शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने पुष्प पठार पुन्हा बहरले!

By admin | Updated: October 5, 2015 00:18 IST

कास पठार : पर्यटकांसाठी अजून महिनाभर राहणार विविधरंगी फुलांचा हंगाम

पेट्री : शहराच्या पश्चिमेकडील कास पुष्प पठारावर गुरुवारी रात्रीच्या व शुक्रवारी दुपारच्या जोरदार पावसामुळे फुलांचा हंगाम आणखी २० ते २५ दिवसांनी वाढला आहे. यामुळे वरुणराजाने पर्यटकांना ही फुलांची पर्वणी पाहण्याची संधी प्राप्त करून दिली आहे. दरम्यान, या पठाराला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येचा आकडा लाखोंच्या घरात येऊन पोहोचला आहे. तसेच पठारावर वाहनांची रीघ पाहता जणू काही कास पठार ‘कार पठार’ बनले आहे. फ्रान्स, जर्मनी, जपानसारख्या परदेशी पर्यटकांनी कास पुष्प पठाराला भेट देऊन जैवविविधतेचे कौतुक केले आहे.जिल्ह्यातील कास पुष्प पठार हे आंतरराष्ट्रीय जैवविविधता असणारे मुख्य पर्यटनस्थळ ओळखले जात असून, सध्या अबोलिया, तेरडा, चवर या फुलांचा हंगाम कमी झाला असून, इतर फुले चांगल्या प्रकारे बहरलेली दिसून येत आहे. यामध्ये मिकी माऊस, टोपली, कारवी प्रामुख्याने पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे महिनाभर हंगाम पाहण्याची पर्वणी पर्यटकांना मिळणार आहे. तसेच वाहतूक सुरळीत चालावी, यासाठी वनविभाग, संयुक्त वनव्यवस्थापन समिती, पोलीस यंत्रणा सज्ज होती. तसेच वाहनांची गर्दी होऊन वाहतूक ठप्प होऊ नये, यासाठी गेल्या आठवड्यापासून मोठी वाहने पार्क करण्यासाठी घाटाई फाट्यावर वाहनतळाची व्यवस्था केली आहे. (वार्ताहर)दोन दिवस झालेल्या पावसामुळे पुष्प पठारावरील विविधरंगी फुलांची पर्वणी पर्यटकांना अजून महिनाभर पाहावयास मिळणार आहे. तसेच रस्त्यालगत तेरड्याचा बहर कमी झाला असून, कुमुदिनी कमळे व कुमुदिनी तळ्याच्या राजमार्गावर तेरड्याचा बहर दिसत आहे. पावसामुळे फुले टवटवीत दिसून येत आहेत. - अशोक कुरळे, संयुक्त वनव्यवस्थापन समिती, कासाणीसात वर्षांतून एकदाच पर्वणीटोपलीसारखा आकार असणारा प्लिओकोलस रिची (टोपली कारवी) सध्या कास पुष्प पठारावर पन्नास टक्के फुलली असून, हिचे वैशिष्ट्ये ही सात वर्षांतून एकदाच फुलते. पानावर बारीक काटे असल्याने पानांना ‘खरवर’ म्हणतात.पर्यावरण संतुलन तसेच प्लास्टिक निर्मूलनाचा संदेश देत फर्स्ट क्लिक टेक्नॉलॉजीमार्फत दोन हजार कापडी बॅग पर्यटकांना देण्यात आल्या. यातून पर्यटकांना आपला होणारा सुका कचरा बॅगमधून घरी आणणे सोयीचे व्हावे, तसेच पर्यावरण समतोल राखला जावा हा हेतू आहे, अशी माहिती अझीम मोमीन यांनी दिली.पठारावरील गोळा झालेला दहा पोती कचरा पर्यटनास आलेले पुण्याचे पर्यटक जयेश परांजपे व त्याच्या ५० सहकारी यांनी आपल्या वाहनातून पुण्याला त्याचे निर्मूलन करण्यासाठी नेला. गतवर्षीही त्यांनी हा उपक्रम राबविला होता.