शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

अंगारा, भंडाराच ठरविणार उमेदवारांचे भवितव्य

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

मतदारांना शपथा : ग्रामपंचायत निवडणुकीत अंधश्रद्धेला खतपाणी

गणपती कोळी - कुरूंदवाड  ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांचे मतपरिवर्तन करताना उमेदवारांची चांगलीच दमछाक होत आहे. स्वत:ची प्रतिष्ठा पणाला लावल्या जाणाऱ्या या निवडणुकीत एक-एक मत महत्त्वाचे असून, दगाफटका होऊ नये म्हणून देवालाच साक्षीला घातले जात आहे. अंगारा, भंडारा, बुक्का, कुराणाची शपथ देत असल्याने देवाचे हे ‘भस्म’च उमेदवारांचे भवितव्य ठरवित आहे.सध्या ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. ग्रामपंचायत सत्तेतून तालुका व जिल्हा स्तरावर आपला राजकीय दबदबा निर्माण करण्यासाठी गावागावांतील गटनेता आपले बहुमत सिद्ध करण्यासाठी राजकीय शक्ती पणाला लावत आहे. तर विरोधी गट नेत्यांनेही तुल्यबळ उमेदवार देत आव्हान उभे केल्याने बहुतेक ग्रामपंचायतीत काट्याची लढत होत आहे.ग्रामपंचायत निवडणूक ही कार्यकर्त्यांसाठी व उमेदवारांसाठी राजकारणाची पहिली पायरी समजली जाते. राजकारणाच्या दृष्टीने फारसे महत्त्वाचे नसलेले हे सदस्यपद असले तरी आपल्याच प्रभागात विरोधी उमेदवाराचा पराभव करून आपले जनमत विरोधकांपुढे, आपल्या गट नेत्याला दाखविण्याच्या भावनेतून राजकीय ईर्षा पेटली आहे. उमेदवारी निश्चित झाल्यानंतर निवडून येण्यासाठी वाट्टेल ते करण्याची मानसिकता उमेदवारांनी ठेवल्याने अत्यंत चुरस निर्माण झाली आहे.मर्यादित मतदारसंख्येचा प्रभाग असल्याने व एक, दोन मतातच अनेक उमेदवारांचा पराभव अथवा विजय होत असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत प्रत्येक मताला महत्त्व आहे. निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला असून, प्रचारापेक्षा मतपरिवर्तनाला अधिक महत्त्व दिले जात आहे. उमेदवार एखाद्या समाजप्रमुखाला, मंडळाच्या अध्यक्षाला गाठून आश्वासनाबरोबर इच्छांची पूर्तताही करीत आहे. इच्छापूर्ती करीत असताना गुप्त मतदान पद्धतीतून दगाफटका बसू नये, याची दक्षता घेत ज्या-त्या समाजाचे कुलदैवत, ग्रामदैवतांचा अंगारा, भंडारा, बुक्का, कुराण हातात घेऊन शपथ घेण्यास भाग पाडत आहेत. त्यामुळे उमेदवाराचा, गटनेत्यांचा मतदारावर विश्वास नसला तरी भंडारा, अंगाऱ्यावर विश्वास असून, उमेदवारांचे भवितव्य भंडारा, अंगाराच ठरवित आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने गावागावांत अंधश्रद्धाही तितकीच प्रभावी झाली असून, उमेदवार संकटावेळी देवालाच साक्षीला घालत आहे. त्यामुळे कोणता देव कोणाला प्रसन्न होतो, याचा फैसला निकालानंतरच होणार आहे.