शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

कांद्यासह फळांची आवक २५ टक्क्यांनी घटली, पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 15:17 IST

    कोल्हापूर : गेल्या तीन दिवसांपासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने, कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या आवकेवर ...

ठळक मुद्देकांद्यासह फळांची आवक २५ टक्क्यांनी घटलीपावसाचा फटका : भाजीपाल्याची आवक, दरातही चढउतार

 

 

कोल्हापूर : गेल्या तीन दिवसांपासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने, कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या आवकेवर परिणाम झाला आहे. कांद्यासह फळांची आवक २५ ते ३० टक्क्यांनी घटली आहे. भाजीपाल्याची आवकही कमी-जास्त होत असून दरातही चढउतार दिसत आहेत.कोल्हापुरात शिरोळ, हातकणंगलेसह आजूबाजूच्या गावांतून येणाऱ्या भाजीपाल्याचे प्रमाण जास्त आहे. याशिवाय शेजारच्या कर्नाटकच्या उत्तर भागातून भाजीपाला मार्केट यार्डात येतो. तीन दिवसांपासून सर्वच भागांत अतिवृष्टीसदृश पाऊस पडत आहे. शिवारात पाणी साचल्याने तयार भाजीपाला काढण्यावर मर्यादा आल्या आहेत. परिणामी सौद्यासाठी येणाऱ्या मालाचे प्रमाण कमी झाले आहे.पालेभाज्यासह दोडका, काकडीसारख्या वेलवर्गीय फळभाज्यांना जास्त पाऊस चालत नाही. शिवारात पाणी तुंबले की त्यांची मुळे कुजून उत्पन्नावर परिणाम होतो. बाजारातील भाज्यांची आवकही कमी झाली आहे. चार दिवसांपूर्वी कोथिंबिरीची आवक ३१००० पेंढी होती, ती आता २३ हजारांवर आली आहे. दरातही १०० रुपयांनी कमी आहे.

मेथीची आवक एक हजाराने वाढली आहे. दरातही शेकड्यामागे १०० ने वाढ झाली आहे. ओल्या वाटाण्याची आवक केवळ ३० पोती असली तरी दरात २०० रुपयांनी घसरणच दिसत आहे. गवार, घेवड्याची आवक केवळ २० टक्केच आहे.बाजारात मध्यप्रदेश, कर्नाटकसह परदेशांतून फळे येतात; पण पूरस्थितीमुळे वाहतुकीवर परिणाम झाल्याने आवक २५ ते ३० टक्क्यांनी रोडावली आहे. मोसंबी, सफरचंद, डाळींब आणि सीताफळ वगळता अन्य फळांची आवकच झालेली नाही. दर मात्र स्थिर आहेत. तीन दिवसांपूर्वी पपई, आलुबंकर, पिअर्स, पपई, पेरू, चिक्कू, केळी, किव्ही, खजूर, आंबा दशेरी यांची आवक होती.ओली मिरची १०० ने कमी, तर आले ४०० रुपयांनी वाढलेओल्या मिरचीची आवक बाजारात दुप्पट झाली असून, दरात निम्म्याने घसरण झाली आहे. १० किलोंना ३०५ रुपये असणारा दर १८५ वर आला आहे. हीच परिस्थिती आल्याची झाली आहे. त्याची आवक फक्त ७८ पोती असून दरही तीन दिवसांपूर्वीच्या तुलनेत ४०० रुपयांनी वाढून प्रती १० किलो १००० रुपये झाला आहे.

कांद्याच्या आवकेवरही परिणाम

कांद्याच्या आवकेवरही परिणाम झाला आहे. मार्केट यार्डामध्ये रोज ३० ते ४० ट्रक कांदा येतो. गुरुवारी झालेल्या सौद्यावेळी केवळ २५ ट्रक इतकाच कांदा आला. कांद्याची प्रतही खालावली असल्याने त्याला उठाव नाही. दरातही क्विंटलमागे २० ते ३० रुपयांची सुधारणा दिसत आहे. 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर