शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

कांद्यासह फळांची आवक २५ टक्क्यांनी घटली, पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 15:17 IST

    कोल्हापूर : गेल्या तीन दिवसांपासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने, कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या आवकेवर ...

ठळक मुद्देकांद्यासह फळांची आवक २५ टक्क्यांनी घटलीपावसाचा फटका : भाजीपाल्याची आवक, दरातही चढउतार

 

 

कोल्हापूर : गेल्या तीन दिवसांपासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने, कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या आवकेवर परिणाम झाला आहे. कांद्यासह फळांची आवक २५ ते ३० टक्क्यांनी घटली आहे. भाजीपाल्याची आवकही कमी-जास्त होत असून दरातही चढउतार दिसत आहेत.कोल्हापुरात शिरोळ, हातकणंगलेसह आजूबाजूच्या गावांतून येणाऱ्या भाजीपाल्याचे प्रमाण जास्त आहे. याशिवाय शेजारच्या कर्नाटकच्या उत्तर भागातून भाजीपाला मार्केट यार्डात येतो. तीन दिवसांपासून सर्वच भागांत अतिवृष्टीसदृश पाऊस पडत आहे. शिवारात पाणी साचल्याने तयार भाजीपाला काढण्यावर मर्यादा आल्या आहेत. परिणामी सौद्यासाठी येणाऱ्या मालाचे प्रमाण कमी झाले आहे.पालेभाज्यासह दोडका, काकडीसारख्या वेलवर्गीय फळभाज्यांना जास्त पाऊस चालत नाही. शिवारात पाणी तुंबले की त्यांची मुळे कुजून उत्पन्नावर परिणाम होतो. बाजारातील भाज्यांची आवकही कमी झाली आहे. चार दिवसांपूर्वी कोथिंबिरीची आवक ३१००० पेंढी होती, ती आता २३ हजारांवर आली आहे. दरातही १०० रुपयांनी कमी आहे.

मेथीची आवक एक हजाराने वाढली आहे. दरातही शेकड्यामागे १०० ने वाढ झाली आहे. ओल्या वाटाण्याची आवक केवळ ३० पोती असली तरी दरात २०० रुपयांनी घसरणच दिसत आहे. गवार, घेवड्याची आवक केवळ २० टक्केच आहे.बाजारात मध्यप्रदेश, कर्नाटकसह परदेशांतून फळे येतात; पण पूरस्थितीमुळे वाहतुकीवर परिणाम झाल्याने आवक २५ ते ३० टक्क्यांनी रोडावली आहे. मोसंबी, सफरचंद, डाळींब आणि सीताफळ वगळता अन्य फळांची आवकच झालेली नाही. दर मात्र स्थिर आहेत. तीन दिवसांपूर्वी पपई, आलुबंकर, पिअर्स, पपई, पेरू, चिक्कू, केळी, किव्ही, खजूर, आंबा दशेरी यांची आवक होती.ओली मिरची १०० ने कमी, तर आले ४०० रुपयांनी वाढलेओल्या मिरचीची आवक बाजारात दुप्पट झाली असून, दरात निम्म्याने घसरण झाली आहे. १० किलोंना ३०५ रुपये असणारा दर १८५ वर आला आहे. हीच परिस्थिती आल्याची झाली आहे. त्याची आवक फक्त ७८ पोती असून दरही तीन दिवसांपूर्वीच्या तुलनेत ४०० रुपयांनी वाढून प्रती १० किलो १००० रुपये झाला आहे.

कांद्याच्या आवकेवरही परिणाम

कांद्याच्या आवकेवरही परिणाम झाला आहे. मार्केट यार्डामध्ये रोज ३० ते ४० ट्रक कांदा येतो. गुरुवारी झालेल्या सौद्यावेळी केवळ २५ ट्रक इतकाच कांदा आला. कांद्याची प्रतही खालावली असल्याने त्याला उठाव नाही. दरातही क्विंटलमागे २० ते ३० रुपयांची सुधारणा दिसत आहे. 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर