शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

ओळख लपवूनही राहतात परदेशी, त्यात आहेत सर्वाधिक बांगलादेशी; शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान

By उद्धव गोडसे | Updated: April 29, 2025 12:00 IST

आश्रय देणाऱ्यांवर कारवाईची गरज

उद्धव गोडसेकोल्हापूर : पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना देशाबाहेर घालवण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत. हे सर्व पाकिस्तानी अधिकृतरीत्या भारतात आले होते. याचवेळी ओळख लपवून देशात राहिलेल्या परदेशींनाही हाकलून लावण्याची गरज व्यक्त केली जात आहे. विशेषत: अनेक बांगलादेशी नागरिक बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात राहात आहेत. कोल्हापुरातही असे प्रकार उघडकीस आल्याने त्यांना शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.

बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान यासह काही आफ्रिकन देशांचे नागरिक ओळख लपवून भारतात राहिल्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा घडले आहेत. देशविघातक कृत्यांमधील त्यांचा सहभाग स्पष्ट झाला आहे. पहलगाम येथील हल्ल्यात थेट काही पाकिस्तानी दहशतवाद्यांचा सहभाग असल्याचे निदर्शनास येताच सरकारने देशातील सर्व पाकिस्तानींना परत पाठवण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार दीर्घकाळ मुदतीचा व्हिसा नसलेल्या पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्यात आले. मात्र, छुप्या मार्गाने येऊन ओळख लपवून भारतात राहिलेले अनेक परदेशी नागरिक आजही देशाच्या सुरक्षेसाठी मोठा धोका आहेत. त्यांना शोधून देशाबाहेर घालवण्याचे आव्हान पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांसमोर आहे.

स्थानिकांची मदतसहा महिन्यांपूर्वी कोल्हापुरात दोन बांगलादेशी महिलांना अटक झाली होती. देहविक्रीच्या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या त्या दोन्ही महिलांना सांगलीतील एका एजंटने आधारकार्ड आणि रेशनकार्ड काढून दिल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली होती. यावरून परदेशी नागरिकांना मदत करण्यात आणि आश्रय देण्यात स्थानिक रहिवासी सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले होते. यांचा वेळीच शोध न घेतल्यास येणाऱ्या काळात राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दहशतवादी कारवायांमध्ये सहभागगेल्यावर्षी पुणे जिल्ह्यात पोलिसांनी पकडलेल्या दोन बांगलादेशींचा दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट झाले होते. अवैध धंद्यांमध्येही त्यांच्या सहभागाचे अनेक पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. त्यामुळे ओळख लपवून राहणारे परदेशी अधिक घातक ठरत आहेत.

अमली तस्करीअमली पदार्थांची तस्करी करणे आणि बनावट नोटांच्या गुन्ह्यातही काही परदेशी नागरिकांचा सहभाग आढळला आहे. अमली पदार्थांची तस्करी करणारे दोन आफ्रिकन आरोपी कळंबा कारागृहात शिक्षा भोगत आहेत. गोव्यासह दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटकात त्यांचा वावर असल्याचे बोलले जाते.

तपास रखडले?करवीर पोलिसांकडून बांगलादेशी महिलांचा तपास सुरू होता. त्यांना आधारकार्ड आणि रेशनकार्ड कोणी काढून दिले? त्यांना सांगलीत कोणी आणले? आश्रय कोणी दिला? त्यांना कोल्हापुरात घेऊन येणारे कोण आहेत? त्या महिलांना परत बांगलादेशात पाठवण्यासाठी पोलिसांनी काय केले? असे अनेक प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBangladeshबांगलादेशPakistanपाकिस्तानPoliceपोलिसIndian Armyभारतीय जवान