शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

कोल्हापूर जिल्ह्याचे ‘लक्ष’ आता ‘राजाराम’कडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:24 IST

कसबा बावडा : गोकुळमध्ये ३० वर्षांपासून असलेल्या माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या सत्तेला पालकमंत्री सतेज पाटील यांनी जोरदार हादरा ...

कसबा बावडा : गोकुळमध्ये ३० वर्षांपासून असलेल्या माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या सत्तेला पालकमंत्री सतेज पाटील यांनी जोरदार हादरा देत सत्तांतर केले. त्यामुळे आता महाडिक यांच्या ताब्यात असलेल्या कसबा बावडा (ता. करवीर) येथील ‘राजाराम’ कारखान्यामध्ये काय होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे ‘लक्ष’ लागून राहिले आहे. गेली २५ वर्षे महादेवराव महाडिक यांच्याकडे राजाराम कारखान्याची सत्ता आहे.

राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीला ३१ ऑगस्टपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे ही निवडणूक कोरोना आटोक्यात आला तर ऑक्टोबर - नोव्हेंबर दरम्यान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्तारूढ व विरोधी गटाची आतापासूनच युद्धपातळीवर मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

राजारामचे १३४६ सभासद विविध कारणांनी प्रादेशिक सहसंचालक साखर यांनी अपात्र ठरविले होते. याबाबत राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्यावतीने एकूण १८९९ हरकती दाखल केल्या होत्या. याबाबत सुनावणी होऊन प्रादेशिक सहसंचालकांनी ४८४ सभासद पात्र ठरविले होते. यापैकी मृत व दुबार असे ६९ वगळून अपात्र १००८ व कार्यक्षेत्राबाहेरील ३१८ अशा १३४६ सभासदांना प्रादेशिक सहसंचालकांनी अपात्र ठरवले होते. नंतर हा निर्णय सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कायम ठेवल्याने सत्तारूढ गटाला हादरा बसला. या निर्णयाविरोधात सत्तारूढ गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याचा निकाल प्रलंबित आहे.

दरम्यान, मागील निवडणुकीत अवघ्या १०० ते २५० मतांनी पराभूत झाल्याचा वचपा काढण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. दरम्यान, २०१५ च्या निवडणुकीत आपल्याला कोणत्या गावात मताधिक्‍य मिळाले व कोणत्या गावात मताधिक्य मिळाले नाही याचा अभ्यास सत्तारूढ आणि विरोधी गटाकडून सुरू झाला आहे. त्याची दुरुस्ती करण्यात येऊ लागली आहे.

राजाराम कारखान्याच्या यापूर्वी झालेल्या सर्व निवडणुका महादेवराव महाडिक यांनी एकतर्फी जिंकल्या आहेत. मात्र, आता गोकुळमध्येही सत्तांतर केल्याने पालकमंत्री पाटील यांच्या गटाचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे. त्यामुळे राजाराम साखर कारखान्यावरही वर्चस्व मिळविण्यासाठी पाटील गट जोरदार तयारी करण्याची शक्यता आहे.

चौकट : आता ‘राजाराम’ उरलंय...

गोकुळच्या सत्तेला पालकमंत्री सतेज पाटील यांनी सुरुंग लावला. त्यानंतर ‘आता फक्त राजाराम उरलंय’ अशी पोस्ट सोशल मीडियावर गोकुळच्या निकालानंतर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. त्यामुळे राजाराम कारखान्याची निवडणूक नेमकी कधी होणार आहे हे माहीत नसतानाही ही निवडणूक चर्चेत आली आहे.

चौकट: राजारामचे कार्यक्षेत्र....

राजाराम साखर कारखान्याचे करवीर तालुक्यातील ३०, पन्हाळा तालुक्यातील १८, शाहूवाडी ३६, गगनबावडा १४, हातकलंगडे ३२, राधानगरी १४ व कागल तालुक्यातील ४ अशा एकूण १२२ गावांत कार्यक्षेत्र आहे.