शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

कांद्यासह फळांची आवक २५ टक्क्यांनी घटली, पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 15:17 IST

    कोल्हापूर : गेल्या तीन दिवसांपासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने, कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या आवकेवर ...

ठळक मुद्देकांद्यासह फळांची आवक २५ टक्क्यांनी घटलीपावसाचा फटका : भाजीपाल्याची आवक, दरातही चढउतार

 

 

कोल्हापूर : गेल्या तीन दिवसांपासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने, कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या आवकेवर परिणाम झाला आहे. कांद्यासह फळांची आवक २५ ते ३० टक्क्यांनी घटली आहे. भाजीपाल्याची आवकही कमी-जास्त होत असून दरातही चढउतार दिसत आहेत.कोल्हापुरात शिरोळ, हातकणंगलेसह आजूबाजूच्या गावांतून येणाऱ्या भाजीपाल्याचे प्रमाण जास्त आहे. याशिवाय शेजारच्या कर्नाटकच्या उत्तर भागातून भाजीपाला मार्केट यार्डात येतो. तीन दिवसांपासून सर्वच भागांत अतिवृष्टीसदृश पाऊस पडत आहे. शिवारात पाणी साचल्याने तयार भाजीपाला काढण्यावर मर्यादा आल्या आहेत. परिणामी सौद्यासाठी येणाऱ्या मालाचे प्रमाण कमी झाले आहे.पालेभाज्यासह दोडका, काकडीसारख्या वेलवर्गीय फळभाज्यांना जास्त पाऊस चालत नाही. शिवारात पाणी तुंबले की त्यांची मुळे कुजून उत्पन्नावर परिणाम होतो. बाजारातील भाज्यांची आवकही कमी झाली आहे. चार दिवसांपूर्वी कोथिंबिरीची आवक ३१००० पेंढी होती, ती आता २३ हजारांवर आली आहे. दरातही १०० रुपयांनी कमी आहे.

मेथीची आवक एक हजाराने वाढली आहे. दरातही शेकड्यामागे १०० ने वाढ झाली आहे. ओल्या वाटाण्याची आवक केवळ ३० पोती असली तरी दरात २०० रुपयांनी घसरणच दिसत आहे. गवार, घेवड्याची आवक केवळ २० टक्केच आहे.बाजारात मध्यप्रदेश, कर्नाटकसह परदेशांतून फळे येतात; पण पूरस्थितीमुळे वाहतुकीवर परिणाम झाल्याने आवक २५ ते ३० टक्क्यांनी रोडावली आहे. मोसंबी, सफरचंद, डाळींब आणि सीताफळ वगळता अन्य फळांची आवकच झालेली नाही. दर मात्र स्थिर आहेत. तीन दिवसांपूर्वी पपई, आलुबंकर, पिअर्स, पपई, पेरू, चिक्कू, केळी, किव्ही, खजूर, आंबा दशेरी यांची आवक होती.ओली मिरची १०० ने कमी, तर आले ४०० रुपयांनी वाढलेओल्या मिरचीची आवक बाजारात दुप्पट झाली असून, दरात निम्म्याने घसरण झाली आहे. १० किलोंना ३०५ रुपये असणारा दर १८५ वर आला आहे. हीच परिस्थिती आल्याची झाली आहे. त्याची आवक फक्त ७८ पोती असून दरही तीन दिवसांपूर्वीच्या तुलनेत ४०० रुपयांनी वाढून प्रती १० किलो १००० रुपये झाला आहे.

कांद्याच्या आवकेवरही परिणाम

कांद्याच्या आवकेवरही परिणाम झाला आहे. मार्केट यार्डामध्ये रोज ३० ते ४० ट्रक कांदा येतो. गुरुवारी झालेल्या सौद्यावेळी केवळ २५ ट्रक इतकाच कांदा आला. कांद्याची प्रतही खालावली असल्याने त्याला उठाव नाही. दरातही क्विंटलमागे २० ते ३० रुपयांची सुधारणा दिसत आहे. 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर