शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

ओळख लपवूनही राहतात परदेशी, त्यात आहेत सर्वाधिक बांगलादेशी; शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान

By उद्धव गोडसे | Updated: April 29, 2025 12:00 IST

आश्रय देणाऱ्यांवर कारवाईची गरज

उद्धव गोडसेकोल्हापूर : पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना देशाबाहेर घालवण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत. हे सर्व पाकिस्तानी अधिकृतरीत्या भारतात आले होते. याचवेळी ओळख लपवून देशात राहिलेल्या परदेशींनाही हाकलून लावण्याची गरज व्यक्त केली जात आहे. विशेषत: अनेक बांगलादेशी नागरिक बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात राहात आहेत. कोल्हापुरातही असे प्रकार उघडकीस आल्याने त्यांना शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.

बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान यासह काही आफ्रिकन देशांचे नागरिक ओळख लपवून भारतात राहिल्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा घडले आहेत. देशविघातक कृत्यांमधील त्यांचा सहभाग स्पष्ट झाला आहे. पहलगाम येथील हल्ल्यात थेट काही पाकिस्तानी दहशतवाद्यांचा सहभाग असल्याचे निदर्शनास येताच सरकारने देशातील सर्व पाकिस्तानींना परत पाठवण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार दीर्घकाळ मुदतीचा व्हिसा नसलेल्या पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्यात आले. मात्र, छुप्या मार्गाने येऊन ओळख लपवून भारतात राहिलेले अनेक परदेशी नागरिक आजही देशाच्या सुरक्षेसाठी मोठा धोका आहेत. त्यांना शोधून देशाबाहेर घालवण्याचे आव्हान पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांसमोर आहे.

स्थानिकांची मदतसहा महिन्यांपूर्वी कोल्हापुरात दोन बांगलादेशी महिलांना अटक झाली होती. देहविक्रीच्या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या त्या दोन्ही महिलांना सांगलीतील एका एजंटने आधारकार्ड आणि रेशनकार्ड काढून दिल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली होती. यावरून परदेशी नागरिकांना मदत करण्यात आणि आश्रय देण्यात स्थानिक रहिवासी सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले होते. यांचा वेळीच शोध न घेतल्यास येणाऱ्या काळात राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दहशतवादी कारवायांमध्ये सहभागगेल्यावर्षी पुणे जिल्ह्यात पोलिसांनी पकडलेल्या दोन बांगलादेशींचा दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट झाले होते. अवैध धंद्यांमध्येही त्यांच्या सहभागाचे अनेक पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. त्यामुळे ओळख लपवून राहणारे परदेशी अधिक घातक ठरत आहेत.

अमली तस्करीअमली पदार्थांची तस्करी करणे आणि बनावट नोटांच्या गुन्ह्यातही काही परदेशी नागरिकांचा सहभाग आढळला आहे. अमली पदार्थांची तस्करी करणारे दोन आफ्रिकन आरोपी कळंबा कारागृहात शिक्षा भोगत आहेत. गोव्यासह दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटकात त्यांचा वावर असल्याचे बोलले जाते.

तपास रखडले?करवीर पोलिसांकडून बांगलादेशी महिलांचा तपास सुरू होता. त्यांना आधारकार्ड आणि रेशनकार्ड कोणी काढून दिले? त्यांना सांगलीत कोणी आणले? आश्रय कोणी दिला? त्यांना कोल्हापुरात घेऊन येणारे कोण आहेत? त्या महिलांना परत बांगलादेशात पाठवण्यासाठी पोलिसांनी काय केले? असे अनेक प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBangladeshबांगलादेशPakistanपाकिस्तानPoliceपोलिसIndian Armyभारतीय जवान