शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

‘एफआरपी’त २०० रुपये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:49 IST

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पुढील हंगामासाठी (२०१८-१९) उसाच्या एफआरपीमध्ये दोनशे रुपये वाढ करण्याची महत्त्वपूर्ण शिफारस केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने केंद्र सरकारकडे केली आहे. ९.५ साखर उताºयाला २७५० रुपये, तर त्यापुढील प्रत्येक टक्क्यास साधारणत: २८० रुपये मिळणार असल्याने ‘एफआरपी’ची रक्कम तीन हजार रुपयांच्या पुढेच जाणार आहे.शेतकºयांचा उत्पादन खर्च, बाजारातील साखरेचे ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पुढील हंगामासाठी (२०१८-१९) उसाच्या एफआरपीमध्ये दोनशे रुपये वाढ करण्याची महत्त्वपूर्ण शिफारस केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने केंद्र सरकारकडे केली आहे. ९.५ साखर उताºयाला २७५० रुपये, तर त्यापुढील प्रत्येक टक्क्यास साधारणत: २८० रुपये मिळणार असल्याने ‘एफआरपी’ची रक्कम तीन हजार रुपयांच्या पुढेच जाणार आहे.शेतकºयांचा उत्पादन खर्च, बाजारातील साखरेचे दर व साखर कारखान्यांचा उत्पादन खर्च यांचा ताळमेळ घालून उसाची एफआरपी निश्चित करण्याचे काम केंद्रीय कृषिमूल्य आयोग करतो. साधारणत: बाजारपेठेतील साखरेच्यादराचा ठोकताळा बांधूनच हा दर ठरविला जातो. हंगाम २०१५-१६ मध्ये ९.५ टक्के साखर उताºयाला २३०० रुपये, तर त्यानंतरच्या प्रत्येक टक्क्याला २४८ रुपये ‘एफआरपी’ निश्चित करण्यात आलीहोती. दुसºया हंगामासाठी ‘एफआरपी’मध्ये वाढ करण्याची मागणी शेतकरीसंघटनांनी केली होती; पण बाजारपेठेतील साखरेचे दर पाहता ‘एफआरपी’मध्ये बदल झालाच नाही. सलग दोन वर्षे एकच ‘एफआरपी’ राहिली. त्यानंतरच्या २०१७-१८ (म्हणजेच चालू हंगामासाठी) ‘एफआरपी’मध्ये वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. ९.५ साखर उताºयासाठी २५५० रुपये; तर त्यापुढील प्रत्येक टक्क्यास २६८ रुपये अशी एफआरपी मिळणार आहे. यंदाचा हंगाम अजून सुरू व्हायचा आहे. ऊसदराची कोंडी अद्याप फुटलेली नाही. वाढीव एफआरपी व शेतकरी संघटनांची मागणी यामध्ये सरकारला तडजोड करावी लागणार आहे. तोपर्यंत पुढील हंगामासाठी (२०१८-१९) प्रतिटन दोनशे रुपयांच्या वाढीची शिफारस कृषिमूल्य आयोगाने केंद्र सरकारकडे केली आहे. ९.५ साखर उताºयाला २७५० रुपये तर त्यापुढील प्रत्येक टक्क्यास साधारणत: २८० रुपये वाढ मिळणार आहे. त्यामुळे पुढील हंगामातील ‘एफआरपी’ तीन हजार रुपयांच्या पुढेच जाणार आहे.चढ-उतार निधीची पुन्हा मागणीबाजारातील वर्षभरातील साखरेच्या दराचा अंदाज गृहीत धरून ‘एफआरपी’ काढली जाते. त्यामुळे पुढे दर कोसळले तर कारखाने शॉर्ट मार्जिनमध्ये जातात. यासाठी साखर चढ-उतार निधीची संकल्पना कृषिमूल्य आयोगाने आणली होती, त्याला केंद्राने मंजुरी दिलेली नाही.कशी ठरविली जाते ‘एफआरपी’...शेतकºयांचा उसाचा उत्पादन खर्चआंतर पिकांपासून घेतलेले उत्पन्नसाखर कारखान्यांचा उत्पादन खर्चबाजारातील साखरेचा सरासरी दरग्राहकांना कमीत कमी दरात साखर मिळाली पाहिजे.अशी राहिली एफआरपीहंगाम ९.५ उताºयाला त्यापुढील२०१५-१६ २३०० रुपये २४८ रुपये२०१६-१७ २३०० रुपये २४८ रुपये२०१७-१८ २५५० रुपये २६८ रुपये२०१८-१९ २७५० रुपये २८० रुपये

टॅग्स :agricultureशेती