शहरं
Join us  
Trending Stories
1
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
2
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
3
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
4
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
5
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
6
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
7
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
8
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
9
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
10
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
11
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
12
Suzuki ने लॉन्च केले Access चे CNG व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज अन् किंमत...
13
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
14
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
15
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
16
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
17
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
18
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
19
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
20
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!

चार हजार शेतकरी अनुदानाला मुकले ठिबक सिंचनचा घोळ : फॉर्ममधील चुका भोवल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:50 IST

नसिम सनदी । कोल्हापूर : केवळ फॉर्म भरताना चुका झाल्या म्हणून मागणी केलेल्यांपैकी निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांना ठिबकच्या अनुदानाला मुकावे ...

ठळक मुद्देपाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीपासून शासनाने ठिबकला झुकते माप दिलेकोणतेच अधिकार जिल्हा पातळीवर नसल्याने राज्यस्तरावर एकत्रित याद्या करताना अपात्र अर्जांचे प्रमाण वाढले.

नसिम सनदी ।कोल्हापूर : केवळ फॉर्म भरताना चुका झाल्या म्हणून मागणी केलेल्यांपैकी निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांना ठिबकच्या अनुदानाला मुकावे लागले आहे. जिल्ह्णातून ७ हजार ४४७ शेतकºयांनी अर्ज केले होेते, त्यांपैकी ३ हजार ६१३ शेतकºयांनाच प्रत्यक्ष अनुदानाचा लाभ झाला असून, तब्बल ३ हजार ८६१ अर्ज बाद ठरले आहेत.या शेतकºयांना १0 कोटी ४३ लाखांचे अनुदान प्राप्त झाले आहे. या रकमेतील शेवटचा ६१ लाखांचा हप्ताही कृषी विभागाकडे आला असून, तो लवकरच शेतकºयांच्या खात्यावर वर्ग होत आहे. ठिबक सिंचनच्या अनुदानाचा आॅनलाईन अर्ज भरण्याबाबतची माहिती शेतकºयांना कृषी विभागाने देण्याची गरज आहे.

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीपासून शासनाने ठिबकला झुकते माप दिले. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून केंद्र ६० टक्के व राज्य ४० टक्के असा अनुदानाचा टक्का ठरवून ३५ टक्के अनुदानावर शेतकºयांना ठिबक संच पुरवण्यास सुरुवात झाली.

अनुदान थेट शेतकºयांच्या खात्यावर वर्ग करण्याबरोबरच आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया राबवली. २०१७-१८ या आर्थिक वर्षात या पद्धतीने फॉर्म भरून घेतले. यात कोल्हापूर जिल्ह्णातील ७ हजार ४७४ शेतकºयांनी अर्ज भरले. हातकणंगले, शिरोळ, कागल, करवीर या तालुक्यांतील शेतकºयांचा भरणा जास्त होता.अर्ज भरण्यासाठी झुंबड उडाली; पण त्यात मोठ्या प्रमाणावर चुका झाल्याने आणि त्यात सुधारणा करण्याचे कोणतेच अधिकार जिल्हा पातळीवर नसल्याने राज्यस्तरावर एकत्रित याद्या करताना अपात्र अर्जांचे प्रमाण वाढले.

बहुतांश शेतकरी डिलरकडूनच अर्ज भरून घेतात. अर्ज इंग्लिशमध्ये असल्याने नावाच्या स्पेलिंगमध्ये चुका राहतात. त्या अन्य ओळखीच्या पुराव्याशी जुळत नाहीत. शिवाय अर्धवट अर्ज भरले जातात. संच बसवण्याआधीच अर्ज भरण्याची घाई केली जाते. २० गुंठ्यांच्या आत अनुदान मिळत नसतानाही अर्ज भरले जातात. या सर्व अज्ञानपणामुळे प्रत्यक्षातील अर्ज आणि अनुदानप्राप्त शेतकरी यांच्या संख्येत निम्म्यापेक्षा अधिक तफावत दिसत आहे.नव्या वर्षात ६०० अर्जमोठ्या प्रमाणावर अर्ज बाद झाल्याने आॅनलाईन अचूक फॉर्म भरण्याविषयी माहिती देण्याची गरज आहे. यावर्षी नोव्हेंबरपासून ही प्रक्रिया अधिक गती घेणार आहेत. आतापर्यंत ६०० शेतकºयांनी अर्ज केले आहेत. मार्चपर्यंत प्रक्रिया सुरू राहणार आहे. शेतकºयांनी अचूक अर्ज भरावेत, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात येत आहे.तालुका प्रस्ताव अनुदानप्राप्तसंख्या शेतकरीआजरा ३0१ १0१भुदरगड १५६ २४चंदगड २२७ ३५गडहिंग्लज ५२४ २३८गगनबावडा ६८ ३४हातकणंगले १९४४ ९६२कागल १0४३ ५२४करवीर १0३९ ५३८पन्हाळा ३८५ १८३राधानगरी १३१ ३८शाहूवाडी ११७ ५0शिरोळ १५३९ ८८६

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर