शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

ग्रामीण महाराष्ट्रात पाच लाख अतिक्रमणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 23:27 IST

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांमधील ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये पावणेपाच लाख अतिक्रमणे झाल्याचे स्पष्ट झाले ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांमधील ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये पावणेपाच लाख अतिक्रमणे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनार्थ झालेली अतिक्रमणे नियमित करण्याचा पहिला टप्पा म्हणून राज्यभरातून माहिती संकलित करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ४७ हजार ४७९ अतिक्रमणे असून, सर्वांत कमी अतिक्रमणे रत्नागिरी जिल्ह्यात ८०१ आहेत.दोन महिन्यांपूर्वी शासनाने याबाबत निर्णय घेऊन अशी अतिक्रमणे नियमित करण्यासाठीचा शासन आदेश काढला होता. त्यानंतर गेले दोन महिने स्थळपाहणी करून याबाबतची आकडेवारी भरण्याचे आदेश देण्यात आलेहोते.अतिक्रमण किती जागेवर केले आहे, तेथे वास्तव्यास कोण आहे, आधार क्रमांक, गायरान, गावठाण, गावठाणाबाहेर, सार्वजनिक वापरातील जागा, प्रशासकीय जमीन आहे का, अतिक्रमण केल्याचे वर्ष, एकूण अतिक्रमणापैकी निवासी वापरासाठी नेमका किती वापर आहे, व्यावसायिक कारणासाठी किती वापर केला आहे, अतिक्रमित कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये घर आहे किंवा नाही, अशी सर्व माहिती स्थळ पाहणीच्या वेळी भरून घेण्यात आली आहे.सोलापूर पाठोपाठ सर्वाधिक अतिक्रमणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यात असून, तिसऱ्या क्रमांकावर पुणे जिल्हा आहे. बुलढाणा, नाशिक आणि कोल्हापूर अनुक्रमे चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकांवर आहेत.केवळ निवासासाठीचे अतिक्रमण नियमित !अनेकांनी सार्वजनिक जागांमध्ये शेती करण्यापासून ते उद्योग उभारणीपर्यंतचे अतिक्रमण केले आहे. मात्र, या योजनाच केवळ निवासासाठीचे अतिक्रमण नियमित करण्याबाबत असल्याने अन्य अतिक्रमणे काढून टाकणार आहेत.अतिक्रमणांची जिल्हावार संख्यासोलापूर- ४७४७९ ,नागपूर- ४२७६८,पुणे- ३५०१०, बुलढाणा- ३४१३५, नाशिक-२५४३४, कोल्हापूर-२४३६०, भंडारा-१९८५३, वाशिम-१९०८०, लातूर- १८३५९, धुळे-१८००८, जालना-१७२१९, बीड-१६१४४, औरंगाबाद-१५६०५, जळगाव-१५१६५, सातारा-१३५५५, यवतमाळ-१२७३३, हिंगोली-१२५६७, चंद्रपूर-१२४१७, अहमदनगर-१०१६१, सांगली-९३६७,वर्धा-९१४४, उस्मानाबाद-७५३८, परभणी-५५५६, नांदेड-५५२५, नंदूरबार-४८९७, अकोला-३६६८, अमरावती-३५०२, ठाणे- ३२८७, पालघर-३२१५, रायगड २२६८, गोंदिया-२०९३, गडचिरोली-१५०४, सिंधुदुर्ग-८३०, रत्नागिरी-८०१