शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

ग्रामीण महाराष्ट्रात पाच लाख अतिक्रमणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 23:27 IST

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांमधील ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये पावणेपाच लाख अतिक्रमणे झाल्याचे स्पष्ट झाले ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांमधील ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये पावणेपाच लाख अतिक्रमणे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनार्थ झालेली अतिक्रमणे नियमित करण्याचा पहिला टप्पा म्हणून राज्यभरातून माहिती संकलित करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ४७ हजार ४७९ अतिक्रमणे असून, सर्वांत कमी अतिक्रमणे रत्नागिरी जिल्ह्यात ८०१ आहेत.दोन महिन्यांपूर्वी शासनाने याबाबत निर्णय घेऊन अशी अतिक्रमणे नियमित करण्यासाठीचा शासन आदेश काढला होता. त्यानंतर गेले दोन महिने स्थळपाहणी करून याबाबतची आकडेवारी भरण्याचे आदेश देण्यात आलेहोते.अतिक्रमण किती जागेवर केले आहे, तेथे वास्तव्यास कोण आहे, आधार क्रमांक, गायरान, गावठाण, गावठाणाबाहेर, सार्वजनिक वापरातील जागा, प्रशासकीय जमीन आहे का, अतिक्रमण केल्याचे वर्ष, एकूण अतिक्रमणापैकी निवासी वापरासाठी नेमका किती वापर आहे, व्यावसायिक कारणासाठी किती वापर केला आहे, अतिक्रमित कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये घर आहे किंवा नाही, अशी सर्व माहिती स्थळ पाहणीच्या वेळी भरून घेण्यात आली आहे.सोलापूर पाठोपाठ सर्वाधिक अतिक्रमणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यात असून, तिसऱ्या क्रमांकावर पुणे जिल्हा आहे. बुलढाणा, नाशिक आणि कोल्हापूर अनुक्रमे चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकांवर आहेत.केवळ निवासासाठीचे अतिक्रमण नियमित !अनेकांनी सार्वजनिक जागांमध्ये शेती करण्यापासून ते उद्योग उभारणीपर्यंतचे अतिक्रमण केले आहे. मात्र, या योजनाच केवळ निवासासाठीचे अतिक्रमण नियमित करण्याबाबत असल्याने अन्य अतिक्रमणे काढून टाकणार आहेत.अतिक्रमणांची जिल्हावार संख्यासोलापूर- ४७४७९ ,नागपूर- ४२७६८,पुणे- ३५०१०, बुलढाणा- ३४१३५, नाशिक-२५४३४, कोल्हापूर-२४३६०, भंडारा-१९८५३, वाशिम-१९०८०, लातूर- १८३५९, धुळे-१८००८, जालना-१७२१९, बीड-१६१४४, औरंगाबाद-१५६०५, जळगाव-१५१६५, सातारा-१३५५५, यवतमाळ-१२७३३, हिंगोली-१२५६७, चंद्रपूर-१२४१७, अहमदनगर-१०१६१, सांगली-९३६७,वर्धा-९१४४, उस्मानाबाद-७५३८, परभणी-५५५६, नांदेड-५५२५, नंदूरबार-४८९७, अकोला-३६६८, अमरावती-३५०२, ठाणे- ३२८७, पालघर-३२१५, रायगड २२६८, गोंदिया-२०९३, गडचिरोली-१५०४, सिंधुदुर्ग-८३०, रत्नागिरी-८०१