शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

कर्जमुक्तीचा पहिल्या टप्प्यातील आकडा सोमवारी होणार स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 16:56 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीची अंमलबजावणी सुरू झाली असून जिल्ह्यात किती शेतकºयांना त्याचा लाभ मिळणार हा आकडा सोमवारी स्पष्ट होणार आहे. त्याचबरोबर सोमवार (दि.२३) ते बुधवार (२५)पर्यंत उर्वरित ६५० गावांत चावडी वाचनाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात आतापर्यंत २,७०,५९० अर्ज प्राप्त कर्जमाफीची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू बुधवारपर्यंत उर्वरित ६५० गावांत चावडी वाचनाचे काम पूर्ण करण्यात येणार

कोल्हापूर , दि. १९ :  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीची अंमलबजावणी सुरू झाली असून जिल्ह्यात किती शेतकऱ्याना त्याचा लाभ मिळणार हा आकडा सोमवारी स्पष्ट होणार आहे. त्याचबरोबर सोमवार (दि.२३) ते बुधवार (२५)पर्यंत उर्वरित ६५० गावांत चावडी वाचनाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

बुधवारी दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्जमाफी झालेल्या काही शेतकऱ्याना कर्जमाफीची प्रमाणपत्रे देऊन कर्जमुक्तीच्या अंमलबजावणीला सुरुवात केली. कोल्हापुरातही कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते निवडक शेतकऱ्याना ही प्रमाणपत्रे देण्यात आली.

या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील ८ लाख ४० हजार शेतकºयांना चार हजार कोटी रुपयांची कर्जमाफीसाठी तरतूद करून त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात केली.

कोल्हापूर जिल्ह्यात किती लोकांना पहिल्या टप्प्यातील कर्जमाफीचा लाभ होणार हे सोमवारी (दि. २३) स्पष्ट होणार आहे. या संदर्भातील मार्गदर्शक सूचना अद्याप शासनाकडून आलेल्या नाहीत. त्या सोमवारपर्यंत येणार असून त्यानंतरच जिल्ह्यातील आकडा कळणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

या योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत २,७०,५९० अर्ज प्राप्त झाले आहेत. जिल्हा मध्यवर्र्ती बँकांमधील ५३,२६२ थकबाकीदार असून २२३ कोटी १७ लाख रुपये थकबाकीची रक्कम आहे तर राष्ट्रीयीकृत, खासगी, ग्रामीण बँकांमधील ५४,७२९ थकबाकीदार असून थकबाकीची रक्कम ६५ कोटी १३ लाख आहे.

जिल्ह्यातील एकूण पात्र १८४८ सेवा संस्थांमधील २,५२,९७० सभासदांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. शासननिर्णयानुसार २००९ पूर्वीचे व ३१ मार्च २०१६ नंतरचे थकबाकीदार या कर्जमाफीत येणार नाहीत. यामध्ये २०१५-१६ व २०१६-१७ मधील नियमित परतफेड करणाऱ्याना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर आतापर्यंत ३९१ ग्रामपंचायतींचे चावडी वाचन पूर्ण झाले असून उर्वरीत ६५० ग्रामपंचायतींचे चावडी वाचन सोमवार (दि.२३) ते बुधवार (दि.२५)पर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर