शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील भाजपचे चारही आमदार ‘सलाईन’वर

By admin | Updated: November 3, 2014 23:28 IST

प्रश्न मंत्रीपदाचा : कोणालाही स्पष्ट संकेत नाहीत; आयाराम व निष्ठावंतांमध्ये नवे राजकारण

सांगली : काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडून लोकसभेची एक व विधानसभेच्या चार जागा जिंकणाऱ्या सांगली जिल्ह्यातील भाजपला पहिल्या टप्प्यात मंत्रीपदाने हुलकावणी दिली आहे. दुसऱ्या टप्प्यात तरी आता मंत्रीपद मिळणार की नाही, याची चिंता भाजप कार्यकर्त्यांना लागली आहे. भाजपच्या चारही आमदारांना मंत्रीपदाची आशा असून, यातील एकालाही मंत्रीपदासाठी स्पष्ट संकेत मिळाले नाहीत. त्यामुळे आमदार व त्यांचे समर्थक सध्या ‘सलाईन’वर आहेत. त्यातच मंत्रीपदावरून आता जिल्ह्यातील आयाराम व निष्ठावंत गटातील राजकारणाला वेगळे वळण लागले आहे. जिल्ह्यातील कॉँग्रेस व राष्ट्रवादीला जोरदार टक्कर देऊन भाजपने स्थान भक्कम केले आहे. लोकसभेची एक जागा विक्रमी मताधिक्याने जिंकण्यासह जिल्ह्यातील विधानसभेच्या पन्नास टक्के जागांवर कब्जा करण्यात भाजपला यश मिळाले. या यशात आयारामांसह भाजपच्या निष्ठावंत गटाचाही वाटा आहे. दोन्ही कॉँग्रेसला धूळ चारून यश मिळवल्यामुळे जिल्ह्याला किमान दोन मंत्रीपदे मिळतील, अशी अपेक्षा होती. मुख्यमंत्र्यांसह काही मोजक्याच मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ््यात सांगलीच्या एकाचा समावेश असेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. या सर्व शक्यतांना, चर्चेला पूर्णविराम देत सांगलीला डावलण्यात आले. दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या काळापासून जिल्ह्याचा मंत्रिमंडळात मोठा दबदबा राहिला आहे. प्रत्येकवेळी मंत्रीपदाच्या शर्यतीत जिल्ह्यातील राजकारण्यांनी आघाडी घेतली. गेल्या पंधरा वर्षांच्या कालावधित राज्यातील मंत्रिमंडळात तीन मंत्रीपदे जिल्ह्याकडे कायम राहिली. त्याशिवाय महामंडळांवरही सांगलीकरांची वर्णी लागत राहिली. यंदा या परंपरेला छेद मिळणार की परंपरा कायम राखली जाणार, हा उत्सुकतेचा विषय बनला आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यात व्यक्तिगत राजकारणरंगले...मंत्रीपदाचे राजकारण सांगलीला नवीन नाही. एकमेकांच्या पायात पाय घालण्याचीही परंपरा सांगलीत पूर्वापार चालत आली आहे. भाजप सरकारमध्येही सध्या मंत्रीपदासाठी दावेदार असलेल्या जिल्ह्यातील आमदारांना असाच अनुभव येत आहे. मंत्रीपदाच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर असलेले शिवाजीराव नाईक यांचा समावेश मंत्रिमंडळात होऊ नये म्हणून जिल्ह्यातील एका माजी मंत्र्याने ताकद पणाला लावली आहे. त्यांच्या ताकदीला राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या काही नेत्यांचाही हातभार लागला आहे. दुसरीकडे सुरेश खाडे हेसुद्धा मंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्यांना कोणाचाही अडथळा नाही. या विचित्र राजकारणात नव्याने आमदार झालेल्या सांगलीच्या सुधीर गाडगीळ व विलासराव जगताप यांनाही मंत्रीपदाची लॉटरी लागू शकते.अजिल्ह्याला किती मंत्रीपदे मिळणार, हा उत्सुकतेचा विषय असतानाच महामंडळे व विधानपरिषदांच्या जागांवर आता सांगलीतील काही नेत्यांचा डोळा आहे. आघाडी सरकारच्या कालावधित जिल्ह्यात तीन कॅबिनेट मंत्रीपदे, दोन महामंडळांचे अध्यक्षपद जिल्ह्याकडे होते. त्या प्रमाणात जिल्ह्यातील भाजपची दावेदारी सुरू झाली आहे. मंत्रीपदे कमी मिळाली तर, भाजपचे अन्य नेते, आमदार यांच्याकडून महामंडळांवर दावा केला जाणार आहे. काहींना विधानपरिषदेची आमदारकीही हवी आहे. मंत्रीपदे कमी मिळाली तर, उर्वरित आमदारांपैकी काहींची महामंडळावर वर्णी लागू शकते.यासाठी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, मकरंद देशपांडे यांची दावेदारी आहे. जिल्ह्याची परंपरा कायम राहणार का?जिल्ह्यात वसंतदादा पाटील यांनी तीनवेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले. राजारामबापू पाटील, बॅ. जी. डी. पाटील, शालिनीताई पाटील, शिवाजीराव देशमुख, शिवाजीराव शेंडगे, अण्णा डांगे, अजितराव घोरपडे, शिवाजीराव नाईक, आर. आर. पाटील, जयंत पाटील, पतंगराव कदम, मदन पाटील यांनी मंत्रीपद भूषवले आहे. प्रतीक पाटील यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्रीपदाचा मानही जिल्ह्याला मिळाला होता. त्यामुळे मंत्रीपदाची ही परंपरा किती प्रमाणात आता भाजप सरकारच्या कालावधित राखली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. महामंडळांची पदे आणि पक्षीय प्रदेशाध्यक्षपदांबाबतही जिल्हा राज्याच्या राजकारणात आघाडीवर राहिला आहे. यंदा सांगलीच्या पदरात फारशी पदे पडणार नाहीत, अशीच चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे भाजपच्या आमदारांसह निष्ठावंत म्हणून काम करणाऱ्या जिल्ह्यातील नेत्यांना त्याची चिंता वाटू लागली आहे.