शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
5
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
6
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
7
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
8
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
9
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
10
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
11
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
12
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
13
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
14
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
15
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
16
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
17
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
18
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
19
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
20
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान

महापालिका निवडणुकीचा विसर, इच्छुकांचाही संयम संपला; सरकार संघर्षातच गुरफटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 18:13 IST

राज्यातील मुंबई, नवी मुंबई, पुणे यासह पंधराहून अधिक महानगरपालिकांतील लोकनियुक्त सभागृहांची मुदत संपली असून, तेथे प्रशासकीय राजवट सुरू आहे

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका सभागृहाची मुदत संपून आता २३ महिने उलटून गेले, अद्याप निवडणूक तारखेचा घोळ सुरू आहे. राज्यातील सत्ता संघर्षातील रोज एक नाट्य पाहायला मिळत असल्याने निवडणूक कधी होणार याकडे डोळे लावून बसलेल्या इच्छुकांनाही आता त्याचा विसर पडला आहे. राज्यातील बहुसंख्य महानगरपालिकांची अशीच अवस्था असून, ती लोकशाही मोडकळीस आणणारी आहे.राज्यातील मुंबई, नवी मुंबई, पुणे यासह पंधराहून अधिक महानगरपालिकांतील लोकनियुक्त सभागृहांची मुदत संपली असून, तेथे प्रशासकीय राजवट सुरू आहे. मार्च २०२० मध्ये सुरू झालेली कोविडची साथ, त्यानंतर ओबीसी आरक्षण, न्यायालयीन लढाई, प्रभाग रचनेतील राज्य सरकारचा हस्तक्षेप अशा विविध कारणांनी महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या. राज्यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आले. त्यांच्याकडून निवडणूक लवकर जाहीर केल्या जातील, अशी अपेक्षा होती. परंतु, हे सरकार वैध की अवैध, शिवसेना नेमकी कोणाची, धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार अशा संघर्षातच गुरफटले आहे. त्यांना राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारातील मुदत संपलेल्या संस्थांच्या निवडणुकीकडे पाहायला वेळ नाही.स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका अतिशय चुरशीने होत असतात. या निवडणुकांच्या निकालावर राज्यात देशात कोणाची सत्ता येणार ठरत असते. पक्षीय ताकद ठरत असते. त्यामुळे या निवडणुकांकडे जसा स्थानिक उमेदवारांत उत्साह असतो, तसा राजकीय पक्षातही दिसून येतो. परंतु, राज्यातील सत्तेतील राजकीय पक्ष आपल्या खुर्च्या टिकविण्यात व्यस्त राहिल्याने त्यांचे या निवडणुकांकडे दुर्लक्ष झाले आहे. निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांमधील उत्साहदेखील मावळलेला पाहायला मिळत आहे. ‘कधी व्हायची त्या वेळी निवडणूक होऊ दे’ असे म्हणत इच्छुकांनी समाजसेवा बंद ठेवली आहे.माजी नगरसेवक अधिकाऱ्यांच्या मागेनिवडणुका न झाल्यामुळे शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कचरा उठाव, पाणी पुरवठा, खराब रस्ते यासारख्या समस्या कोणाकडे मांडायच्या, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. काही माजी नगरसेवक या समस्या घेऊन अधिकाऱ्यांच्या मागे फिरत आहेत. त्यांना अधिकारी दाद लागू देत नाहीत असा अनुभव अनेकांना येत आहे. प्रशासकीय राजवटीमुळे अधिकाऱ्यांवर कोणाचेच नियंत्रण राहिलेले नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक