शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

अंगारा, भंडाराच ठरविणार उमेदवारांचे भवितव्य

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

मतदारांना शपथा : ग्रामपंचायत निवडणुकीत अंधश्रद्धेला खतपाणी

गणपती कोळी - कुरूंदवाड  ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांचे मतपरिवर्तन करताना उमेदवारांची चांगलीच दमछाक होत आहे. स्वत:ची प्रतिष्ठा पणाला लावल्या जाणाऱ्या या निवडणुकीत एक-एक मत महत्त्वाचे असून, दगाफटका होऊ नये म्हणून देवालाच साक्षीला घातले जात आहे. अंगारा, भंडारा, बुक्का, कुराणाची शपथ देत असल्याने देवाचे हे ‘भस्म’च उमेदवारांचे भवितव्य ठरवित आहे.सध्या ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. ग्रामपंचायत सत्तेतून तालुका व जिल्हा स्तरावर आपला राजकीय दबदबा निर्माण करण्यासाठी गावागावांतील गटनेता आपले बहुमत सिद्ध करण्यासाठी राजकीय शक्ती पणाला लावत आहे. तर विरोधी गट नेत्यांनेही तुल्यबळ उमेदवार देत आव्हान उभे केल्याने बहुतेक ग्रामपंचायतीत काट्याची लढत होत आहे.ग्रामपंचायत निवडणूक ही कार्यकर्त्यांसाठी व उमेदवारांसाठी राजकारणाची पहिली पायरी समजली जाते. राजकारणाच्या दृष्टीने फारसे महत्त्वाचे नसलेले हे सदस्यपद असले तरी आपल्याच प्रभागात विरोधी उमेदवाराचा पराभव करून आपले जनमत विरोधकांपुढे, आपल्या गट नेत्याला दाखविण्याच्या भावनेतून राजकीय ईर्षा पेटली आहे. उमेदवारी निश्चित झाल्यानंतर निवडून येण्यासाठी वाट्टेल ते करण्याची मानसिकता उमेदवारांनी ठेवल्याने अत्यंत चुरस निर्माण झाली आहे.मर्यादित मतदारसंख्येचा प्रभाग असल्याने व एक, दोन मतातच अनेक उमेदवारांचा पराभव अथवा विजय होत असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत प्रत्येक मताला महत्त्व आहे. निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला असून, प्रचारापेक्षा मतपरिवर्तनाला अधिक महत्त्व दिले जात आहे. उमेदवार एखाद्या समाजप्रमुखाला, मंडळाच्या अध्यक्षाला गाठून आश्वासनाबरोबर इच्छांची पूर्तताही करीत आहे. इच्छापूर्ती करीत असताना गुप्त मतदान पद्धतीतून दगाफटका बसू नये, याची दक्षता घेत ज्या-त्या समाजाचे कुलदैवत, ग्रामदैवतांचा अंगारा, भंडारा, बुक्का, कुराण हातात घेऊन शपथ घेण्यास भाग पाडत आहेत. त्यामुळे उमेदवाराचा, गटनेत्यांचा मतदारावर विश्वास नसला तरी भंडारा, अंगाऱ्यावर विश्वास असून, उमेदवारांचे भवितव्य भंडारा, अंगाराच ठरवित आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने गावागावांत अंधश्रद्धाही तितकीच प्रभावी झाली असून, उमेदवार संकटावेळी देवालाच साक्षीला घालत आहे. त्यामुळे कोणता देव कोणाला प्रसन्न होतो, याचा फैसला निकालानंतरच होणार आहे.