शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

अण्णा हजारेंच्या जनआंदोलनापासून देशात परकीय शक्तींचा हस्तक्षेप, परिमल सुधाकर यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 12:05 IST

आर्थिक विषमता, बेरोजगारी देशांवरील अस्थिरतेची टांगती तलवार

कोल्हापूर : दक्षिण आशियातील नेपाळ, श्रीलंका आणि बांग्लादेशमधील जनआंदोलन उफाळून सत्तांतर झाले हे जरी खरे असले तरी त्यामागे परकीय शक्तींचा हस्तक्षेप होताच. आपल्या देशात पंधरा वर्षापूर्वीच म्हणजे २०११ मध्येच अण्णा हजारे यांच्या जनआंदोलनापासूनच या हस्तक्षेपाची सुरुवात झाली होती. तिन्ही देशांतील जनउद्रेकामागे तेथील आर्थिक विषमता आणि बेरोजगारी हेच कारण होते, आगामी काळातही भारतासह सर्व दक्षिण आशिया देशांवर राजकीय अस्थिरतेची टांगती तलवार कायम असल्याचे प्रतिपादन डॉ. परिमल सुधाकर यांनी केले.येथील राजर्षी शाहू स्मारक भवनात बुधवारी श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित अविनाश पानसरे व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प डॉ. सुधाकर यांनी ‘ दक्षिण आशियातील जनतेचे उठाव आणि सत्तांतर’ या विषयावर गुंफले. ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले अध्यक्षस्थानी होते.डॉ. परिमल सुधाकर म्हणाले, श्रीलंकेत महागाई आणि सरकारचे धोरण, बांगलादेशात आरक्षण व न्यायालयीन हस्तक्षेप तर नेपाळ मध्ये सोशल मीडियावर घातलेली बंदी यामुळे जन आंदोलन उभे राहिले. या देशांतील ही जरी कारणे असली तरी तेथील प्रस्थापित राजकीय पक्ष व नेते यांच्या विरोधात जनमत ताणलेले होते. जनआंदोलनातून सत्तांतर झाले पण, आंदोलनातील प्रमुख घटक असलेला ‘जेन्झी’ ( १९९७ नंतर जन्मलेला तरुण) कडे स्वत:ची वैचारिक बैठक नसल्याने नवनिर्मितीची बांधणी त्यांच्याकडे नव्हती. श्रीलंकेतील आंदोलनात ‘जेन्झी’सह श्रमिक, शेतकऱ्यांसह विविध संघटना उतरल्याने अहिसंक आंदोलन झाले. त्या उलट नेपाळ आणि बांगलादेशात घडले. या आंदोलनामध्ये परकीय शक्तींचा हस्तक्षेप राहिला. आपल्या देशात यापूर्वीच आण्णा हजारेंच्या आंदोलनातून झाला होता, त्यावेळी ‘भ्रष्टाचार आणि घराणेशाही’ केंद्रबिंदू होता. यावेळी ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. अंशुमन सुळगांवकर यांनी प्रास्ताविक केले. मोहसीन मोमीन यांनी आभार मानले.

English
हिंदी सारांश
Web Title : Foreign powers meddling since Anna Hazare's movement: Parimal Sudhakar

Web Summary : Dr. Parimal Sudhakar believes foreign powers have interfered in India since Anna Hazare's 2011 movement. He connects it to unrest in Nepal, Sri Lanka, and Bangladesh, fueled by economic disparity, but lacking strong ideological foundations. Political instability looms over South Asia.