शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
2
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
3
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
4
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
5
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
6
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
7
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
8
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
9
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
10
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
11
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
12
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
13
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
14
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
15
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
16
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
17
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!
18
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
19
रोकड, सोनंनाणं आणि..., निवृत्त अबकारी अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड    
20
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला धन्वंतरीची आणि लक्ष्मीची पुजा करण्यामागे आहे पौराणिक कारण!

अंतिम सत्राची परीक्षा १३ मार्चपर्यंत झालेल्या अभ्यासक्रमावर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 13:35 IST

अंतिम सत्राच्या नियमित, पुन:परीक्षार्थी, अनुशेषित (बॅकलॉग) विद्यार्थ्यांच्या परीक्षा दि. १३ मार्चपर्यंत पूर्ण झालेल्या अभ्यासक्रमावर होणार आहेत. या परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) असतील. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने होणाऱ्या परीक्षांसाठी छायांकित प्रत आणि पुनर्मूल्यांकनाची सुविधा मिळणार नाही. त्याबाबतचा निर्णय शिवाजी विद्यापीठाने घेतला आहे.

ठळक मुद्देअंतिम सत्राची परीक्षा १३ मार्चपर्यंत झालेल्या अभ्यासक्रमावर होणारशिवाजी विद्यापीठाचा निर्णय : पुनर्मूल्यांकनाची सुविधा नाही

कोल्हापूर : अंतिम सत्राच्या नियमित, पुन:परीक्षार्थी, अनुशेषित (बॅकलॉग) विद्यार्थ्यांच्या परीक्षा दि. १३ मार्चपर्यंत पूर्ण झालेल्या अभ्यासक्रमावर होणार आहेत. या परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) असतील. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने होणाऱ्या परीक्षांसाठी छायांकित प्रत आणि पुनर्मूल्यांकनाची सुविधा मिळणार नाही. त्याबाबतचा निर्णय शिवाजी विद्यापीठाने घेतला आहे.अंतिम पूर्व वर्ष अथवा सत्राच्या पुन:परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या परीक्षा या संपूर्ण १०० टक्के अभ्यासक्रमावर होणार आहेत. त्यांचे स्वरूपही एमसीक्यू असणार आहे. परीक्षा देण्यासाठी जे विद्यार्थी ऑफलाईनचा पर्याय निवडतील, त्यांच्यासाठी ओएमआर शीटचा वापर करून महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्थांमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहेत.

ऑनलाईन परीक्षेत काही तांत्रिक कारणाने खंड पडल्यास तेवढाच कालावधी संबंधित विद्यार्थ्याला संगणक प्रणालीमार्फत आपोआप वाढवून दिला जाईल. यापूर्वी सोडविलेली उत्तरे ही आपोआप सेव्ह होऊन खंड पडला तेथून परीक्षा पुन्हा सुरू होईल. पी. जी. डिप्लोमा, डिप्लोमा सर्टिफिकेट पद्धतीच्या अंतिम वर्ष आणि सत्राच्या परीक्षा या विद्यापीठाच्या प्रणालीमधून घेण्यात येतील, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी बुधवारी दिली.विद्यार्थ्यांनी निकालाची खातरजमा करावीविद्यापीठ अनुदान आयोग व महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचे परीक्षा अर्ज सादर केलेले आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांचे अंतिम वर्ष अथवा अंतिम सत्र वगळता निकाल जाहीर करण्यात येत आहेत. हे निकाल जाहीर करताना, विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने पारित केलेल्या निर्णयानुसार या कार्यवाहीबाबतचे अध्यादेश पारित करण्यात आले असल्याची माहिती पळसे यांनी दिली.

चुकीच्या निकषाने पदवीचे हजारो विद्यार्थी अनुत्तीर्ण हे वृत्त लोकमतच्या मंगळवारच्या अंकात प्रसिद्ध झाले होते. त्यात प्रथम, द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या जाहीर झालेल्या निकालीतील त्रुटी मांडल्या होत्या. त्यावर परीक्षा व मूल्यमापन मंडळाने बुधवार खुलासा केला आहे. त्यामध्ये परीक्षा विभागाकडून राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार निकाल जाहीर केले आहेत. या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी आपले जाहीर झालेले निकाल तपासावेत. या संदर्भात अधिक माहिती आवश्यक असल्यास महाविद्यालय स्तरावर दाखवून त्याची खातरजमा करावी, असे म्हटले आहे. 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर