शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

रुग्ण, नातेवाइकाला रोज मोफत भोजन

By admin | Updated: February 15, 2017 00:48 IST

भूकमुक्तीच्या दिशेने : जयसिंगपूर युवा फौंडेशनचा अभिनव उपक्रम

चंद्रकांत कित्तुरे -- कोल्हापूर --पैसे नाहीत म्हणून भजीपाव, वडापाव खाऊन राहणाऱ्या किंवा उपाशिपोटी झोपणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांवर आता असे करण्याची वेळ येणार नाही. कारण रुग्णालयात दाखल झालेला रुग्ण आणि त्याचा एक नातेवाईक यांना मोफत भोजन देण्याचा उपक्रम जयसिंगपूर युवा फौंडेशनने एक फेब्रुवारीपासून सुरू केला आहे. हा उपक्रम सध्या जयसिंगपूर शहरातील रुग्णालयांपुरता मर्यादित आहे.विधायक कार्याच्या उद्देशाने जयसिंगूपर शहरातील काही युवकांनी एकत्र येऊन २०१४ मध्ये या फौंडेशनची स्थापना केली आहे. समाजातील निराधार, असहाय आणि गरजूंना आधार देण्याचे कार्य फौंडेशन करीत आहे. जयसिंगूपर शहरात सरकारी, खासगी, सामाजिक संस्थांकडून चालविल्या जाणाऱ्या रुग्णालयांत दररोज शेकडो रुग्ण उपचार घेत असतात. ते जवळपासच्या खेड्यातून तसेच कर्नाटकातूनही उपचारासाठी जयसिंगपुरात येतात. त्यामध्ये हलाखीची परिस्थिती असलेले अनेक रुग्ण असतात. तसेच गाव लांब असल्याने आणि जवळ पैसा नसल्याने अनेक रुग्णांचे नातेवाईक केवळ भजीपाव, वडापाव, किंवा काहीतरी खाऊन अर्धपोटी दिवस काढीत असतात. ही बाब जयसिंगपूर युवा फौंडेशनचे अझर पटेल, निखिल कुंभार, अमर पाटील आणि अन्य सदस्यांच्या लक्षात आली. रुग्णालयात अशा अर्धपोटी, उपाशिपोटी, तसेच उघड्यावर झोपणाऱ्या नातेवाइकांसाठी मोफत भोजन आणि अंथरूण-पांघरूण देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. गरजू रुग्ण आणि त्याचा एक नातेवाईक यांच्यासाठी हा उपक्रम राबविण्याचे ठरले. त्यानुसार फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी शहरातील तीसहून अधिक रुग्णालयांशी संपर्क साधून या उपक्रमाची माहिती दिली आणि अशा गरजू रुग्ण आणि नातेवाइकांची माहिती कळविण्याचे आवाहन केले. हळूहळू त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. ४५ निराधारांना मोफत भोजनसमाजातील गरीब, वंचित, निराधार, अपंग, वृद्ध, अपत्यहीन, असहायांना भूकमुक्त करण्यासाठी चार एप्रिल २०१५ पासून जयसिंगपूर युवा फौंडेशनने मोफत भोजन देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत सध्या दररोज ४५ अशा निराधारांना दोनवेळचे मोफत भोजन दिले जात आहे. शिवाय त्यांची दर महिन्याला आरोग्य तपासणी करून त्यांच्या औषधोपचाराचा खर्चही फौंडशनकडून केला जात आहे. समाजातील दानशुरांच्या मदतीने हा उपक्रम राबविला जातो. कोणताही गाजावाजा न करता एक फेब्रुवारीपासून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. गेल्या १४ दिवसांत केवळ पाच ते सहा रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना याचा लाभ झाला आहे. रुग्णालय आणि रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये याबाबत जागरुकता येईल, तसे याचे प्रमाण वाढेल आणि रुग्णालयांमध्ये कुणालाही अर्धपोटी, उपाशिपोटी किंवा उघड्यावर झोपावे लागणार नाही. -अझर पटेल, सदस्य, जयसिंगपूर युवा फौंडेशन.