शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

साखर उत्पादन ४५ टक्क्यांनी घटणार : राज्यातील गळीत हंगामाला शुक्रवारचा मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 13:00 IST

कोल्हापूर : मंत्री समितीऐवजी खोळंबलेल्या ऊस गळीत हंगामाची कोंडी अखेर सचिव समितीने मंगळवारी फोडली. राज्यपालांच्या उपस्थितीत झालेल्या सचिव समितीच्या ...

ठळक मुद्दे सचिव समितीच्या बैठकीत निर्णय

कोल्हापूर : मंत्री समितीऐवजी खोळंबलेल्या ऊस गळीत हंगामाची कोंडी अखेर सचिव समितीने मंगळवारी फोडली. राज्यपालांच्या उपस्थितीत झालेल्या सचिव समितीच्या बैठकीत येत्या शुक्रवार (दि. २२)पासून गळीत हंगाम सुरू करण्यावर शिक्कामोर्तब झाले. महापूर आणि अतिवृष्टीमुळे उसाची टंचाई मोठ्या प्रमाणावर भासणार असल्याने यंदाचा हंगाम ७० ते ९० दिवसच चालेल आणि उत्पादनातही तब्बल ४५ टक्क्यांनी घट येईल, असा अंदाजही बैठकीत व्यक्त करण्यात आला.

साखर आयुक्त शेखर गायकवाड, राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर आणासकर, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी राजभवनात बैठक झाली. राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्यासमोर गळीत हंगाम सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय झाला. दरवर्षी सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये मंत्री समितीची बैठक होऊन गाळप हंगामाचा आढावा घेतला जात होता. यंदा मात्र सरकार बरखास्त झाल्याने मंत्री समितीही बरखास्त झाली आहे. नवे सरकार स्थापन झाल्यानंतरच मंत्री समितीची स्थापना होणार आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आणखी चार दिवसांनी एक महिना होणार असला तरी अजूनही सरकार स्थापन झालेले नसल्यामुळे गळीत हंगामाचा निर्णय कोण घेणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर सचिव पातळीवर बैठक घेऊन यातून मार्ग काढण्यात आला.

या संदर्भात गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी बैठकीचा तपशील सांगताना येत्या शुक्रवारपासून गळीत हंगाम सुरू करण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले. ते म्हणाले, राज्यातील १६२ साखर कारखान्यांनी गाळपासाठी परवान्याची मागणी आयुक्त कार्यालयाकडे केली होती. त्यापैकी कोणतीही थकबाकी नसलेल्या १०५ कारखान्यांना गाळप परवाना दिला आहे. या कारखान्यांचा गळीत हंगामाचा मार्ग मोकळा झाला आहे. ५७ कारखान्यांचे गाळप परवाने राखून ठेवण्यात आले आहेत. त्यातही १५ कारखान्यांचा विषय न्यायालयात असल्यामुळे त्यांची सुनावणीही २२ लाच होणार आहे. या सुनावणीनंतरच त्यांच्या गाळप परवान्याचे भवितव्य ठरणार आहे. या कारखान्यांनी ‘एफआरपी’सह अन्य देणी थकवली असल्याचे परवाना प्रस्ताव छाननीत आढळले आहे.हंगाम ७० ते ९० दिवसच चालणारमहापूर, अतिवृष्टी आणि त्यापाठोपाठ परतीच्या पावसाने घातलेल्या धुमाकुळामुळे यंदा राज्यात उसाची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदाचा हंगाम केवळ ७० ते ९० दिवसच चालणार आहे. १८० ते २२० दिवस गाळपाचा उच्चांक नोंदविणाऱ्या राज्यातील कारखान्यांचा यंदा गाळप कालावधीचा नीचांक होणार आहे.४९ लाख मेट्रिक टनांनी उत्पादन घटणारराज्यात यंदा तब्बल ४९ लाख मेट्रिक टनांनी साखरेचे उत्पादन घटेल, असा अंदाज या सचिव समितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. गेल्या वर्षी १०७ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले होते, ते यंदा ५८ लाख मेट्रिक टनांपर्यंत खाली येणार आहे. ही घट तब्बल ४५ टक्के आहे. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर