शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

स्थानिक आघाड्यांचाच सरपंचपदावर झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 10:38 IST

sarpanch Grampanchyat Kolhpaur- पक्षापेक्षा गट तटावर निवडणूक लढवल्या गेलेल्या ग्रामपंचायत निकालात स्थानिक आघाड्यांचाच बोलबाला राहिला असताना आता सहा तालुक्यांतील सरपंच निवडणुकीतही स्थानिक आघाड्यांनीच पुन्हा एकदा आपणच गावचे किंग असल्याचे दाखवून दिले आहे. मंगळवारी निवड झालेल्या १६७ पैकी ७३ ठिकाणी स्थानिक आघाडीचा सरपंच गावचा कारभारी झाला आहे.

ठळक मुद्देस्थानिक आघाड्यांचाच सरपंचपदावर झेंडा १६७ पैकी ७३ ठिकाणी यश : राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर

कोल्हापूर : पक्षापेक्षा गट तटावर निवडणूक लढवल्या गेलेल्या ग्रामपंचायत निकालात स्थानिक आघाड्यांचाच बोलबाला राहिला असताना आता सहा तालुक्यांतील सरपंच निवडणुकीतही स्थानिक आघाड्यांनीच पुन्हा एकदा आपणच गावचे किंग असल्याचे दाखवून दिले आहे. मंगळवारी निवड झालेल्या १६७ पैकी ७३ ठिकाणी स्थानिक आघाडीचा सरपंच गावचा कारभारी झाला आहे.

४० सरपंचपदासह राष्ट्रवादी दुसऱ्या, शिवसेना १९ सरपंचपदासह तिसऱ्या क्रमांकावर राहिला. भाजप १०, काँग्रेस ९, महाविकास आघाडी ८, ताराराणी, जनसुराज्य प्रत्येकी ३, शेकाप, जनता दल प्रत्येकी १ असे पक्षीय बलाबल राहिले.जिल्ह्यात स्थगिती आलेले सहा तालुके वगळून मंगळवारी कागल, राधानगरी, चंदगड, आजरा, हातकणंगले, गगनबावडा या तालुक्यातील १७३ गावांच्या सरपंच निवडी होणार होत्या, पण सरपंचपदासाठी आरक्षित उमेदवार नसल्याने ६ गावे वगळून उर्वरीत १६७ गावांच्या निवडीची प्रक्रिया पार पडली.अपेक्षेप्रमाणे गगनबावड्यात पालकमंत्री सतेज पाटील एकहाती ८ पैकी ५ ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेतल्या. कागलमध्येही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही ५३ पैकी सर्वाधिक ३१ ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम ठेवले. हातकणंगलेत महाविकास आघाडीचे वर्चस्व राहिले तर आमदार प्रकाश आवाडे व आमदार विनय कोरे यांनी देखील प्रत्येकी तीन गावे आपल्याकडे ठेवण्यात यश मिळविले. आजऱ्यात पक्षापेक्षा २६ पैकी २६ ग्रामपंचायती गटांमध्येच विभागल्या गेल्या. राधानगरीतही ए. वाय. पाटील यांनी राष्ट्रवादीचा गड मजबूत केला. चंदगडमध्ये आमदार राजेश पाटील गटासह ४० जागा स्थानिक आघाडीकडेच राहिल्या.पक्षीय बलाबल

  • स्थानिक आघाडी : ७३
  • राष्ट्रवादी काँग्रेस : ४०
  • शिवसेना : १९
  • भाजप : १०
  • काँग्रेस : ०९
  • महाविकास आघाडी : ०८
  • ताराराणी : ०३
  • जनसुराज्य : ०३
  • शेकाप : ०१
  • जनता दल : ०१ 

स्थानिक आघाड्यामध्ये अनेक ठिकाणी काँग्रेसचा सरपंच झाला असला तरी स्वबळावर काँग्रेसला गगनबावडा व राधानगरीत चांगले यश मिळाले आहे.

सर्वाधिक गावे आपल्याच पक्षाकडे दावा सर्वांचाचग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर सर्वाधिक गावे आपल्याच पक्षाकडे दावा सर्वांनीच केला होता. भाजपनेही तसा दावा केला होता, पण प्रत्यक्षात सरपंच निवडी झाल्यानंतर भाजप जिल्ह्यात चौथ्या क्रमांकावर राहिला आहे. त्यांना कागलमध्ये सर्वाधिक ७, गगनबावडा, १, चंदगड १ आणि हातकणंगले १ अशा १० गावांवरच समाधान मानावे लागले आहे.राष्ट्रवादीला बाजूला ठेवून बाजी मारलीराधानगरी तालुक्यातील पनोरी या गावात सरपंच काँग्रेसचा आणि उपसरंपच भाजपचा असे झाले आहे. अशीच परिस्थिती आजरा तालुक्यातील मुमेवाडी येथे झाली. तेथे काँग्रेस, भाजप व शिवसेनेने एकत्र येत राष्ट्रवादीला बाजूला ठेवून पाच विरुद्ध चार अशी बाजी मारली.बुरंबाळी  ग्रामपंचायत-सरपंच निवडीलाच वादराधानगरीतील बुरंबाळी ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती, पण तेथे बिनसल्याने सरपंच निवडीलाच वाद होऊन सर्व पक्ष बाजूला राहून सरपंच व उपसरंपच हे दोन्ही पदे एकट्या काँग्रेसकडे राहिली.

  • कागल : ५३ गावांपैकी ३१ गावात मुश्रीफ, संजय घाटगे गट ९, समरजित घाटगे गट ७
  • राधानगरी : १९ पैकी ९ ए.वाय.पाटील, कॉंग्रेस ४, आबीटकर १, शेकाप १, जनता दल १, स्थानिक आघाडी ३
  • चंदगड : ४१ पैकी ४० राष्ट्रवादी,शिवसेना, कॉंग्रेस यांची स्थानिक आघाडी, भाजप १
  • आजरा: २६ पैकी २६ स्थानिक आघाडी
  • हातकणंगले : २० पैकी महाविकास आघाडी ८, सर्वपक्षीय ३, शिवसेना ३, जनसुराज्य ३, ताराराणी आघाडी ३, भाजप ०१
  • गगनबावडा : ८ पैकी सतेज पाटील गट ५, भाजप १, स्थानिक आघाडी १, पी.जी. शिंदे गट १
टॅग्स :sarpanchसरपंचgram panchayatग्राम पंचायतkolhapurकोल्हापूर