शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

गडहिंग्लज कारखाना : बिनपैशाचा कारखाना प्रशासक मंडळ चालवणार तरी कसा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 11:25 IST

शासनाने संचालकांतील संघर्षापेक्षा लोकभावनेचा आदर करावा, अशी अपेक्षा कारखान्याच्या सभासदांतून व्यक्त होत आहे.

राम मगदूमगडहिंग्लज : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा ४३ वा गळीत हंगाम केवळ शेतकरी व कामगारांच्या प्रबळ इच्छाशक्तीतूनच सुरू झाला. त्यामुळेच शासनाने संचालकांतील संघर्षापेक्षा लोकभावनेचा आदर करावा, अशी अपेक्षा कारखान्याच्या सभासदांतून व्यक्त होत आहे. तद्वत बिनपैशाचा कारखाना प्रशासक मंडळातील अधिकारी तरी कसे चालवणार? असा सवालही जनतेतून विचारला जात आहे.

२०१३ मध्येदेखील कारखान्याची अवस्था अशीच झाली होती. त्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकाराने ४३ कोटींच्या बदल्यात १० वर्षांसाठी कारखाना सहयोग तत्त्वावर ब्रिस्क कंपनीला चालवायला देण्यात आला होता. परंतु, अद्याप दोन वर्षे मुदत असतानाच गेल्या वर्षी मार्चच्या अखेरीस कंपनीने कारखाना सोडला.

दरम्यान, सर्व संचालकांनी एकमताने ठराव करून कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे सर्वाधिकार कारखान्याचे अध्यक्ष श्रीपतराव शिंदे व उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे यांना दिले. त्यानंतर विशेष सभा घेऊन कारखाना स्वबळावर किंवा चालवायला देण्याचा निर्णयदेखील एकमताने झाला. परंतु, कारखान्याचे नक्त मूल्य उणे असल्यामुळे कोणत्याही वित्तीय संस्थांकडून अर्थसाहाय्य उपलब्ध न झाल्यामुळे कारखाना स्वबळावर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

गडहिंग्लज व चंदगड तालुक्यातील काही सहकारी संस्थांनी ठेवीच्या स्वरूपात कारखान्याला मदत केली. नऊ महिन्यांचा पगार थकलेला असतानाही कर्तव्यभावनेतून कारखाना सुरू करण्यासाठी कामगार अहोरात्र झटले. त्यामुळेच कारखाना सुरू झाला.

अवघ्या चार कोटींत सुरू झालेल्या कारखान्यात आजअखेर ७० हजार क्विंटल साखर आणि २ लाख ६५ हजार लिटर्स स्पिरीट उत्पादित झाली आहे. त्याची एकूण किंमत सुमारे २४ कोटी होते. तथापि, किमान १२ कोटी तोट्याचे गणित आणि अध्यक्षांवर मनमानी कारभाराचा आरोप करून १२ संचालकांनी संचालकपदाचे राजीनामे दिले आहेत. त्यामुळेच प्रशासक मंडळाची नियुक्ती झाली होती.

‘बहुमत’ राजीनाम्यासाठी ?

१२ संचालकांनी नेटाने बहुमताने कारखाना चालविण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा होता. मात्र, राजीनामे देऊन चालू हंगामात व्यत्यय आणला, अशीच भावना जनतेत निर्माण झाली आहे. प्रशासक नियुक्तीमुळे त्याला पुष्टीच मिळाली.

'बहुमत' राजीनाम्यासाठी

२०१३मध्ये तत्कालीन अध्यक्ष शिंदे यांच्याविरूद्ध अविश्वास ठराव आणून १५ संचालकांनी कारखाना ‘ब्रिस्क’ला चालवायला दिला होता. त्यानंतर आता १२ संचालकांनी त्यांच्याविरूद्ध ‘मनमानी’चा आरोप केला आहे. गेल्यावेळच्या बंडात त्यांचे सहकारी होते तर यावेळच्या बंडात विरोधकही सामील आहेत.

तोपर्यंत प्रशासक नेमा..!

आर्थिक अरिष्टातून कारखाना बाहेर येईपर्यंत शासनाने कारखान्यावर कायमचाच शासकीय प्रशासक नेमावा. त्यासाठी शासनाकडूनच अर्थसहाय्य उपलब्ध करावे. सुस्थितीत आल्यानंतरच तो शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावा, अशी मागणीही जाणकार सभासदांतून होत आहे.

वादापासून मंत्री दूर !

मंत्री हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली बहुमताने निवडून आलेल्या संचालक मंडळाकडेच कारखान्याची सूत्रे होती. परंतु, संचालकांच्या वादात त्यांचा हस्तक्षेप कुठेही दिसला नाही. त्याबद्दलही उलट-सुलट चर्चा होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर