शहरं
Join us  
Trending Stories
1
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
3
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
4
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
5
एकीकडे 'घरवाली' दुसरीकडे 'बाहेरवाली'; दोघींसोबत आनंदाने जगत होता तरुण अन् एक दिवस असं काही झालं... 
6
पितृपक्ष इंदिरा एकादशी २०२५: १० राशींवर श्रीहरी प्रसन्न, शिव-गौरी-लक्ष्मी कृपा; शुभ-लाभ-पैसा!
7
बीचवर फिरायला गेलेल्या तरुणीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार; पोलिसांनी आरोपी कसे शोधले?
8
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
9
आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली...
10
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
11
'ओझेम्पिक टीथ' म्हणजे काय? वजन कमी करण्याच्या औषधाचा होतोय 'असा' दुष्परिणाम
12
Nupur Bora: नुपूर बोरा आहे तरी कोण? सहा वर्षात अनेक गैरव्यवहार, घरातही सापडलं मोठं घबाड!
13
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
14
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
15
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
16
बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला
17
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
18
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
19
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
20
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप

आधी पावसाची; आता मजुरांची समस्या

By admin | Updated: July 24, 2014 22:10 IST

शेतकरी दुहेरी संकटात : दुबार पेरणी टळली; पण मजुरांचा ‘भाव’ वाढला !

शंकर पोळ - कोपर्डे हवेली,  काही दिवसांपूर्वी शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. पावसाने ओढ दिल्यामुळे त्यांच्यासमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले होते; पण उशिराने का होईना दमदार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला. पावसामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण असताना सध्या मजुरांची समस्या शेतकऱ्यांपुढे उभी ठाकली आहे. मजुरांची टंचाई व त्यांच्या मजुरीचे वाढलेले दर यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.जून महिन्याच्या सुरुवातीस वळवाने झोडपून काढले. त्यावेळी शेतकऱ्यांची मशागतीची कामे खोळंबली; पण वळवाचा जोरदार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पेरणीसाठी पोषक वातावरण तयार झाले. शेतकऱ्यांनी घाईगडबडीत मशागतीची कामे उरकून पेरणीची लगबग सुरू केली. वळीव पावसाच्या जोरावर अनेक शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी, टोकणीही केली. मात्र, जून महिन्याच्या सुरुवातीला झोडपून काढणाऱ्या वळवानंतर महिनाभर एकही मोठा पाऊस झाला नाही. मान्सूनने पाठ फिरवली. त्यामुळे वीजपंपाद्वारे पाणी देऊन पिके जगविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. कालांतराने विहिरीसह कूपनलिकांतील पाणीही आटले. नदीची पाणीपातळी कमी झाली. उपसा जलसिंचन योजना बंद पडल्या. त्यामुळे शेतकरी धायकुतीला आले. उगवलेली पिके कडक उन्हामुळे कोमेजली. काही शेतकऱ्यांनी याही परिस्थितीवर मात करीत बॅरेलने पाणी आणून पिके जगवली. निसर्ग कोपल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले. शेतकरी हताश झाले असतानाच गत आठवड्यापासून जोरदार पावसाने हजेरी लावली. कोमेजलेल्या पिकांनी पुन्हा तग धरला. शिवार हिरवेगार झाले. पावसाबरोबरच शेतात तण उगवले. उसाची पाचट काढणे शेतकऱ्यांसाठी गरजेचे बनले. त्यासाठी शेतकऱ्यांनी मजुरांकडे धाव घेतली; पण मजुरांचा ‘भाव’ वधारला. पूर्वीच्या मजुरीत काम करण्यास मजुरांनी शेतकऱ्यांना नकार दिला. तसेच काही मजूर पाचट काढण्यासारखी कामे करण्यासही नकार देत आहेत. काही मजुरांना पाचट काढण्यासारख्या कामांसाठी जादा मजुरी घेणार असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले आहे. मजूर मागतात तो दर दिल्यास उत्पन्न व खर्च याचा मेळ बसत नाही आणि मजुरी न दिल्यास शेतातील कामे खोळंबणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर ‘इकडे आड अन् तिकडे विहीर’ अशी परिस्थिती झाली आहे. काही गावांमध्ये मजुरांचीच संख्या अत्यल्प असल्यामुळे शेतकऱ्यांना ते मागतील तो दर देऊन कामे करून घ्यावी लागत आहेत. (प्रतिनिधी)अल्पभूधारकांना जादा फटकाशेतीक्षेत्र जास्त असणारे शेतकरी एकाच वेळी जास्त दिवसांचे काम देत असल्याने मजूर त्यांच्याकडून तडजोडीतून रक्कम स्वीकारतात. अल्पभूधारक शेतकऱ्यांकडून मजूर दिवसाच्या रोजंदारीची ठरलेली रक्कम घेतात. तसेच अशा शेतकऱ्यांकडून जास्त दिवसांचे काम मिळत नसल्याने मजूर त्यांच्या शेतामध्ये काम करण्यास फारसे उत्सुक नसतात, अशी परिस्थिती आहे. -शेतीमालकच स्वकष्टापेक्षा मजुरांवर अवलंबून असणे-मजुरांची दिवसाऐवजी खंडून कामे घेण्याची पद्धत-शेतीतील कष्टाची कामे करण्यापेक्षा इतर कामांना मजुरांची पसंती-दिवसभराच्या कामातून अपेक्षित मोबदला मिळत नसल्याची ओरड-शहरातील एखाद्या दुकानात काम केल्यास महिन्याला शेत मजुरीपेक्षा जास्त पैसे मिळत असल्याचा अनुभव