शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

ग्रामीण महाराष्ट्रात पाच लाख अतिक्रमणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 23:27 IST

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांमधील ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये पावणेपाच लाख अतिक्रमणे झाल्याचे स्पष्ट झाले ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांमधील ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये पावणेपाच लाख अतिक्रमणे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनार्थ झालेली अतिक्रमणे नियमित करण्याचा पहिला टप्पा म्हणून राज्यभरातून माहिती संकलित करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ४७ हजार ४७९ अतिक्रमणे असून, सर्वांत कमी अतिक्रमणे रत्नागिरी जिल्ह्यात ८०१ आहेत.दोन महिन्यांपूर्वी शासनाने याबाबत निर्णय घेऊन अशी अतिक्रमणे नियमित करण्यासाठीचा शासन आदेश काढला होता. त्यानंतर गेले दोन महिने स्थळपाहणी करून याबाबतची आकडेवारी भरण्याचे आदेश देण्यात आलेहोते.अतिक्रमण किती जागेवर केले आहे, तेथे वास्तव्यास कोण आहे, आधार क्रमांक, गायरान, गावठाण, गावठाणाबाहेर, सार्वजनिक वापरातील जागा, प्रशासकीय जमीन आहे का, अतिक्रमण केल्याचे वर्ष, एकूण अतिक्रमणापैकी निवासी वापरासाठी नेमका किती वापर आहे, व्यावसायिक कारणासाठी किती वापर केला आहे, अतिक्रमित कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये घर आहे किंवा नाही, अशी सर्व माहिती स्थळ पाहणीच्या वेळी भरून घेण्यात आली आहे.सोलापूर पाठोपाठ सर्वाधिक अतिक्रमणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यात असून, तिसऱ्या क्रमांकावर पुणे जिल्हा आहे. बुलढाणा, नाशिक आणि कोल्हापूर अनुक्रमे चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकांवर आहेत.केवळ निवासासाठीचे अतिक्रमण नियमित !अनेकांनी सार्वजनिक जागांमध्ये शेती करण्यापासून ते उद्योग उभारणीपर्यंतचे अतिक्रमण केले आहे. मात्र, या योजनाच केवळ निवासासाठीचे अतिक्रमण नियमित करण्याबाबत असल्याने अन्य अतिक्रमणे काढून टाकणार आहेत.अतिक्रमणांची जिल्हावार संख्यासोलापूर- ४७४७९ ,नागपूर- ४२७६८,पुणे- ३५०१०, बुलढाणा- ३४१३५, नाशिक-२५४३४, कोल्हापूर-२४३६०, भंडारा-१९८५३, वाशिम-१९०८०, लातूर- १८३५९, धुळे-१८००८, जालना-१७२१९, बीड-१६१४४, औरंगाबाद-१५६०५, जळगाव-१५१६५, सातारा-१३५५५, यवतमाळ-१२७३३, हिंगोली-१२५६७, चंद्रपूर-१२४१७, अहमदनगर-१०१६१, सांगली-९३६७,वर्धा-९१४४, उस्मानाबाद-७५३८, परभणी-५५५६, नांदेड-५५२५, नंदूरबार-४८९७, अकोला-३६६८, अमरावती-३५०२, ठाणे- ३२८७, पालघर-३२१५, रायगड २२६८, गोंदिया-२०९३, गडचिरोली-१५०४, सिंधुदुर्ग-८३०, रत्नागिरी-८०१