शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कचऱ्याला लागलेली आग घरापार्यंत आल्याने साहित्य जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 21:34 IST

मोरेवाडी ग्रामपंचायतीमार्फत गोळा होणार कचरा भारती विद्यापीठ जवळ असणाऱ्या माळरानावर टाकण्यात येतो अनेक वर्षांपासून येथे पडलेला कचरा नेहमीच धुमसत असतो . रात्री अपरात्री जीव मुठीत धरूनच राहावे लागते,अनेकवेळा संबंधित प्रशासनाकडे तक्रारी करून देखील येथील नागरिकांची दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे,

ठळक मुद्देमोरेवाडीच्या माळावर

पाचगाव  :  मोरेवाडी ता करवीर येथील माळावर भारती विद्यापीठाच्या बाजूला टाकलेल्या कचऱ्याला आग लागल्याने बेघर वसाहतीतील एका  घरातील साहित्य जाळून खाक झाले,अचानक मंगळवारी दुपारी आग लागल्याने वकच हाहाकार उडाला व आग रस्त्या शेजारील घरापर्यंत आली तसेच संगीता पुईगडे यांच्या घराच्या पाठीमागे ठेवलेले सामान जाळून खाक झाले त्यामुळे येथील रहिवाशी भयभीत झाले, तात्काळ अग्निशमन दलाला कळवून अग्निशामनाची गाडी मागवून आग आटोक्यात आणली,आग लागताच  लोकांनी प्रसंगावधान राखल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

मोरेवाडी ग्रामपंचायतीमार्फत गोळा होणार कचरा भारती विद्यापीठ जवळ असणाऱ्या माळरानावर टाकण्यात येतो अनेक वर्षांपासून येथे पडलेला कचरा नेहमीच धुमसत असतो व  याठिकाणी धुराचे साम्राज्य पसरलेले असते,याअगोदर देखील आग लागल्याने येथील रहिवाशांचे नुकसान झाले आहे, रात्री अपरात्री जीव मुठीत धरूनच राहावे लागते,अनेकवेळा संबंधित प्रशासनाकडे तक्रारी करून देखील येथील नागरिकांची दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे,संबंधित प्रशासनाकडे याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे असल्याचे मत येथील नागरिकांनी व्यक्त केले.                    

 

    रोजंदारीवरच आमचा उदरनिर्वाह चालू आहे त्यात घरी कोणी पुरुष मंडळी नसल्याने सर्व जबाबदारी माझ्यावरच आहे,घराची पडझड झल्याने शेड मारण्यासाठी गोळा केलेले साहित्य या आगीत भस्मसात झाले आहे,या अगोदर दोन वेळा असे प्रकार घडल्यानंतर संबंधित प्रशासनाला याची कल्पना दिली होती तरीसुद्धा अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही, तसेच याठिकाणी मृत जनावरे व मेलेली कुत्री आणून टाकल्याने नेहमी दुर्घदी पसरलेली असते,रात्री अपरात्री आग लागण्याची शक्यता असल्याने जीव मुठीत धरूनच राहावे लागते,   

 संगीता उत्तम पुईगडे ,रहिवाशी,बेघर वसाहत.

    

येथील कचरा विघटन करण्याचा मोठा प्रश्न असून आम्ही अनेकवेळा संबंधित प्रशासनाकडे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी खड्डा मारण्याची परवानगी मागितली आहे व त्याचा वेळोवेळी पाठपुरावा केला आहे परंतु शासनाचे याकडे दुर्लक्ष होत असून आशा समस्यांना येथील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे,याची शासनाने तातडीने दखल घ्यावी.

  अमर मोरे  , माजी सरपंच मोरेवाडी व विद्यमान सदस्य,        

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायत