शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

Kolhapur Flood: शिरोळ तालुक्यात पूरस्थिती कायम, ५ हजार लोकांचे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 16:51 IST

प्रशासन सज्ज : ४ हजार जनावरेदेखील सुरक्षितस्थळी; पावसाच्या विश्रांतीमुळे पूरग्रस्तांना दिलासा

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यात महापूरसदृश स्थिती अजूनही कायम आहे. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. संभाव्य पुराचा धोका ओळखून जवळपास पूरबाधित गावांतील पाच हजारांहून अधिक नागरिक सुरक्षितस्थळी स्थलांतरित झाले असून, या गावातील चार हजार जनावरेदेखील बाहेर काढण्यात आली आहेत. कृष्णेसह पंचगंगा, वारणा व दुधगंगा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने तालुक्यातील अनेक मार्ग बंद झाले. २०१९ व २०२१ मधील अनुभव पाहता प्रशासनाच्या सूचनेअगोदरच पूरबाधित नागरिकांनी आपल्या जनावरांसह सुरक्षितस्थळी स्थलांतर केले. सुरुवातीला खिद्रापूर, राजापूर, राजापूरवाडी, दानवाड, अकिवाट, कवठेसार, हेरवाड, कुरुंदवाड या गावांतील नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे.

तीन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली. संभाव्य पुराचा धोका ओळखून प्रशासनाने यांत्रिकी बोटी सज्ज ठेवल्या आहेत. एन.डी.आर.एफ. जवानांची तुकडीदेखील दाखल झाली आहे. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पूरग्रस्तांना तात्पुरता तरी दिलासा मिळाला आहे. तालुक्यातील पूर परिस्थिती अजूनही कायम आहे. गुरुदत्त शुगर्स टाकळीवाडी, दत्त कारखाना शिरोळ, पद्माराजे विद्यालय शिरोळ, कुंजवन उदगाव याबरोबरच कुरुंदवाड येथील शाळांमध्येदेखील पूरग्रस्तांची सोय करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात जवळपास बाराशेहून अधिक कुटुंबांना पुराचा फटका बसला असून चारशेहून अधिक कुटुंबे निवारा केंद्रात तर तेराशेहून अधिक कुटुंबांनी स्वत:ची सोय केली आहे. जवळपास चार हजारांहून अधिक पशुधनाचेही स्थलांतर करण्यात आले आहे. यामध्ये छावणीमध्येदेखील जनावरांची सोय करण्यात आली आहे.पूरग्रस्तांनी शोधला पर्याय२०१९ व २०२१ साली आलेल्या महापुराचा अनुभव घेता प्रशासनाच्या मदतीची वाट न पाहता पूरबाधित नागरिकांनी संभाव्य पुराचा धोका ओळखून पै-पाहुणे, नातेवाईक यांच्याकडे आसरा घेतला आहे. शिवाय पशुधनाचीही व्यवस्था केली आहे. प्रशासनानेही पूरग्रस्तांबरोबर पशुधनाच्या सोयीसाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूरshirol-acशिरोळ