शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
3
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
4
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
5
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
6
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
7
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
8
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
9
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
10
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
11
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
12
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
13
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
14
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
15
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
16
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
17
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
18
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
19
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
20
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?

स्थानिक आघाड्यांचाच सरपंचपदावर झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 10:38 IST

sarpanch Grampanchyat Kolhpaur- पक्षापेक्षा गट तटावर निवडणूक लढवल्या गेलेल्या ग्रामपंचायत निकालात स्थानिक आघाड्यांचाच बोलबाला राहिला असताना आता सहा तालुक्यांतील सरपंच निवडणुकीतही स्थानिक आघाड्यांनीच पुन्हा एकदा आपणच गावचे किंग असल्याचे दाखवून दिले आहे. मंगळवारी निवड झालेल्या १६७ पैकी ७३ ठिकाणी स्थानिक आघाडीचा सरपंच गावचा कारभारी झाला आहे.

ठळक मुद्देस्थानिक आघाड्यांचाच सरपंचपदावर झेंडा १६७ पैकी ७३ ठिकाणी यश : राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर

कोल्हापूर : पक्षापेक्षा गट तटावर निवडणूक लढवल्या गेलेल्या ग्रामपंचायत निकालात स्थानिक आघाड्यांचाच बोलबाला राहिला असताना आता सहा तालुक्यांतील सरपंच निवडणुकीतही स्थानिक आघाड्यांनीच पुन्हा एकदा आपणच गावचे किंग असल्याचे दाखवून दिले आहे. मंगळवारी निवड झालेल्या १६७ पैकी ७३ ठिकाणी स्थानिक आघाडीचा सरपंच गावचा कारभारी झाला आहे.

४० सरपंचपदासह राष्ट्रवादी दुसऱ्या, शिवसेना १९ सरपंचपदासह तिसऱ्या क्रमांकावर राहिला. भाजप १०, काँग्रेस ९, महाविकास आघाडी ८, ताराराणी, जनसुराज्य प्रत्येकी ३, शेकाप, जनता दल प्रत्येकी १ असे पक्षीय बलाबल राहिले.जिल्ह्यात स्थगिती आलेले सहा तालुके वगळून मंगळवारी कागल, राधानगरी, चंदगड, आजरा, हातकणंगले, गगनबावडा या तालुक्यातील १७३ गावांच्या सरपंच निवडी होणार होत्या, पण सरपंचपदासाठी आरक्षित उमेदवार नसल्याने ६ गावे वगळून उर्वरीत १६७ गावांच्या निवडीची प्रक्रिया पार पडली.अपेक्षेप्रमाणे गगनबावड्यात पालकमंत्री सतेज पाटील एकहाती ८ पैकी ५ ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेतल्या. कागलमध्येही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही ५३ पैकी सर्वाधिक ३१ ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम ठेवले. हातकणंगलेत महाविकास आघाडीचे वर्चस्व राहिले तर आमदार प्रकाश आवाडे व आमदार विनय कोरे यांनी देखील प्रत्येकी तीन गावे आपल्याकडे ठेवण्यात यश मिळविले. आजऱ्यात पक्षापेक्षा २६ पैकी २६ ग्रामपंचायती गटांमध्येच विभागल्या गेल्या. राधानगरीतही ए. वाय. पाटील यांनी राष्ट्रवादीचा गड मजबूत केला. चंदगडमध्ये आमदार राजेश पाटील गटासह ४० जागा स्थानिक आघाडीकडेच राहिल्या.पक्षीय बलाबल

  • स्थानिक आघाडी : ७३
  • राष्ट्रवादी काँग्रेस : ४०
  • शिवसेना : १९
  • भाजप : १०
  • काँग्रेस : ०९
  • महाविकास आघाडी : ०८
  • ताराराणी : ०३
  • जनसुराज्य : ०३
  • शेकाप : ०१
  • जनता दल : ०१ 

स्थानिक आघाड्यामध्ये अनेक ठिकाणी काँग्रेसचा सरपंच झाला असला तरी स्वबळावर काँग्रेसला गगनबावडा व राधानगरीत चांगले यश मिळाले आहे.

सर्वाधिक गावे आपल्याच पक्षाकडे दावा सर्वांचाचग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर सर्वाधिक गावे आपल्याच पक्षाकडे दावा सर्वांनीच केला होता. भाजपनेही तसा दावा केला होता, पण प्रत्यक्षात सरपंच निवडी झाल्यानंतर भाजप जिल्ह्यात चौथ्या क्रमांकावर राहिला आहे. त्यांना कागलमध्ये सर्वाधिक ७, गगनबावडा, १, चंदगड १ आणि हातकणंगले १ अशा १० गावांवरच समाधान मानावे लागले आहे.राष्ट्रवादीला बाजूला ठेवून बाजी मारलीराधानगरी तालुक्यातील पनोरी या गावात सरपंच काँग्रेसचा आणि उपसरंपच भाजपचा असे झाले आहे. अशीच परिस्थिती आजरा तालुक्यातील मुमेवाडी येथे झाली. तेथे काँग्रेस, भाजप व शिवसेनेने एकत्र येत राष्ट्रवादीला बाजूला ठेवून पाच विरुद्ध चार अशी बाजी मारली.बुरंबाळी  ग्रामपंचायत-सरपंच निवडीलाच वादराधानगरीतील बुरंबाळी ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती, पण तेथे बिनसल्याने सरपंच निवडीलाच वाद होऊन सर्व पक्ष बाजूला राहून सरपंच व उपसरंपच हे दोन्ही पदे एकट्या काँग्रेसकडे राहिली.

  • कागल : ५३ गावांपैकी ३१ गावात मुश्रीफ, संजय घाटगे गट ९, समरजित घाटगे गट ७
  • राधानगरी : १९ पैकी ९ ए.वाय.पाटील, कॉंग्रेस ४, आबीटकर १, शेकाप १, जनता दल १, स्थानिक आघाडी ३
  • चंदगड : ४१ पैकी ४० राष्ट्रवादी,शिवसेना, कॉंग्रेस यांची स्थानिक आघाडी, भाजप १
  • आजरा: २६ पैकी २६ स्थानिक आघाडी
  • हातकणंगले : २० पैकी महाविकास आघाडी ८, सर्वपक्षीय ३, शिवसेना ३, जनसुराज्य ३, ताराराणी आघाडी ३, भाजप ०१
  • गगनबावडा : ८ पैकी सतेज पाटील गट ५, भाजप १, स्थानिक आघाडी १, पी.जी. शिंदे गट १
टॅग्स :sarpanchसरपंचgram panchayatग्राम पंचायतkolhapurकोल्हापूर