शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
2
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
3
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
6
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
7
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
8
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
9
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
10
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
11
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
12
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
13
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
14
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
15
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
16
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
17
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
18
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
19
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
20
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?

पहिल्या दिवशी १२५ विद्यार्थ्यांना मिळाले वसतिगृहातील साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 12:16 IST

शिवाजी विद्यापीठाने वसतिगृहातील विद्यार्थ्यांना त्यांचे साहित्य परत देण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू केली. पहिल्या दिवशी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील सुमारे १२५ विद्यार्थ्यांना साहित्य वितरीत केले. शनिवार (दि. १९)पर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे.

ठळक मुद्देपहिल्या दिवशी १२५ विद्यार्थ्यांना मिळाले वसतिगृहातील साहित्यशिवाजी विद्यापीठाकडून वितरणाची प्रक्रिया सुरू : शनिवारपर्यंत मुदत

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाने वसतिगृहातील विद्यार्थ्यांना त्यांचे साहित्य परत देण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू केली. पहिल्या दिवशी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील सुमारे १२५ विद्यार्थ्यांना साहित्य वितरीत केले. शनिवार (दि. १९)पर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे.

कोरोनामुळे विद्यापीठाच्या वसतिगृहातील सर्व विद्यार्थी हे आपापल्या गावी गेले होते. मात्र, त्यांनी वसतिगृहातील पुस्तके, नोट‌्स, आदी साहित्य नेले नव्हते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने विद्यापीठातील मुलांची आणि तंत्रज्ञान अधिविभागातील सर्व वसतिगृहे ही संस्थात्मक अलगीकरण आणि कोरोना रुग्णांच्या व्यवस्थेसाठी ताब्यात घेतली. त्यामुळे विद्यापीठाने प्रशासनाने या विद्यार्थ्यांचे साहित्य संकलित करून ते वसतिगृहातील काही खोल्यांमध्ये ठेवले होते.

मात्र, आता अंतिम सत्राच्या परीक्षा होणार असल्याने आणि प्रथम, द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वसतिगृहातील साहित्याची आवश्यकता आहे. ते लक्षात घेऊन विद्यापीठ प्रशासनाने या विद्यार्थ्यांना साहित्य परत देण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक दक्षता घेऊन ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

वसतिगृहातील एकूण ६५० विद्यार्थ्यांना त्यांचे साहित्य परत दिले जाणार आहे. ही प्रक्रिया शनिवार (दि. १९)पर्यंत चालणार आहे. ज्या विद्यार्थ्याना या मुदतीत विद्यापीठात येणे शक्य होणार नाही, त्यांचे साहित्य एकत्रित ठेवण्यात येईल.- एस. डी. डेळेकर, मुख्य अधीक्षक, वसतिगृह

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याShivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर