शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
4
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
5
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
6
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
7
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
8
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
9
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
11
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
12
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
13
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
14
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
15
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
16
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
17
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
18
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
19
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
20
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका निवडणुकीचा विसर, इच्छुकांचाही संयम संपला; सरकार संघर्षातच गुरफटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 18:13 IST

राज्यातील मुंबई, नवी मुंबई, पुणे यासह पंधराहून अधिक महानगरपालिकांतील लोकनियुक्त सभागृहांची मुदत संपली असून, तेथे प्रशासकीय राजवट सुरू आहे

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका सभागृहाची मुदत संपून आता २३ महिने उलटून गेले, अद्याप निवडणूक तारखेचा घोळ सुरू आहे. राज्यातील सत्ता संघर्षातील रोज एक नाट्य पाहायला मिळत असल्याने निवडणूक कधी होणार याकडे डोळे लावून बसलेल्या इच्छुकांनाही आता त्याचा विसर पडला आहे. राज्यातील बहुसंख्य महानगरपालिकांची अशीच अवस्था असून, ती लोकशाही मोडकळीस आणणारी आहे.राज्यातील मुंबई, नवी मुंबई, पुणे यासह पंधराहून अधिक महानगरपालिकांतील लोकनियुक्त सभागृहांची मुदत संपली असून, तेथे प्रशासकीय राजवट सुरू आहे. मार्च २०२० मध्ये सुरू झालेली कोविडची साथ, त्यानंतर ओबीसी आरक्षण, न्यायालयीन लढाई, प्रभाग रचनेतील राज्य सरकारचा हस्तक्षेप अशा विविध कारणांनी महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या. राज्यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आले. त्यांच्याकडून निवडणूक लवकर जाहीर केल्या जातील, अशी अपेक्षा होती. परंतु, हे सरकार वैध की अवैध, शिवसेना नेमकी कोणाची, धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार अशा संघर्षातच गुरफटले आहे. त्यांना राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारातील मुदत संपलेल्या संस्थांच्या निवडणुकीकडे पाहायला वेळ नाही.स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका अतिशय चुरशीने होत असतात. या निवडणुकांच्या निकालावर राज्यात देशात कोणाची सत्ता येणार ठरत असते. पक्षीय ताकद ठरत असते. त्यामुळे या निवडणुकांकडे जसा स्थानिक उमेदवारांत उत्साह असतो, तसा राजकीय पक्षातही दिसून येतो. परंतु, राज्यातील सत्तेतील राजकीय पक्ष आपल्या खुर्च्या टिकविण्यात व्यस्त राहिल्याने त्यांचे या निवडणुकांकडे दुर्लक्ष झाले आहे. निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांमधील उत्साहदेखील मावळलेला पाहायला मिळत आहे. ‘कधी व्हायची त्या वेळी निवडणूक होऊ दे’ असे म्हणत इच्छुकांनी समाजसेवा बंद ठेवली आहे.माजी नगरसेवक अधिकाऱ्यांच्या मागेनिवडणुका न झाल्यामुळे शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कचरा उठाव, पाणी पुरवठा, खराब रस्ते यासारख्या समस्या कोणाकडे मांडायच्या, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. काही माजी नगरसेवक या समस्या घेऊन अधिकाऱ्यांच्या मागे फिरत आहेत. त्यांना अधिकारी दाद लागू देत नाहीत असा अनुभव अनेकांना येत आहे. प्रशासकीय राजवटीमुळे अधिकाऱ्यांवर कोणाचेच नियंत्रण राहिलेले नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक