शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

साखर संघाची शेतकऱ्यांविरोधात हुजरेगिरी, राजू शेट्टी यांचा आरोप 

By राजाराम लोंढे | Updated: February 22, 2025 11:49 IST

महाभियोक्तांनी ही पाजळले ज्ञान

जयसिंगपूर : राज्य साखर संघाने एफआरपीच्या कायद्याच्या सुनावणीत शेतकऱ्यांविरोधात हुजरेगिरी केल्याचा आरोप ‘स्वाभिमानी’चे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला. या विषयात राज्याच्या महाभियोक्तांनी ज्ञान पाजळल्याची टीकाही त्यांनी केली.शेट्टी म्हणाले, राज्यातील उस उत्पादक शेतक-यांना एक रक्कमी ‘एफआरपी’ चा कायदा पुर्ववत व्हावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयातील याचिकेवरील सुनावणी पुर्ण झाली असून लवकरच याबाबत उस उत्पादक शेतक-यांना दिलासा मिळेल असा विश्वास वाटतो. राज्य सरकारचे महाभियोक्ता व राज्य साखर संघाचे वकील अंतरकर यांनी उच्च न्यायालयात शेतक-यांच्याविरोधात दोन आठवडे आपले उलटसुलट अज्ञान पाजळताना त्यांना जराही लाज वाटली नाही.केंद्राच्या कायद्यात बदल करण्याचा अधिकार राज्य सरकारला नसताना एफआरपीच्या कायद्यात मोडतोड केली. एकीकडे शेतक-यांना १४ दिवसात एक रक्कमी ‘एफआरपी’ देणे बंधनकारक असताना राज्यात जवळपास तीन हजार पाचशे कोटी रूपयापेक्षा जास्त रक्कमेची ‘एफआरपी’ थकीत राहिली आहे.सरकारचा भत्ता व सोयीसुविधा घेणारे राज्याचे महाभियोक्ता बिरेंद्र सराफ व राज्य साखर संघाचे वकील अंतरकर यांनी केंद्र सरकारने केलेल्या कायद्याचा आदर करत राज्यातील लाखो उस उत्पादक शेतक-यांची बाजू मांडणे आवश्यक होते. मात्र दोघांनीही न्यायालयात साखर कारखानदारांची हुजरेगिरी केली. उस उत्पादकांची घरे जाळून साखर कारखानदारांना अभय देणा-या राज्य साखर संघाचे वकील अंतरकर यांनी तर राजू शेट्टी यांनी घातलेल्या उसाची सर्व बिले ‘एफआरपी’ प्रमाणे दिले असल्याचे न्यायालयास निदर्शनास आणून दिले. मात्र त्यांना चालू गळीत हंगामातील लाखो उस उत्पादकांचे थकीत हजारो कोटी रूपयाच्या रक्कमेबद्दल बोलावसे वाटले नाही, असे शेट्टी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेRaju Shettyराजू शेट्टीCourtन्यायालय