शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

यंदा ३४०० रु.चा पहिला हप्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : केंद्र सरकारने यंदा एफआरपी वाढविली आहे. त्यामुळे साखरेचा सरासरी उतारा पाहता कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकºयांना यंदा किमान ३४०० रुपयांचा पहिला हप्ता निश्चितपणे मिळणार आहे. त्यामुळे ऊसदरासाठी आंदोलन करण्याची गरजच उरली नाही, असे प्रतिपादन राज्याचे कृषी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.येथील नारायणराव घोरपडे नाट्यगृह चौकात आयोजित रयत ...

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : केंद्र सरकारने यंदा एफआरपी वाढविली आहे. त्यामुळे साखरेचा सरासरी उतारा पाहता कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकºयांना यंदा किमान ३४०० रुपयांचा पहिला हप्ता निश्चितपणे मिळणार आहे. त्यामुळे ऊसदरासाठी आंदोलन करण्याची गरजच उरली नाही, असे प्रतिपादन राज्याचे कृषी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.येथील नारायणराव घोरपडे नाट्यगृह चौकात आयोजित रयत क्रांती संघटनेच्या पहिल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सिनेअभिनेता राहुल सोलापूरकर यांची खास उपस्थिती होती.खोत म्हणाले, रयत क्रांती संघटना कोणाची संघटना मोडण्यासाठी नसून, ती शेतकºयांचा संसार उभारण्यासाठी आहे. तसेच माझ्या जाण्याने स्वाभिमानीचा टवकाही उडला नाही म्हणणाºयांना खिंडार पडल्याचा टोलाही यावेळी खोत यांनी लगावला. वेगवेगळे आरोप करून माझ्यामुळेच शेतकºयांचा प्रश्न निर्माण झाल्याची टीका होत आहे. पण ३२ वर्षे घरावर तुळशीपत्र ठेवून फक्त शेतकºयांसाठी लढलो असून, त्यासाठी कोणी निष्ठेचे सर्टिफिकेट देण्याची गरज नाही. जनतेने राजीनामा मागितल्यास हजारवेळा राजीनामा देईन, पण मी गड सोडून पळणारा नव्हे, तर लढणारा कार्यकर्ता आहे. माझा राजीनामा मागण्याचा हक्क केवळ शेतकºयाला असून, कोणीतरी सांगतो म्हणून मी राजीनामा देणार नाही.देशात सरासरी २३५ ते २४५ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होणार आहे. मात्र, गरज २५० ते २६० लाख मेट्रिक टन इतकी आहे. गरजेपेक्षा कमी उत्पादन होणार असल्याने साखरेचे दर स्थिर राहणार आहेत. शिवाय एफआरपीनुसार ९.५ टक्के साखर उताºयासाठी २५५०, १२ टक्क्याला ३२२० आणि १३ टक्क्याला ३४८६ असा कायद्यानुसार दर कारखानदारांना द्यावाच लागणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात सरासरी १२.५० टक्के साखर उताºयामुळे ३४०० रु.चा पहिला हप्ता निश्चित मिळणार आहे. तरीही एफआरपी आणि अधिक ३०० रुपये असा दर कारखानदारांनी द्यावा, असे आवाहनही केले. तसेच साखरेचा भाव वाढला तर रंगराजन शिफारशीनुसार ७०:३० हा फॉर्म्युला वापरायचा असेही त्यांनी स्पष्ट केले. मी सत्तेत असलो तरी शेतकºयांचे प्रश्न सरकार ऐकत नसेल, तर आंदोलनासाठी बलिदानाची तयारी ठेवा, असे आवाहन खोत यांनी केले.स्वागत मोहन माने यांनी तर प्रास्ताविक इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी केले. याप्रसंगी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सुरेश पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, अशोक स्वामी, सागर खोत, सतीश वुरुलकर, संघटनेचे युवाध्यक्ष शार्दुल जाधव आदींची भाषणे झाली. मेळाव्यास महाराष्ट्र, कोकण, खानदेश, कर्नाटक, आदी भागातून शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.शेतकºयांची दिवाळी गोड होणारसरसकट कर्जमाफीचा ५० लाख शेतकºयांना लाभ मिळणार असून, त्यांची दिवाळी गोड होणार आहे. तसेच २०१८ पर्यंत नियमित कर्जाची परतफेड करणाºयांनाही कर्जमाफी मिळणार आहे.पवार शेट्टी एक गट्टीबारामतीत जाऊन ज्या पवारांना नावे ठेऊन तुम्ही खासदार झालात, आता त्यांचे गुणगान तुम्ही गात गळ्यात गळे घालून फिरत आहात, असा आरोप खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता केला.प्रत्येक जिल्ह्यात वेगळीच गट्टीआम्हाला एकनिष्ठ नाही म्हणणाºयांनी प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या पक्षाबरोबर युती केली आहे. सत्तेसाठी सगळे चालतात मग सदाभाऊ का नाही चालला, असा सवालही खोत यांनी केला.वजनकाट्यांची तपासणी करणारराज्यातील अनेक साखर कारखाने काटा मारत असल्याच्या तक्रारी नियमित होत असतात. त्यामुळे यंदा मंत्री गिरीष महाजन यांना सांगून राज्यातील सर्व कारखान्यांच्या काट्यांवर छापे मारून अचानकपणे त्यांची तपासणी करणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.मोबाईल अ‍ॅपचे लोकार्पणसंघटनेच्यावतीने शेतकºयांसाठी एक मोबाईल अ‍ॅप तयार केले असून, त्याला अँड्राईड मोबाईलवर सक्रिय केल्यास शेतकºयांना हवामानाचा अंदाज व बाजारभाव यासह आवश्यक माहिती, तसेच राज्य कृषिमंत्री यांच्यासह प्रमुख पदाधिकाºयांचे दूरध्वनी क्रमांक मिळणार आहेत. या अ‍ॅपचे लोकार्पणही या कार्यक्रमात मंत्री खोत यांच्या हस्ते केले.