शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
अंत्यसंस्काराच्या दिवशी कापला केक; चितेवर ठेवण्यापूर्वी वडिलांनी साजरा केला मुलीचा वाढदिवस
3
स्वतःवर गोळी झाडणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याची IAS पत्नी आली समोर; एफआयआर दाखल, कुणावर केले आरोप?
4
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
5
"भाई, ती मुलगी नाही...एक पंजा अन्...!"; थेट वाघोसोबतच 'लिप लॉक' करताना दिसला तरुण, Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल
6
घरबसल्या महिन्याला ₹९२५० ची कमाई करुन देणारी पोस्टाची स्कीम! पण एक चूक पडेल भारी, बसू शकतो ३० हजारांचा फटका
7
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
8
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
9
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
10
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
11
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
12
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
13
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
14
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
15
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
16
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
17
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
18
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
19
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
20
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन

खंडपीठाकडून तारखा मिळताच अंतिम सुनावणी

By admin | Updated: July 18, 2014 01:00 IST

टोल प्रश्न : कृती समितीची विनंती मान्य

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील टोलवसुलीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे कोल्हापुरातील टोल हा तत्काळ निकाली काढण्याचा मुद्दा असल्याचे गृहीत धरून अंतिम निकाल द्यावा, अशी उच्च न्यायालयास टोलविरोधी कृती समितीच्यावतीने अ‍ॅड. युवराज नरवणकर यांनी आज, गुरुवारी केलेली विनंती न्यायमूर्ती एस. जे. वजीबदार व ए. एन. मेनन यांनी मान्य केली. न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्या खंडपीठाकडून पुढील सुनावणीच्या तारखा मिळताच टोलप्रश्नी अंतिम सुनावणी सुरू हाईल, अशी माहिती नरवणकर यांनी ‘लोकमत’ला दिली.सर्वोच्च न्यायालयाने टोलसंदर्भात ३१ जुलैपर्यंत अंतिम निर्णय घेण्याची सूचना मुंबई उच्च न्यायालयास केली आहे. कृती समितीचे वकील युवराज नरवणकर यांनी १० जूनला एका अर्जाद्वारे उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे तारीख निश्चित करावी म्हणून केलेल्या विनंती अर्जानुसार आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. सध्या शहरात सुरळीत टोलवसुली सुरू आहे. न्यायालयाने सध्या वसुलीस स्थगिती दिली अन् त्यानंतर टोलचा निकाल आयआरबीच्या बाजूने लागल्यास कंपनीचे टोलवसुली बंद काळात मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. हा प्रश्न अत्यंत तातडीने सोडविण्याचा विषय नसल्याने न्यायालयाने सवडीप्रमाणे सुनावणी घ्यावी. सर्वाेच्च न्यायालयास त्याप्रमाणे विनंती करावी, असा युुक्तिवाद आयआरबीच्या विधी तज्ज्ञांनी न्यायालयात केला.टोलवसुली बंद राहिल्यास करारानुसार कंपनीला वाढीव वेळ देण्यात येणार आहे. मात्र, आयआरबी हा निकाल जिंक ण्याची शक्यता नाही. कंपनीच्या विरोधात निकाल लागल्यास लोकांच्या पैशाचे काय? तसेच शहरात टोलनाक्यावर पोलीस तैनात आहे. कायदा व सुव्यवस्थेचा कधीही प्रश्न निर्माण होऊ शकतो. यामुळे टोलबाबत त्वरित निकाल द्यावा, असा युक्तिवाद अ‍ॅड. युवराज नरवणकर यांनी केला.टोलवसुली बंद राहिल्यास शासनाकडून कंपनी दंडासह वसूल करू शकेल. मात्र, वाहनधारकांचे पैसे परत करता येण्याची तरतूद नाही. यामुळे हा प्रश्न त्वरित निकाली काढण्यासाठी नरेश पाटील यांच्या बेंचकडून पुढील तारखा मागून घ्या, अशी स्पष्ट सूचना न्यायालयाने केली. (प्रतिनिधी)