शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

अंतिम सत्राची परीक्षा १३ मार्चपर्यंत झालेल्या अभ्यासक्रमावर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 13:35 IST

अंतिम सत्राच्या नियमित, पुन:परीक्षार्थी, अनुशेषित (बॅकलॉग) विद्यार्थ्यांच्या परीक्षा दि. १३ मार्चपर्यंत पूर्ण झालेल्या अभ्यासक्रमावर होणार आहेत. या परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) असतील. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने होणाऱ्या परीक्षांसाठी छायांकित प्रत आणि पुनर्मूल्यांकनाची सुविधा मिळणार नाही. त्याबाबतचा निर्णय शिवाजी विद्यापीठाने घेतला आहे.

ठळक मुद्देअंतिम सत्राची परीक्षा १३ मार्चपर्यंत झालेल्या अभ्यासक्रमावर होणारशिवाजी विद्यापीठाचा निर्णय : पुनर्मूल्यांकनाची सुविधा नाही

कोल्हापूर : अंतिम सत्राच्या नियमित, पुन:परीक्षार्थी, अनुशेषित (बॅकलॉग) विद्यार्थ्यांच्या परीक्षा दि. १३ मार्चपर्यंत पूर्ण झालेल्या अभ्यासक्रमावर होणार आहेत. या परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) असतील. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने होणाऱ्या परीक्षांसाठी छायांकित प्रत आणि पुनर्मूल्यांकनाची सुविधा मिळणार नाही. त्याबाबतचा निर्णय शिवाजी विद्यापीठाने घेतला आहे.अंतिम पूर्व वर्ष अथवा सत्राच्या पुन:परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या परीक्षा या संपूर्ण १०० टक्के अभ्यासक्रमावर होणार आहेत. त्यांचे स्वरूपही एमसीक्यू असणार आहे. परीक्षा देण्यासाठी जे विद्यार्थी ऑफलाईनचा पर्याय निवडतील, त्यांच्यासाठी ओएमआर शीटचा वापर करून महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्थांमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहेत.

ऑनलाईन परीक्षेत काही तांत्रिक कारणाने खंड पडल्यास तेवढाच कालावधी संबंधित विद्यार्थ्याला संगणक प्रणालीमार्फत आपोआप वाढवून दिला जाईल. यापूर्वी सोडविलेली उत्तरे ही आपोआप सेव्ह होऊन खंड पडला तेथून परीक्षा पुन्हा सुरू होईल. पी. जी. डिप्लोमा, डिप्लोमा सर्टिफिकेट पद्धतीच्या अंतिम वर्ष आणि सत्राच्या परीक्षा या विद्यापीठाच्या प्रणालीमधून घेण्यात येतील, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी बुधवारी दिली.विद्यार्थ्यांनी निकालाची खातरजमा करावीविद्यापीठ अनुदान आयोग व महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचे परीक्षा अर्ज सादर केलेले आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांचे अंतिम वर्ष अथवा अंतिम सत्र वगळता निकाल जाहीर करण्यात येत आहेत. हे निकाल जाहीर करताना, विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने पारित केलेल्या निर्णयानुसार या कार्यवाहीबाबतचे अध्यादेश पारित करण्यात आले असल्याची माहिती पळसे यांनी दिली.

चुकीच्या निकषाने पदवीचे हजारो विद्यार्थी अनुत्तीर्ण हे वृत्त लोकमतच्या मंगळवारच्या अंकात प्रसिद्ध झाले होते. त्यात प्रथम, द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या जाहीर झालेल्या निकालीतील त्रुटी मांडल्या होत्या. त्यावर परीक्षा व मूल्यमापन मंडळाने बुधवार खुलासा केला आहे. त्यामध्ये परीक्षा विभागाकडून राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार निकाल जाहीर केले आहेत. या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी आपले जाहीर झालेले निकाल तपासावेत. या संदर्भात अधिक माहिती आवश्यक असल्यास महाविद्यालय स्तरावर दाखवून त्याची खातरजमा करावी, असे म्हटले आहे. 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर