शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

आधी पावसाची; आता मजुरांची समस्या

By admin | Updated: July 24, 2014 22:10 IST

शेतकरी दुहेरी संकटात : दुबार पेरणी टळली; पण मजुरांचा ‘भाव’ वाढला !

शंकर पोळ - कोपर्डे हवेली,  काही दिवसांपूर्वी शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. पावसाने ओढ दिल्यामुळे त्यांच्यासमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले होते; पण उशिराने का होईना दमदार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला. पावसामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण असताना सध्या मजुरांची समस्या शेतकऱ्यांपुढे उभी ठाकली आहे. मजुरांची टंचाई व त्यांच्या मजुरीचे वाढलेले दर यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.जून महिन्याच्या सुरुवातीस वळवाने झोडपून काढले. त्यावेळी शेतकऱ्यांची मशागतीची कामे खोळंबली; पण वळवाचा जोरदार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पेरणीसाठी पोषक वातावरण तयार झाले. शेतकऱ्यांनी घाईगडबडीत मशागतीची कामे उरकून पेरणीची लगबग सुरू केली. वळीव पावसाच्या जोरावर अनेक शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी, टोकणीही केली. मात्र, जून महिन्याच्या सुरुवातीला झोडपून काढणाऱ्या वळवानंतर महिनाभर एकही मोठा पाऊस झाला नाही. मान्सूनने पाठ फिरवली. त्यामुळे वीजपंपाद्वारे पाणी देऊन पिके जगविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. कालांतराने विहिरीसह कूपनलिकांतील पाणीही आटले. नदीची पाणीपातळी कमी झाली. उपसा जलसिंचन योजना बंद पडल्या. त्यामुळे शेतकरी धायकुतीला आले. उगवलेली पिके कडक उन्हामुळे कोमेजली. काही शेतकऱ्यांनी याही परिस्थितीवर मात करीत बॅरेलने पाणी आणून पिके जगवली. निसर्ग कोपल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले. शेतकरी हताश झाले असतानाच गत आठवड्यापासून जोरदार पावसाने हजेरी लावली. कोमेजलेल्या पिकांनी पुन्हा तग धरला. शिवार हिरवेगार झाले. पावसाबरोबरच शेतात तण उगवले. उसाची पाचट काढणे शेतकऱ्यांसाठी गरजेचे बनले. त्यासाठी शेतकऱ्यांनी मजुरांकडे धाव घेतली; पण मजुरांचा ‘भाव’ वधारला. पूर्वीच्या मजुरीत काम करण्यास मजुरांनी शेतकऱ्यांना नकार दिला. तसेच काही मजूर पाचट काढण्यासारखी कामे करण्यासही नकार देत आहेत. काही मजुरांना पाचट काढण्यासारख्या कामांसाठी जादा मजुरी घेणार असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले आहे. मजूर मागतात तो दर दिल्यास उत्पन्न व खर्च याचा मेळ बसत नाही आणि मजुरी न दिल्यास शेतातील कामे खोळंबणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर ‘इकडे आड अन् तिकडे विहीर’ अशी परिस्थिती झाली आहे. काही गावांमध्ये मजुरांचीच संख्या अत्यल्प असल्यामुळे शेतकऱ्यांना ते मागतील तो दर देऊन कामे करून घ्यावी लागत आहेत. (प्रतिनिधी)अल्पभूधारकांना जादा फटकाशेतीक्षेत्र जास्त असणारे शेतकरी एकाच वेळी जास्त दिवसांचे काम देत असल्याने मजूर त्यांच्याकडून तडजोडीतून रक्कम स्वीकारतात. अल्पभूधारक शेतकऱ्यांकडून मजूर दिवसाच्या रोजंदारीची ठरलेली रक्कम घेतात. तसेच अशा शेतकऱ्यांकडून जास्त दिवसांचे काम मिळत नसल्याने मजूर त्यांच्या शेतामध्ये काम करण्यास फारसे उत्सुक नसतात, अशी परिस्थिती आहे. -शेतीमालकच स्वकष्टापेक्षा मजुरांवर अवलंबून असणे-मजुरांची दिवसाऐवजी खंडून कामे घेण्याची पद्धत-शेतीतील कष्टाची कामे करण्यापेक्षा इतर कामांना मजुरांची पसंती-दिवसभराच्या कामातून अपेक्षित मोबदला मिळत नसल्याची ओरड-शहरातील एखाद्या दुकानात काम केल्यास महिन्याला शेत मजुरीपेक्षा जास्त पैसे मिळत असल्याचा अनुभव