शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
4
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
5
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
6
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
7
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
8
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
9
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
10
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
11
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
12
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
13
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
14
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
15
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
16
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
17
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
18
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
19
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
20
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 

ओळख लपवूनही राहतात परदेशी, त्यात आहेत सर्वाधिक बांगलादेशी; शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान

By उद्धव गोडसे | Updated: April 29, 2025 12:00 IST

आश्रय देणाऱ्यांवर कारवाईची गरज

उद्धव गोडसेकोल्हापूर : पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना देशाबाहेर घालवण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत. हे सर्व पाकिस्तानी अधिकृतरीत्या भारतात आले होते. याचवेळी ओळख लपवून देशात राहिलेल्या परदेशींनाही हाकलून लावण्याची गरज व्यक्त केली जात आहे. विशेषत: अनेक बांगलादेशी नागरिक बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात राहात आहेत. कोल्हापुरातही असे प्रकार उघडकीस आल्याने त्यांना शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.

बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान यासह काही आफ्रिकन देशांचे नागरिक ओळख लपवून भारतात राहिल्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा घडले आहेत. देशविघातक कृत्यांमधील त्यांचा सहभाग स्पष्ट झाला आहे. पहलगाम येथील हल्ल्यात थेट काही पाकिस्तानी दहशतवाद्यांचा सहभाग असल्याचे निदर्शनास येताच सरकारने देशातील सर्व पाकिस्तानींना परत पाठवण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार दीर्घकाळ मुदतीचा व्हिसा नसलेल्या पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्यात आले. मात्र, छुप्या मार्गाने येऊन ओळख लपवून भारतात राहिलेले अनेक परदेशी नागरिक आजही देशाच्या सुरक्षेसाठी मोठा धोका आहेत. त्यांना शोधून देशाबाहेर घालवण्याचे आव्हान पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांसमोर आहे.

स्थानिकांची मदतसहा महिन्यांपूर्वी कोल्हापुरात दोन बांगलादेशी महिलांना अटक झाली होती. देहविक्रीच्या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या त्या दोन्ही महिलांना सांगलीतील एका एजंटने आधारकार्ड आणि रेशनकार्ड काढून दिल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली होती. यावरून परदेशी नागरिकांना मदत करण्यात आणि आश्रय देण्यात स्थानिक रहिवासी सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले होते. यांचा वेळीच शोध न घेतल्यास येणाऱ्या काळात राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दहशतवादी कारवायांमध्ये सहभागगेल्यावर्षी पुणे जिल्ह्यात पोलिसांनी पकडलेल्या दोन बांगलादेशींचा दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट झाले होते. अवैध धंद्यांमध्येही त्यांच्या सहभागाचे अनेक पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. त्यामुळे ओळख लपवून राहणारे परदेशी अधिक घातक ठरत आहेत.

अमली तस्करीअमली पदार्थांची तस्करी करणे आणि बनावट नोटांच्या गुन्ह्यातही काही परदेशी नागरिकांचा सहभाग आढळला आहे. अमली पदार्थांची तस्करी करणारे दोन आफ्रिकन आरोपी कळंबा कारागृहात शिक्षा भोगत आहेत. गोव्यासह दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटकात त्यांचा वावर असल्याचे बोलले जाते.

तपास रखडले?करवीर पोलिसांकडून बांगलादेशी महिलांचा तपास सुरू होता. त्यांना आधारकार्ड आणि रेशनकार्ड कोणी काढून दिले? त्यांना सांगलीत कोणी आणले? आश्रय कोणी दिला? त्यांना कोल्हापुरात घेऊन येणारे कोण आहेत? त्या महिलांना परत बांगलादेशात पाठवण्यासाठी पोलिसांनी काय केले? असे अनेक प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBangladeshबांगलादेशPakistanपाकिस्तानPoliceपोलिसIndian Armyभारतीय जवान