामुळेच शासनाने संचालकांतील संघर्षापेक्षा लोकभावनेचा आदर करावा, अशी अपेक्षा कारखान्याच्या सभासदांतून व्यक्त होत आहे. तद्वत बिनपैशाचा कारखाना प्रशासक मंडळातील अधिकारी तरी कसे चालवणार? असा सवालही जनतेतून विचारला जात आहे.

२०१३ मध्येदेखील कारखान्याची अवस्था अशीच झाली होती. त्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकाराने ४३ कोटींच्या बदल्यात १० वर्षांसाठी कारखाना सहयोग तत्त्वावर ब्रिस्क कंपनीला चालवायला देण्यात आला होता. परंतु, अद्याप दोन वर्षे मुदत असतानाच गेल्या वर्षी मार्चच्या अखेरीस कंपनीने कारखाना सोडला.

दरम्यान, सर्व संचालकांनी एकमताने ठराव करून कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे सर्वाधिकार कारखान्याचे अध्यक्ष श्रीपतराव शिंदे व उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे यांना दिले. त्यानंतर विशेष सभा घेऊन कारखाना स्वबळावर किंवा चालवायला देण्याचा निर्णयदेखील एकमताने झाला. परंतु, कारखान्याचे नक्त मूल्य उणे असल्यामुळे कोणत्याही वित्तीय संस्थांकडून अर्थसाहाय्य उपलब्ध न झाल्यामुळे कारखाना स्वबळावर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

गडहिंग्लज व चंदगड तालुक्यातील काही सहकारी संस्थांनी ठेवीच्या स्वरूपात कारखान्याला मदत केली. नऊ महिन्यांचा पगार थकलेला असतानाही कर्तव्यभावनेतून कारखाना सुरू करण्यासाठी कामगार अहोरात्र झटले. त्यामुळेच कारखाना सुरू झाला.

अवघ्या चार कोटींत सुरू झालेल्या कारखान्यात आजअखेर ७० हजार क्विंटल साखर आणि २ लाख ६५ हजार लिटर्स स्पिरीट उत्पादित झाली आहे. त्याची एकूण किंमत सुमारे २४ कोटी होते. तथापि, किमान १२ कोटी तोट्याचे गणित आणि अध्यक्षांवर मनमानी कारभाराचा आरोप करून १२ संचालकांनी संचालकपदाचे राजीनामे दिले आहेत. त्यामुळेच प्रशासक मंडळाची नियुक्ती झाली होती.

‘बहुमत’ राजीनाम्यासाठी ?

१२ संचालकांनी नेटाने बहुमताने कारखाना चालविण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा होता. मात्र, राजीनामे देऊन चालू हंगामात व्यत्यय आणला, अशीच भावना जनतेत निर्माण झाली आहे. प्रशासक नियुक्तीमुळे त्याला पुष्टीच मिळाली.

'बहुमत' राजीनाम्यासाठी

२०१३मध्ये तत्कालीन अध्यक्ष शिंदे यांच्याविरूद्ध अविश्वास ठराव आणून १५ संचालकांनी कारखाना ‘ब्रिस्क’ला चालवायला दिला होता. त्यानंतर आता १२ संचालकांनी त्यांच्याविरूद्ध ‘मनमानी’चा आरोप केला आहे. गेल्यावेळच्या बंडात त्यांचे सहकारी होते तर यावेळच्या बंडात विरोधकही सामील आहेत.

तोपर्यंत प्रशासक नेमा..!

आर्थिक अरिष्टातून कारखाना बाहेर येईपर्यंत शासनाने कारखान्यावर कायमचाच शासकीय प्रशासक नेमावा. त्यासाठी शासनाकडूनच अर्थसहाय्य उपलब्ध करावे. सुस्थितीत आल्यानंतरच तो शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावा, अशी मागणीही जाणकार सभासदांतून होत आहे.

वादापासून मंत्री दूर !

मंत्री हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली बहुमताने निवडून आलेल्या संचालक मंडळाकडेच कारखान्याची सूत्रे होती. परंतु, संचालकांच्या वादात त्यांचा हस्तक्षेप कुठेही दिसला नाही. त्याबद्दलही उलट-सुलट चर्चा होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर