शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

यंदा ३४०० रु.चा पहिला हप्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : केंद्र सरकारने यंदा एफआरपी वाढविली आहे. त्यामुळे साखरेचा सरासरी उतारा पाहता कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकºयांना यंदा किमान ३४०० रुपयांचा पहिला हप्ता निश्चितपणे मिळणार आहे. त्यामुळे ऊसदरासाठी आंदोलन करण्याची गरजच उरली नाही, असे प्रतिपादन राज्याचे कृषी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.येथील नारायणराव घोरपडे नाट्यगृह चौकात आयोजित रयत ...

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : केंद्र सरकारने यंदा एफआरपी वाढविली आहे. त्यामुळे साखरेचा सरासरी उतारा पाहता कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकºयांना यंदा किमान ३४०० रुपयांचा पहिला हप्ता निश्चितपणे मिळणार आहे. त्यामुळे ऊसदरासाठी आंदोलन करण्याची गरजच उरली नाही, असे प्रतिपादन राज्याचे कृषी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.येथील नारायणराव घोरपडे नाट्यगृह चौकात आयोजित रयत क्रांती संघटनेच्या पहिल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सिनेअभिनेता राहुल सोलापूरकर यांची खास उपस्थिती होती.खोत म्हणाले, रयत क्रांती संघटना कोणाची संघटना मोडण्यासाठी नसून, ती शेतकºयांचा संसार उभारण्यासाठी आहे. तसेच माझ्या जाण्याने स्वाभिमानीचा टवकाही उडला नाही म्हणणाºयांना खिंडार पडल्याचा टोलाही यावेळी खोत यांनी लगावला. वेगवेगळे आरोप करून माझ्यामुळेच शेतकºयांचा प्रश्न निर्माण झाल्याची टीका होत आहे. पण ३२ वर्षे घरावर तुळशीपत्र ठेवून फक्त शेतकºयांसाठी लढलो असून, त्यासाठी कोणी निष्ठेचे सर्टिफिकेट देण्याची गरज नाही. जनतेने राजीनामा मागितल्यास हजारवेळा राजीनामा देईन, पण मी गड सोडून पळणारा नव्हे, तर लढणारा कार्यकर्ता आहे. माझा राजीनामा मागण्याचा हक्क केवळ शेतकºयाला असून, कोणीतरी सांगतो म्हणून मी राजीनामा देणार नाही.देशात सरासरी २३५ ते २४५ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होणार आहे. मात्र, गरज २५० ते २६० लाख मेट्रिक टन इतकी आहे. गरजेपेक्षा कमी उत्पादन होणार असल्याने साखरेचे दर स्थिर राहणार आहेत. शिवाय एफआरपीनुसार ९.५ टक्के साखर उताºयासाठी २५५०, १२ टक्क्याला ३२२० आणि १३ टक्क्याला ३४८६ असा कायद्यानुसार दर कारखानदारांना द्यावाच लागणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात सरासरी १२.५० टक्के साखर उताºयामुळे ३४०० रु.चा पहिला हप्ता निश्चित मिळणार आहे. तरीही एफआरपी आणि अधिक ३०० रुपये असा दर कारखानदारांनी द्यावा, असे आवाहनही केले. तसेच साखरेचा भाव वाढला तर रंगराजन शिफारशीनुसार ७०:३० हा फॉर्म्युला वापरायचा असेही त्यांनी स्पष्ट केले. मी सत्तेत असलो तरी शेतकºयांचे प्रश्न सरकार ऐकत नसेल, तर आंदोलनासाठी बलिदानाची तयारी ठेवा, असे आवाहन खोत यांनी केले.स्वागत मोहन माने यांनी तर प्रास्ताविक इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी केले. याप्रसंगी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सुरेश पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, अशोक स्वामी, सागर खोत, सतीश वुरुलकर, संघटनेचे युवाध्यक्ष शार्दुल जाधव आदींची भाषणे झाली. मेळाव्यास महाराष्ट्र, कोकण, खानदेश, कर्नाटक, आदी भागातून शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.शेतकºयांची दिवाळी गोड होणारसरसकट कर्जमाफीचा ५० लाख शेतकºयांना लाभ मिळणार असून, त्यांची दिवाळी गोड होणार आहे. तसेच २०१८ पर्यंत नियमित कर्जाची परतफेड करणाºयांनाही कर्जमाफी मिळणार आहे.पवार शेट्टी एक गट्टीबारामतीत जाऊन ज्या पवारांना नावे ठेऊन तुम्ही खासदार झालात, आता त्यांचे गुणगान तुम्ही गात गळ्यात गळे घालून फिरत आहात, असा आरोप खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता केला.प्रत्येक जिल्ह्यात वेगळीच गट्टीआम्हाला एकनिष्ठ नाही म्हणणाºयांनी प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या पक्षाबरोबर युती केली आहे. सत्तेसाठी सगळे चालतात मग सदाभाऊ का नाही चालला, असा सवालही खोत यांनी केला.वजनकाट्यांची तपासणी करणारराज्यातील अनेक साखर कारखाने काटा मारत असल्याच्या तक्रारी नियमित होत असतात. त्यामुळे यंदा मंत्री गिरीष महाजन यांना सांगून राज्यातील सर्व कारखान्यांच्या काट्यांवर छापे मारून अचानकपणे त्यांची तपासणी करणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.मोबाईल अ‍ॅपचे लोकार्पणसंघटनेच्यावतीने शेतकºयांसाठी एक मोबाईल अ‍ॅप तयार केले असून, त्याला अँड्राईड मोबाईलवर सक्रिय केल्यास शेतकºयांना हवामानाचा अंदाज व बाजारभाव यासह आवश्यक माहिती, तसेच राज्य कृषिमंत्री यांच्यासह प्रमुख पदाधिकाºयांचे दूरध्वनी क्रमांक मिळणार आहेत. या अ‍ॅपचे लोकार्पणही या कार्यक्रमात मंत्री खोत यांच्या हस्ते केले.