शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
3
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
4
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
5
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
6
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
7
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  
8
GST 2.0 Price List : स्कूटर ते होंडा ३५०... हॅचबॅकपासून लक्झरी SUV पर्यंत, GST कपातीमुळे कार-बाईक स्वस्त; पाहा संपूर्ण यादी
9
तुम्हाला फावल्या वेळेत नखं खाण्याची सवय असेल तर आताच सोडा; डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
10
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
11
Tata ची मोठी घोषणा; चार वर्षांपूर्वीच्या किमतीवर मिळणार कार, जाणून घ्या नवीन दर...
12
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
13
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
14
'स्मार्टफोनपासून दूर राहा आणि पुस्तके वाचा' मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुलांना सल्ला
15
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
16
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
17
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
18
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
19
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
20
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले

यंदा ३४०० रु.चा पहिला हप्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : केंद्र सरकारने यंदा एफआरपी वाढविली आहे. त्यामुळे साखरेचा सरासरी उतारा पाहता कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकºयांना यंदा किमान ३४०० रुपयांचा पहिला हप्ता निश्चितपणे मिळणार आहे. त्यामुळे ऊसदरासाठी आंदोलन करण्याची गरजच उरली नाही, असे प्रतिपादन राज्याचे कृषी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.येथील नारायणराव घोरपडे नाट्यगृह चौकात आयोजित रयत ...

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : केंद्र सरकारने यंदा एफआरपी वाढविली आहे. त्यामुळे साखरेचा सरासरी उतारा पाहता कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकºयांना यंदा किमान ३४०० रुपयांचा पहिला हप्ता निश्चितपणे मिळणार आहे. त्यामुळे ऊसदरासाठी आंदोलन करण्याची गरजच उरली नाही, असे प्रतिपादन राज्याचे कृषी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.येथील नारायणराव घोरपडे नाट्यगृह चौकात आयोजित रयत क्रांती संघटनेच्या पहिल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सिनेअभिनेता राहुल सोलापूरकर यांची खास उपस्थिती होती.खोत म्हणाले, रयत क्रांती संघटना कोणाची संघटना मोडण्यासाठी नसून, ती शेतकºयांचा संसार उभारण्यासाठी आहे. तसेच माझ्या जाण्याने स्वाभिमानीचा टवकाही उडला नाही म्हणणाºयांना खिंडार पडल्याचा टोलाही यावेळी खोत यांनी लगावला. वेगवेगळे आरोप करून माझ्यामुळेच शेतकºयांचा प्रश्न निर्माण झाल्याची टीका होत आहे. पण ३२ वर्षे घरावर तुळशीपत्र ठेवून फक्त शेतकºयांसाठी लढलो असून, त्यासाठी कोणी निष्ठेचे सर्टिफिकेट देण्याची गरज नाही. जनतेने राजीनामा मागितल्यास हजारवेळा राजीनामा देईन, पण मी गड सोडून पळणारा नव्हे, तर लढणारा कार्यकर्ता आहे. माझा राजीनामा मागण्याचा हक्क केवळ शेतकºयाला असून, कोणीतरी सांगतो म्हणून मी राजीनामा देणार नाही.देशात सरासरी २३५ ते २४५ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होणार आहे. मात्र, गरज २५० ते २६० लाख मेट्रिक टन इतकी आहे. गरजेपेक्षा कमी उत्पादन होणार असल्याने साखरेचे दर स्थिर राहणार आहेत. शिवाय एफआरपीनुसार ९.५ टक्के साखर उताºयासाठी २५५०, १२ टक्क्याला ३२२० आणि १३ टक्क्याला ३४८६ असा कायद्यानुसार दर कारखानदारांना द्यावाच लागणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात सरासरी १२.५० टक्के साखर उताºयामुळे ३४०० रु.चा पहिला हप्ता निश्चित मिळणार आहे. तरीही एफआरपी आणि अधिक ३०० रुपये असा दर कारखानदारांनी द्यावा, असे आवाहनही केले. तसेच साखरेचा भाव वाढला तर रंगराजन शिफारशीनुसार ७०:३० हा फॉर्म्युला वापरायचा असेही त्यांनी स्पष्ट केले. मी सत्तेत असलो तरी शेतकºयांचे प्रश्न सरकार ऐकत नसेल, तर आंदोलनासाठी बलिदानाची तयारी ठेवा, असे आवाहन खोत यांनी केले.स्वागत मोहन माने यांनी तर प्रास्ताविक इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी केले. याप्रसंगी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सुरेश पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, अशोक स्वामी, सागर खोत, सतीश वुरुलकर, संघटनेचे युवाध्यक्ष शार्दुल जाधव आदींची भाषणे झाली. मेळाव्यास महाराष्ट्र, कोकण, खानदेश, कर्नाटक, आदी भागातून शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.शेतकºयांची दिवाळी गोड होणारसरसकट कर्जमाफीचा ५० लाख शेतकºयांना लाभ मिळणार असून, त्यांची दिवाळी गोड होणार आहे. तसेच २०१८ पर्यंत नियमित कर्जाची परतफेड करणाºयांनाही कर्जमाफी मिळणार आहे.पवार शेट्टी एक गट्टीबारामतीत जाऊन ज्या पवारांना नावे ठेऊन तुम्ही खासदार झालात, आता त्यांचे गुणगान तुम्ही गात गळ्यात गळे घालून फिरत आहात, असा आरोप खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता केला.प्रत्येक जिल्ह्यात वेगळीच गट्टीआम्हाला एकनिष्ठ नाही म्हणणाºयांनी प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या पक्षाबरोबर युती केली आहे. सत्तेसाठी सगळे चालतात मग सदाभाऊ का नाही चालला, असा सवालही खोत यांनी केला.वजनकाट्यांची तपासणी करणारराज्यातील अनेक साखर कारखाने काटा मारत असल्याच्या तक्रारी नियमित होत असतात. त्यामुळे यंदा मंत्री गिरीष महाजन यांना सांगून राज्यातील सर्व कारखान्यांच्या काट्यांवर छापे मारून अचानकपणे त्यांची तपासणी करणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.मोबाईल अ‍ॅपचे लोकार्पणसंघटनेच्यावतीने शेतकºयांसाठी एक मोबाईल अ‍ॅप तयार केले असून, त्याला अँड्राईड मोबाईलवर सक्रिय केल्यास शेतकºयांना हवामानाचा अंदाज व बाजारभाव यासह आवश्यक माहिती, तसेच राज्य कृषिमंत्री यांच्यासह प्रमुख पदाधिकाºयांचे दूरध्वनी क्रमांक मिळणार आहेत. या अ‍ॅपचे लोकार्पणही या कार्यक्रमात मंत्री खोत यांच्या हस्ते केले.