शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

बाजार समितीत भाजीपाल्यानंतरच फळांचे सौदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने नवीन नियमावली तयार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने नवीन नियमावली तयार केली आहे. त्यानुसार भाजीपाल्याचे सौदे झाल्यानंतरच फळांचे सौदे काढण्यात येणार आहेत. त्याचबरोबर आंबा व भाजीपाल्याची किरकोळ विक्री इतर ठिकाणी हलवली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. भाजीपाल्यासह शेतीमाल विक्री सुरू आहे. मात्र, बाजार समिती सौद्यादरम्यान गर्दी होत असल्याने संसर्ग वाढण्याचा धोका असतो. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी बाजार समितीत शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांच्या उपस्थित समिती प्रशासन, व्यापारी, अडत्यांची बैठक झाली.

भाजीपाला व फळ मार्केट जवळ आहे, त्यात एकाच वेळी सौद्याची प्रक्रिया सुरू होत असल्याने गर्दी वाढते. यावर उपाय म्हणून पहाटे पाच ते सकाळी नऊपर्यंत भाजीपाल्याचे सौदे काढले जाणार आहेत. त्यानंतर फळ मार्केटमध्ये सौद्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्याचबरोबर घाऊक मार्केटमध्ये हापूस आंब्यासह इतर फळांची किरकोळ विक्री केली जाते. ही विक्री विठ्ठल मंदिर परिसरात सोशल डिस्टन्सिंग ठेवून केली जाणार आहे. त्याचबरोबर किरकोळ भाजीपाला विक्री समितीच्या मुख्य इमारतीच्या मागील बाजूस होणार आहे.

बैठकीला बाजार समिती अशासकीय समितीचे सदस्य सूर्यकांत पाटील, सचिव जयवंत पाटील, महापालिकेचे अधिकारी, समितीशी संबंधित घटक उपस्थित होते.

आज समितीत लसीकरण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज, शनिवारी समितीच्या मल्टीपर्पज सभागृहात लसीकरण केले जाणार आहे. समितीमध्ये येणाऱ्या ४५ वर्षांवरील सर्व घटकांचे लसीकरणाचे नियोजन आहे.