शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

परतीच्या पावसाने पुष्प पठार पुन्हा बहरले!

By admin | Updated: October 5, 2015 00:18 IST

कास पठार : पर्यटकांसाठी अजून महिनाभर राहणार विविधरंगी फुलांचा हंगाम

पेट्री : शहराच्या पश्चिमेकडील कास पुष्प पठारावर गुरुवारी रात्रीच्या व शुक्रवारी दुपारच्या जोरदार पावसामुळे फुलांचा हंगाम आणखी २० ते २५ दिवसांनी वाढला आहे. यामुळे वरुणराजाने पर्यटकांना ही फुलांची पर्वणी पाहण्याची संधी प्राप्त करून दिली आहे. दरम्यान, या पठाराला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येचा आकडा लाखोंच्या घरात येऊन पोहोचला आहे. तसेच पठारावर वाहनांची रीघ पाहता जणू काही कास पठार ‘कार पठार’ बनले आहे. फ्रान्स, जर्मनी, जपानसारख्या परदेशी पर्यटकांनी कास पुष्प पठाराला भेट देऊन जैवविविधतेचे कौतुक केले आहे.जिल्ह्यातील कास पुष्प पठार हे आंतरराष्ट्रीय जैवविविधता असणारे मुख्य पर्यटनस्थळ ओळखले जात असून, सध्या अबोलिया, तेरडा, चवर या फुलांचा हंगाम कमी झाला असून, इतर फुले चांगल्या प्रकारे बहरलेली दिसून येत आहे. यामध्ये मिकी माऊस, टोपली, कारवी प्रामुख्याने पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे महिनाभर हंगाम पाहण्याची पर्वणी पर्यटकांना मिळणार आहे. तसेच वाहतूक सुरळीत चालावी, यासाठी वनविभाग, संयुक्त वनव्यवस्थापन समिती, पोलीस यंत्रणा सज्ज होती. तसेच वाहनांची गर्दी होऊन वाहतूक ठप्प होऊ नये, यासाठी गेल्या आठवड्यापासून मोठी वाहने पार्क करण्यासाठी घाटाई फाट्यावर वाहनतळाची व्यवस्था केली आहे. (वार्ताहर)दोन दिवस झालेल्या पावसामुळे पुष्प पठारावरील विविधरंगी फुलांची पर्वणी पर्यटकांना अजून महिनाभर पाहावयास मिळणार आहे. तसेच रस्त्यालगत तेरड्याचा बहर कमी झाला असून, कुमुदिनी कमळे व कुमुदिनी तळ्याच्या राजमार्गावर तेरड्याचा बहर दिसत आहे. पावसामुळे फुले टवटवीत दिसून येत आहेत. - अशोक कुरळे, संयुक्त वनव्यवस्थापन समिती, कासाणीसात वर्षांतून एकदाच पर्वणीटोपलीसारखा आकार असणारा प्लिओकोलस रिची (टोपली कारवी) सध्या कास पुष्प पठारावर पन्नास टक्के फुलली असून, हिचे वैशिष्ट्ये ही सात वर्षांतून एकदाच फुलते. पानावर बारीक काटे असल्याने पानांना ‘खरवर’ म्हणतात.पर्यावरण संतुलन तसेच प्लास्टिक निर्मूलनाचा संदेश देत फर्स्ट क्लिक टेक्नॉलॉजीमार्फत दोन हजार कापडी बॅग पर्यटकांना देण्यात आल्या. यातून पर्यटकांना आपला होणारा सुका कचरा बॅगमधून घरी आणणे सोयीचे व्हावे, तसेच पर्यावरण समतोल राखला जावा हा हेतू आहे, अशी माहिती अझीम मोमीन यांनी दिली.पठारावरील गोळा झालेला दहा पोती कचरा पर्यटनास आलेले पुण्याचे पर्यटक जयेश परांजपे व त्याच्या ५० सहकारी यांनी आपल्या वाहनातून पुण्याला त्याचे निर्मूलन करण्यासाठी नेला. गतवर्षीही त्यांनी हा उपक्रम राबविला होता.