शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

गडहिंग्लज कारखाना : बिनपैशाचा कारखाना प्रशासक मंडळ चालवणार तरी कसा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 11:25 IST

शासनाने संचालकांतील संघर्षापेक्षा लोकभावनेचा आदर करावा, अशी अपेक्षा कारखान्याच्या सभासदांतून व्यक्त होत आहे.

राम मगदूमगडहिंग्लज : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा ४३ वा गळीत हंगाम केवळ शेतकरी व कामगारांच्या प्रबळ इच्छाशक्तीतूनच सुरू झाला. त्यामुळेच शासनाने संचालकांतील संघर्षापेक्षा लोकभावनेचा आदर करावा, अशी अपेक्षा कारखान्याच्या सभासदांतून व्यक्त होत आहे. तद्वत बिनपैशाचा कारखाना प्रशासक मंडळातील अधिकारी तरी कसे चालवणार? असा सवालही जनतेतून विचारला जात आहे.

२०१३ मध्येदेखील कारखान्याची अवस्था अशीच झाली होती. त्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकाराने ४३ कोटींच्या बदल्यात १० वर्षांसाठी कारखाना सहयोग तत्त्वावर ब्रिस्क कंपनीला चालवायला देण्यात आला होता. परंतु, अद्याप दोन वर्षे मुदत असतानाच गेल्या वर्षी मार्चच्या अखेरीस कंपनीने कारखाना सोडला.

दरम्यान, सर्व संचालकांनी एकमताने ठराव करून कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे सर्वाधिकार कारखान्याचे अध्यक्ष श्रीपतराव शिंदे व उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे यांना दिले. त्यानंतर विशेष सभा घेऊन कारखाना स्वबळावर किंवा चालवायला देण्याचा निर्णयदेखील एकमताने झाला. परंतु, कारखान्याचे नक्त मूल्य उणे असल्यामुळे कोणत्याही वित्तीय संस्थांकडून अर्थसाहाय्य उपलब्ध न झाल्यामुळे कारखाना स्वबळावर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

गडहिंग्लज व चंदगड तालुक्यातील काही सहकारी संस्थांनी ठेवीच्या स्वरूपात कारखान्याला मदत केली. नऊ महिन्यांचा पगार थकलेला असतानाही कर्तव्यभावनेतून कारखाना सुरू करण्यासाठी कामगार अहोरात्र झटले. त्यामुळेच कारखाना सुरू झाला.

अवघ्या चार कोटींत सुरू झालेल्या कारखान्यात आजअखेर ७० हजार क्विंटल साखर आणि २ लाख ६५ हजार लिटर्स स्पिरीट उत्पादित झाली आहे. त्याची एकूण किंमत सुमारे २४ कोटी होते. तथापि, किमान १२ कोटी तोट्याचे गणित आणि अध्यक्षांवर मनमानी कारभाराचा आरोप करून १२ संचालकांनी संचालकपदाचे राजीनामे दिले आहेत. त्यामुळेच प्रशासक मंडळाची नियुक्ती झाली होती.

‘बहुमत’ राजीनाम्यासाठी ?

१२ संचालकांनी नेटाने बहुमताने कारखाना चालविण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा होता. मात्र, राजीनामे देऊन चालू हंगामात व्यत्यय आणला, अशीच भावना जनतेत निर्माण झाली आहे. प्रशासक नियुक्तीमुळे त्याला पुष्टीच मिळाली.

'बहुमत' राजीनाम्यासाठी

२०१३मध्ये तत्कालीन अध्यक्ष शिंदे यांच्याविरूद्ध अविश्वास ठराव आणून १५ संचालकांनी कारखाना ‘ब्रिस्क’ला चालवायला दिला होता. त्यानंतर आता १२ संचालकांनी त्यांच्याविरूद्ध ‘मनमानी’चा आरोप केला आहे. गेल्यावेळच्या बंडात त्यांचे सहकारी होते तर यावेळच्या बंडात विरोधकही सामील आहेत.

तोपर्यंत प्रशासक नेमा..!

आर्थिक अरिष्टातून कारखाना बाहेर येईपर्यंत शासनाने कारखान्यावर कायमचाच शासकीय प्रशासक नेमावा. त्यासाठी शासनाकडूनच अर्थसहाय्य उपलब्ध करावे. सुस्थितीत आल्यानंतरच तो शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावा, अशी मागणीही जाणकार सभासदांतून होत आहे.

वादापासून मंत्री दूर !

मंत्री हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली बहुमताने निवडून आलेल्या संचालक मंडळाकडेच कारखान्याची सूत्रे होती. परंतु, संचालकांच्या वादात त्यांचा हस्तक्षेप कुठेही दिसला नाही. त्याबद्दलही उलट-सुलट चर्चा होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर