शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पहिली ते चौथीच्या मुलांना हवी शाळा, कोरोनामुळे पालकांची ना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : पहिल्यांदा इयत्ता नववी ते बारावी आणि त्यानंतर इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. ...

लोकमत न्यूज नेटवर्क,

कोल्हापूर : पहिल्यांदा इयत्ता नववी ते बारावी आणि त्यानंतर इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. शासन नियमांचे पालन करत शाळा भरल्या आहेत. त्यामुळे इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांना देखील शाळेत जाण्याचे वेध लागले आहेत. शाळेत जाण्यासाठी ते पालकांकडे हट्ट करीत आहेत. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती असल्याने पालक त्यांना नकार देत आहेत.

कोरोनामुळे गेल्या मार्चपासून शाळा बंद झाल्या. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नोव्हेंबरमध्ये नववी ते बारावी, तर जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात पाचवी ते आठवी आणि गेल्या दोन आठवड्यापूर्वी महाविद्यालयांमधील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वर्ग ऑफलाईन पध्दतीने भरले. जूनपासून इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि व्हिडीओच्या माध्यमातून शिक्षण सुरू आहे. अकरा महिन्यांपासून या पध्दतीने शिक्षण सुरू असल्याने संबंधित विद्यार्थी कंटाळले आहेत. शाळेत जाण्यासाठी ते पालकांकडे हट्ट करीत आहेत. या विद्यार्थ्यांना शाळा हवी आहे. कोरोनामुळे पालक त्यांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत.

चौकट

जूनमध्ये वर्ग भरण्याची शक्यता

इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत वर्ग सध्या भरत असले, तरी त्यांच्या उपस्थितीचे प्रमाण ५० टक्के आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची स्थिती पाहता, इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची शाळा ऑनलाईन सुरू ठेवण्याचा निर्णय शाळांनी घेतला आहे. या इयत्तांचे वर्ग जूनपासूनच भरण्याची शक्यता आहे.

मुलांना हवी शाळा

घरातच अभ्यास करून आणि खेळून कंटाळा आला आहे. इतरांप्रमाणे मलाही शाळेत जायचे आहे.

- प्राची गिरी, पहिली, उजळाईवाडी.

मलाही शाळेत जायचे आहे. माझ्या मित्रांना भेटायचे आहे. ते आई-बाबांना मी सांगितले आहे.

- राजवीर द्राक्षे, दुसरी, शिवाजी पार्क

पाचवी, सहावीचे दादा, दीदी शाळेत जात आहेत. त्यांना पाहून मलाही शाळेत जावेसे वाटत आहे. पण, कोरोनाचीही भीती वाटत आहे.

- अक्षरा जाधव, तिसरी, पाचगाव.

वर्गात शिक्षण ज्या पध्दतीने समजावून शिकवितात, त्याप्रमाणे ऑनलाईन शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे शाळा सुरू व्हावी असे मला वाटते.

- विरेन जाधव, चौथी, शाहू मिल कॉलनी.

पालकांना चिंता?

कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. त्यामुळे मुलांना शाळेत पाठविण्याची भीती वाटत आहे.

- धनश्री निकम, शाहूपुरी.

सोशल डिस्टन्सिंगचे पालन लहान मुलांना करता येणार नाही. त्यामुळे पहिली ते चौथीचे वर्ग सध्या सुरू करू नयेत.

- सागर पंतोजी, उजळाईवाडी.

कोरोनाची सध्याची स्थिती पाहता, पुन्हा या लहान मुलांच्या जिवाशी खेळण्यात अर्थ नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे कमी झाल्यानंतर वर्ग भरवावेत.

- संज्योत जिरगे, आर. के. नगर.

पाचवी, आठवीनंतर पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची शाळा सुरू व्हावी असे वाटत होते. मात्र, कोरोना पुन्हा वाढत असल्याने थोडा वेळा थांबावे, असे पालक म्हणून वाटते.

- अनुराधा वातकर, उचगाव

आकडेवारी दृष्टिक्षेपात...

पहिली ते चौथीच्या एकूण शाळा : १९७७

एकूण विद्यार्थी संख्या : ११४४०९

मुलांची संख्या : ५७८६३

मुलींची संख्या : ५६५४६