शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

पहिली ते चौथीच्या मुलांना हवी शाळा, कोरोनामुळे पालकांची ना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : पहिल्यांदा इयत्ता नववी ते बारावी आणि त्यानंतर इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. ...

लोकमत न्यूज नेटवर्क,

कोल्हापूर : पहिल्यांदा इयत्ता नववी ते बारावी आणि त्यानंतर इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. शासन नियमांचे पालन करत शाळा भरल्या आहेत. त्यामुळे इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांना देखील शाळेत जाण्याचे वेध लागले आहेत. शाळेत जाण्यासाठी ते पालकांकडे हट्ट करीत आहेत. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती असल्याने पालक त्यांना नकार देत आहेत.

कोरोनामुळे गेल्या मार्चपासून शाळा बंद झाल्या. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नोव्हेंबरमध्ये नववी ते बारावी, तर जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात पाचवी ते आठवी आणि गेल्या दोन आठवड्यापूर्वी महाविद्यालयांमधील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वर्ग ऑफलाईन पध्दतीने भरले. जूनपासून इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि व्हिडीओच्या माध्यमातून शिक्षण सुरू आहे. अकरा महिन्यांपासून या पध्दतीने शिक्षण सुरू असल्याने संबंधित विद्यार्थी कंटाळले आहेत. शाळेत जाण्यासाठी ते पालकांकडे हट्ट करीत आहेत. या विद्यार्थ्यांना शाळा हवी आहे. कोरोनामुळे पालक त्यांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत.

चौकट

जूनमध्ये वर्ग भरण्याची शक्यता

इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत वर्ग सध्या भरत असले, तरी त्यांच्या उपस्थितीचे प्रमाण ५० टक्के आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची स्थिती पाहता, इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची शाळा ऑनलाईन सुरू ठेवण्याचा निर्णय शाळांनी घेतला आहे. या इयत्तांचे वर्ग जूनपासूनच भरण्याची शक्यता आहे.

मुलांना हवी शाळा

घरातच अभ्यास करून आणि खेळून कंटाळा आला आहे. इतरांप्रमाणे मलाही शाळेत जायचे आहे.

- प्राची गिरी, पहिली, उजळाईवाडी.

मलाही शाळेत जायचे आहे. माझ्या मित्रांना भेटायचे आहे. ते आई-बाबांना मी सांगितले आहे.

- राजवीर द्राक्षे, दुसरी, शिवाजी पार्क

पाचवी, सहावीचे दादा, दीदी शाळेत जात आहेत. त्यांना पाहून मलाही शाळेत जावेसे वाटत आहे. पण, कोरोनाचीही भीती वाटत आहे.

- अक्षरा जाधव, तिसरी, पाचगाव.

वर्गात शिक्षण ज्या पध्दतीने समजावून शिकवितात, त्याप्रमाणे ऑनलाईन शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे शाळा सुरू व्हावी असे मला वाटते.

- विरेन जाधव, चौथी, शाहू मिल कॉलनी.

पालकांना चिंता?

कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. त्यामुळे मुलांना शाळेत पाठविण्याची भीती वाटत आहे.

- धनश्री निकम, शाहूपुरी.

सोशल डिस्टन्सिंगचे पालन लहान मुलांना करता येणार नाही. त्यामुळे पहिली ते चौथीचे वर्ग सध्या सुरू करू नयेत.

- सागर पंतोजी, उजळाईवाडी.

कोरोनाची सध्याची स्थिती पाहता, पुन्हा या लहान मुलांच्या जिवाशी खेळण्यात अर्थ नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे कमी झाल्यानंतर वर्ग भरवावेत.

- संज्योत जिरगे, आर. के. नगर.

पाचवी, आठवीनंतर पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची शाळा सुरू व्हावी असे वाटत होते. मात्र, कोरोना पुन्हा वाढत असल्याने थोडा वेळा थांबावे, असे पालक म्हणून वाटते.

- अनुराधा वातकर, उचगाव

आकडेवारी दृष्टिक्षेपात...

पहिली ते चौथीच्या एकूण शाळा : १९७७

एकूण विद्यार्थी संख्या : ११४४०९

मुलांची संख्या : ५७८६३

मुलींची संख्या : ५६५४६