शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘एफआरपी’त २०० रुपये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:49 IST

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पुढील हंगामासाठी (२०१८-१९) उसाच्या एफआरपीमध्ये दोनशे रुपये वाढ करण्याची महत्त्वपूर्ण शिफारस केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने केंद्र सरकारकडे केली आहे. ९.५ साखर उताºयाला २७५० रुपये, तर त्यापुढील प्रत्येक टक्क्यास साधारणत: २८० रुपये मिळणार असल्याने ‘एफआरपी’ची रक्कम तीन हजार रुपयांच्या पुढेच जाणार आहे.शेतकºयांचा उत्पादन खर्च, बाजारातील साखरेचे ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पुढील हंगामासाठी (२०१८-१९) उसाच्या एफआरपीमध्ये दोनशे रुपये वाढ करण्याची महत्त्वपूर्ण शिफारस केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने केंद्र सरकारकडे केली आहे. ९.५ साखर उताºयाला २७५० रुपये, तर त्यापुढील प्रत्येक टक्क्यास साधारणत: २८० रुपये मिळणार असल्याने ‘एफआरपी’ची रक्कम तीन हजार रुपयांच्या पुढेच जाणार आहे.शेतकºयांचा उत्पादन खर्च, बाजारातील साखरेचे दर व साखर कारखान्यांचा उत्पादन खर्च यांचा ताळमेळ घालून उसाची एफआरपी निश्चित करण्याचे काम केंद्रीय कृषिमूल्य आयोग करतो. साधारणत: बाजारपेठेतील साखरेच्यादराचा ठोकताळा बांधूनच हा दर ठरविला जातो. हंगाम २०१५-१६ मध्ये ९.५ टक्के साखर उताºयाला २३०० रुपये, तर त्यानंतरच्या प्रत्येक टक्क्याला २४८ रुपये ‘एफआरपी’ निश्चित करण्यात आलीहोती. दुसºया हंगामासाठी ‘एफआरपी’मध्ये वाढ करण्याची मागणी शेतकरीसंघटनांनी केली होती; पण बाजारपेठेतील साखरेचे दर पाहता ‘एफआरपी’मध्ये बदल झालाच नाही. सलग दोन वर्षे एकच ‘एफआरपी’ राहिली. त्यानंतरच्या २०१७-१८ (म्हणजेच चालू हंगामासाठी) ‘एफआरपी’मध्ये वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. ९.५ साखर उताºयासाठी २५५० रुपये; तर त्यापुढील प्रत्येक टक्क्यास २६८ रुपये अशी एफआरपी मिळणार आहे. यंदाचा हंगाम अजून सुरू व्हायचा आहे. ऊसदराची कोंडी अद्याप फुटलेली नाही. वाढीव एफआरपी व शेतकरी संघटनांची मागणी यामध्ये सरकारला तडजोड करावी लागणार आहे. तोपर्यंत पुढील हंगामासाठी (२०१८-१९) प्रतिटन दोनशे रुपयांच्या वाढीची शिफारस कृषिमूल्य आयोगाने केंद्र सरकारकडे केली आहे. ९.५ साखर उताºयाला २७५० रुपये तर त्यापुढील प्रत्येक टक्क्यास साधारणत: २८० रुपये वाढ मिळणार आहे. त्यामुळे पुढील हंगामातील ‘एफआरपी’ तीन हजार रुपयांच्या पुढेच जाणार आहे.चढ-उतार निधीची पुन्हा मागणीबाजारातील वर्षभरातील साखरेच्या दराचा अंदाज गृहीत धरून ‘एफआरपी’ काढली जाते. त्यामुळे पुढे दर कोसळले तर कारखाने शॉर्ट मार्जिनमध्ये जातात. यासाठी साखर चढ-उतार निधीची संकल्पना कृषिमूल्य आयोगाने आणली होती, त्याला केंद्राने मंजुरी दिलेली नाही.कशी ठरविली जाते ‘एफआरपी’...शेतकºयांचा उसाचा उत्पादन खर्चआंतर पिकांपासून घेतलेले उत्पन्नसाखर कारखान्यांचा उत्पादन खर्चबाजारातील साखरेचा सरासरी दरग्राहकांना कमीत कमी दरात साखर मिळाली पाहिजे.अशी राहिली एफआरपीहंगाम ९.५ उताºयाला त्यापुढील२०१५-१६ २३०० रुपये २४८ रुपये२०१६-१७ २३०० रुपये २४८ रुपये२०१७-१८ २५५० रुपये २६८ रुपये२०१८-१९ २७५० रुपये २८० रुपये

टॅग्स :agricultureशेती