शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात शिवसेनेला आणखी एक धक्का? माजी आमदाराची पावले भाजपच्या दिशेने

By विश्वास पाटील | Updated: September 7, 2022 11:50 IST

अजूनही मूळच्या शिवसेनेला राम राम केलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही झेंडा खांद्यावर घेतलेला नाही

विश्वास पाटील

कोल्हापूर : करवीर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांची पावले भाजपच्या दिशेने पडत असल्याची चर्चा आहे. त्यांनी अजूनही मूळच्या शिवसेनेला राम राम केलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही झेंडा खांद्यावर घेतलेला नाही; परंतु मतदारसंघातील संभाव्य राजकीय कोंडी टाळण्यासाठी त्यांना भाजपचा पर्याय जास्त योग्य वाटत असल्याचे समजते. तूर्त त्यांचा पवित्रा ‘ठंडा करके खावो..’ असा आहे. शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र यावेत, अशी त्यांची भूमिका आहे; परंतु आजच्या घडीला ते संभवत नाही.

करवीर मतदारसंघातून नरके हे दोन वेळा शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर विजयी झाले आहेत. त्यांचा मतदारसंघात पारंपरिक विरोधक काँग्रेस आहे. नरके गट म्हणून स्वत:ची राजकीय ताकद, नवे तरुण नेतृत्व, दांडगा लोकसंपर्क आणि शिवसेनेचा आक्रमकपणा अशी मोट बांधून त्यांनी विजय खेचून आणला. हा मतदारसंघ काय शिवसेनेचे पॉकेट नाही हे खरे असले, तरी नरके यांना विजयी करण्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची व भगव्या झेंड्याची मोठी मदत झाली आहे, हे पण नाकारता येत नाही; परंतु तरीही ते शिवसेना सोडून अन्य पर्याय शोधत आहेत, त्याची काही प्रमुख कारणे अशी :

>>शिवसेनेत बंड होऊन सरकार पडले तरी दोन्ही काँग्रेस व शिवसेना अजूनही महाविकास आघाडी म्हणून एकत्रितच आहेत. आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवण्याचे त्यांचे नियोजन आहे. तसे झाल्यास हा मतदारसंघ विद्यमान आमदार असल्याने काँग्रेसच्या पी. एन. पाटील यांनाच मिळू शकतो. त्यावेळी नरके यांच्यापुढे बंडखोरी करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

>>ज्या शिवसेनेने दोन वेळा गुलाल दिला, त्यांच्याशी गद्दारी करून रिंगणात उतरले तर कोल्हापूरच्या जनतेला ते आवडणार नाही. त्याचा फटका बसू शकतो. त्यामुळे शिंदे गटात जाण्यापेक्षा थेट भाजपमध्येच गेल्यास गद्दारीचा डाग टाळता येऊ शकेल असाही त्यांचा होरा आहे. काही प्रमुख कार्यकर्त्यांशी त्यांची यासंबंधी चर्चाही झाली आहे.

>>विधानसभेच्या निवडणुकीशी कुंभी-कासारी कारखान्याचे राजकारण व अर्थकारणही जोडले गेले आहे. या कारखान्याला पॅकेजची आवश्यकता आहे. भाजपमध्ये गेल्यास केंद्र सरकारच्या मदतीने काही पॅकेज मिळवणे शक्य होईल, असाही हेतू आहे.

>>शिंदे गटाचे कोल्हापूरचे नेतृत्व आता माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडे आहे. त्यांचा करवीर मतदारसंघाशी काहीच संबंध नाही. खासदार संजय मंडलिकही शिंदे गटात आहेत; परंतु तेच भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे. लोकसभा व विधानसभा एकत्रच झाल्यास कमळ व मोदी यांच्या लोकप्रियतेचा लाभ होऊ शकतो असेही गणित मांडले जाऊ लागले आहे.

>>मुख्यमंत्री शिंदे गटाचे म्हाेरके म्हटले जाणारे आमदार रवींद्र फाटके हे नरके यांचे व्याही आहेत. त्यामुळे मतदारसंघातील अडचण सांगून मुख्यमंत्री शिंदे यांच्याच संमतीने भाजपचा झेंडा हातात घ्यावा अशा हालचाली आहेत. भाजपमध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार विनय कोरे, खासदार धनंजय महाडिक यांची त्यांना राजकीय ताकद मिळू शकते. कोरे-नरके अशी प्राथमिक चर्चाही झाल्याचे समजते.

>>शिवसेनेचा शिये-वडणगे परिसरात जास्त दबदबा आहे; परंतु मूळची शिवसेना व नरके गट यांच्यातही फारसे सख्य नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाBJPभाजपा