शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आजच्या पिढीसमोर स्वातंत्र्य लढा पुन्हा जिवंत झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:22 IST

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील १९४२ च्या स्वातंत्र्य लढा ‘१९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यातील कोल्हापूरचे शिलेदार’ या पुस्तक रुपाने शरद ...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील १९४२ च्या स्वातंत्र्य लढा ‘१९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यातील कोल्हापूरचे शिलेदार’ या पुस्तक रुपाने शरद तांबट यांनी युवा पिढीसमोर आणत इतिहास पुन्हा जिवंत केला. असे प्रतिपादन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले. स्वातंत्र्यलढ्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त व्हिनस काॅर्नर येथील लोटस प्लाझा येथे शनिवारी आयोजित केलेल्या ‘१९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यातील कोल्हापूरचे शिलेदार’ या पुस्तकाचे प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.

आमदार पाटील म्हणाले, ब्रिटिशांना ‘चले जाव’ चा नारा देत १९४२ साली युवकांनी महाविद्यालयात जाण्याऐवजी तुरुंगात जाणे पसंत केले. या त्यांच्या त्यागामुळेच आजचे हे चांगले दिवस आपल्याला पाहण्यास मिळत आहेत. त्या काळचा विल्सन यांचा पुतळा काढून त्या जागी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याचे महत्त्वाचे स्वातंत्र्य सैनिकांनी केले. हा इतिहास ही या पुस्तक रुपाने युवा पिढीसमोर आला आहे. हा निश्चितच अभ्यासण्यासारखा आहे. स्वातंत्र्यसेनानींची नावे कायम चिरस्मरणात राहण्यासाठी वर्दळीच्या चौकात नावे असलेली शिळा उभी करू. त्या रुपाने ही नावे आजच्या व उद्याच्या पिढीला कायम लक्षात राहतील. अशी ग्वाही दिली.

रजनीताई मगदूम म्हणाल्या, वडील रत्नाप्पाआण्णा यांच्याकडे आम्ही लहान असताना येणाऱ्या थोर स्वातंत्र्य सैनिकांचे चेहरे या पुस्तक प्रकाशनानिमित्त पुन्हा समोर आले आणि हा इतिहास ताजा झाला.

लेखक शरद तांबट म्हणाले, १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यातील इतिहास पुस्तक रुपाने आजच्या पिढीसमोर आणला आहे. परिपूर्ण करून तो समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. स्वागत चेंबर ऑफ काॅमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने व प्रास्ताविक अनिल घाटगे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानासाहेब गाठ, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, खेलो इंडिया (नवी दिल्ली) चे संचालक सतीश बागल, आर.डी.पाटील, रावसाहेब पाटील या प्रमुख मान्यवरांसह स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो : २७०३२०२१-कोल-शरद पुस्तक प्रकाशन

ओळी : स्वातंत्र्यलढ्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शरद तांबट यांनी ‘१९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यातील कोल्हापूरचे शिलेदार ’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी आण्णासाहेब गाठ, वसंतराव मुळीक, सतीश बागल, रजनीताई मगदूम, आर.डी.पाटील, आनंद माने, शरद तांबट,अनिल घाटगे, रावसाहेब पाटील, उपस्थित होते.

===Photopath===

270321\27kol_1_27032021_5.jpg

===Caption===

फोटो : २७०३२०२१-कोल-शरद पुस्तक प्रकाशन आेळी : स्वातंत्र्यलढ्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शरद तांबट यांनी ‘१९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यातील कोल्हापूरचे शिलेदार ’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी आण्णासाहेब गाठ, वसंतराव मुळीक, सतीश बागल, रजनीताई मगदूम, आर.डी.पाटील, आनंद माने, शरद तांबट,अनिल घाटगे, रावसाहेब पाटील, उपस्थित होते.