शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
5
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
6
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
7
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
8
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
10
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
11
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
12
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
13
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
14
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
15
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
16
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
17
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
18
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
19
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
20
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल

...अखेर बेनिक्रेच्या कोरड्या तलावात अवतरली ‘वेदगंगा’

By admin | Updated: January 22, 2016 00:53 IST

चाचणी यशस्वी : २९ जानेवारीला पाणी पूजन, ग्रामस्थांच्या डोळ्यांची तृप्तता; सुमारे अडीच हजार एकरांहून अधिक क्षेत्र येणार ओलिताखाली

दत्तात्रय पाटील -- म्हाकवे  --शेतीसाठी लांबच; पिण्याच्या पाण्याचेही दुर्भीक्ष्य असणाऱ्या आणि धार्मिक पूजेसाठी उसाचे कांडेही वेदगंगा नदीकाठावरील गावांतून आणावे लागणाऱ्या बेनिक्रे (ता. कागल) येथील ग्रामस्थांनी एकजुटीने सुरपली येथील वेदगंगा नदीतून पाणी योजनेचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविले. यासाठी शेतकऱ्यांनीच कर्जाचा डोंगर पेलून येणऱ्या संकटांनाही खंबीरपणे सामोरे जात ही योजना यशस्वी केली.या पाणी योजनेचे पाणी पूजन २९ जानेवारीला होणार असले तरी दोन दिवसांपूर्वी प्रत्यक्ष पाणी चाचणी घेण्यात आली. या चाचणीवेळी कोणतीही तक्रार उद्भवली नसून, सुमारे सव्वा तास पडणाऱ्या या योजनेच्या पाण्याकडे पाहून ग्रामस्थांच्या डोळ्यांची तृप्तता झाली.बेनिक्रेकरांची तहान भागविण्याच्या दृष्टीने १९८५ मध्ये ६४ दशलक्ष घनफूट क्षमतेचा प्रकल्प झाला. विशेष म्हणजे या प्रकल्पाच्या दोन्ही बाजूने डाव्या व उजव्या कालव्याची खुदाईही करण्यात आली. मात्र, या भागात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरतच नव्हता. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होत होता. उभी पिके पाण्याअभावी वाळली तर शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत होते.त्यामुळे येथील ४५० शेतकऱ्यांनी बारमाही वाहणाऱ्या गावच्या उत्तरेकडील दिशेला डोंगरापलीकडून वाहणाऱ्या वेदगंगा नदीतून पाणी योजना करण्याचा मनोदय केला. या स्वप्नपूर्तीसाठी २०१३ मध्ये या शेतकऱ्यांनी आपले सातबारा गहाण देऊन बँक आॅफ इंडियाकडून सुमारे सव्वातीन कोटींचे कर्ज घेतले. यातून सुरुपलीजवळील नागरिकांपासून काम सुरू झाले.मात्र, बेनिक्रेच्या हद्दीत असणाऱ्या केंद्रीय वनविभागाने खुदाईला परवानगी देण्यास वर्षभराचा विलंब लावला. तरीही या शेतकऱ्यांनी आस सोडली नाही. जोतिर्लिंग पाणीपुरवठा संस्थेच्या माध्यमातून वनविभागाच्या परवानगीसाठी नागपूर येथील कार्यालयाकडे पाठपुरावा केला. त्यानुसार गत महिन्यात वनविभागानेही खुदाईला परवानगी दिली आणि अखेर ही योजना पूर्ण करण्यात शेतकऱ्यांना यश आले. यामध्ये अत्यंत काटकसरीने पाण्याचा वापर करून व्यवस्थापनात राज्यात दुसरा क्रमांक पटकावून पाच लाखांचे पारितोषिक पटकाविणाऱ्या जोतिर्लिंग संस्थेचेही मोठे योगदान आहे.दरम्यान, या योजनेमुळे येथील सुमारे अडीच हजार एकरांहून अधिक क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तसेच शुक्रवारी (दि. २९) ग्रामस्थ विधिवतपणे या पाण्याचे पूजन करून ग्रामदैवतांना सवाद्य पाणी घालणार आहेत.योजना अडीच वर्षे रेंगाळल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा भार वाढत होता. चाचणी यशस्वी झाल्याने दडपण मुक्त झालो आहे.-आण्णासाहेब वाडकरअध्यक्ष, जोतिर्लिंग पाणी वापर संस्थाबेनिक्रेतील शेतीला आता यापुढे शाश्वत पाणी मिळणार आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांसह त्यांच्या पुढच्या पिढीला रोजगारासाठी स्थलांतरित व्हावे लागणार नाही. - बाळासो मगदूम, मारुती जाधव, शेतकरी, बेनिक्रेही पाणी योजना शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडविणारी आहे. तसेच महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी वणवण ही आपोआप थांबणार आहे. - सरिता चौगुले, उपसरपंच, बेनिक्रे