शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
4
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
5
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
6
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
8
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
9
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
10
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
11
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
12
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
13
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
14
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

दहा टक्के साखर निर्यातीची सक्ती करा-- राजू शेट्टी : उमळवाड येथे शेतकरी मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 12:16 AM

राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी अखेरीची बिले अद्याप दिली नाहीत. त्यामुळे २७ व २८ जूनला साखर आयुक्तांना घेराव घालण्यासाठी पुण्याला जायचे आहे.

उदगाव : राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी अखेरीची बिले अद्याप दिली नाहीत. त्यामुळे २७ व २८ जूनला साखर आयुक्तांना घेराव घालण्यासाठी पुण्याला जायचे आहे. उर्वरित बिले काढल्याशिवाय संघटना गप्प बसणार नाही. साखरेला भाव मिळण्यासाठी देशातून ३० लाख टन साखर निर्यात केल्यास भाव आपोआप वाढतील. प्रत्येक साखर कारखान्याला १० टक्के साखर निर्यात करण्याची सक्ती केल्यास शेतकऱ्याला चांगला भाव मिळेल, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले.

उमळवाड (ता. शिरोळ) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना व ग्रामविकास आघाडी यांच्यावतीने उद्घाटन सोहळा व शेतकरी मेळावा आयोजित केला होता. यावेळी खासदार शेट्टी बोलत होते. जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती शुभांगी शिंदे यांच्या फंडातून उमळवाडच्या विकासासाठी सुमारे ५७ लाख रुपयांच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी शेट्टी म्हणाले, राज्यात २५०० कोटी, तर देशात २० हजार कोटी रुपये साखर कारखानदारांनी थकविले आहे. हे पैसे ३० जूनच्या आत अगोदर द्यावेत अन्यथा आर्थिक कोंडी होईल.उपसरपंच सरिता भवरे यांनी स्वागत, तर सागर चिपरगे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सावकार मादनाईक, शेखर पाटील, राजगोंडा पाटील, सुरेश कांबळे, सचिन शिंदे, नगरसेवक नितीन बागे उपस्थित होते.मृतदेहावरील कापडालाही जीएसटीभाजप सरकारने शेतकºयांच्या वस्तूबरोबरच मृतदेहावरील कापडावरही जीएसटी लावला आहे. त्यामुळे या सरकारला आता खुर्चीवरून खाली खेचल्याशिवाय पर्याय नाही असे शेट्टी म्हणाले.भाजपमुळे दर पडलेभाजप सरकार एकीकडे सोयाबीन, हरभरा, तूर, उडीद, मूग खरेदी करतो असे सांगतात. मग ते खरेदी केले जात नाही. भारतात अतिरिक्त साखर असताना पाकिस्तान देशातून साखर खरेदी केली जाते. भाजीपाल्याला काडीमोड भाव या भाजप सरकारमुळेच मिळत असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूर