शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू परिवाराच्या अडचणीत वाढ! 'जमिनीच्या बदल्यात नोकरी' प्रकरणात दिल्ली कोर्टाकडून दोषारोप निश्चित; आता खटला चालणार
2
सरेंडर व्हायला किती वेळ लागतो? मैत्री एका बाजूला म्हणत राज ठाकरेंचा फडणवीस-शिंदेंवर घणाघाती प्रहार
3
'मोदींनी ट्रम्प यांना फोनच केला नाही,आता अमेरिका...'; व्यापार करारावर अमेरिकेच्या मंत्र्यांचा खळबळजनक दावा
4
एसबीआय, बँक ऑफ इंडिया की बँक ऑफ बडोदा... सर्वात स्वस्त Home Loan कोण देतंय? ६० लाखांवर किती ईएमआय?
5
"इराण एक महान देश...!"; आता काय आहे ट्रम्प यांचा प्लॅन? नेमकं काय म्हणाले? मोठा खुलासा करत दिला थेट इशारा!
6
कोलकात्यात हायव्होल्टेज ड्रामा; ममता बॅनर्जींकडून ईडीविरोधात FIR वर FIR; प्रकरण कोर्टात पोहोचले...
7
"आधी गोळ्या घालू मग प्रश्न विचारू"; ट्रम्प यांच्या लष्करी धमकीला 'या' देशाने दिलं सडेतोड उत्तर
8
तेलंगणा, पंजाबमध्ये बॅलेट पेपरवर मतदान झाले, तिथे भाजप चौथ्या, सातव्या नंबरवर फेकला गेला : राज ठाकरे
9
'या' ६ सरकारी स्कीम्समध्ये मिळतो लाखोंचा लाभ, प्रीमिअम ₹१०० पेक्षाही कमी; गरीब असो वा श्रीमंत सर्वच घेऊ शकतात फायदा
10
हॅलो, इसको भेज, उसको भेज...! पाकिस्तानने युपीआयपेक्षा फास्ट पेमेंट सिस्टीम शोधली; बोलताच पैसे ट्रान्सफर होणार
11
Lokmat Exclusive: ठाकरे मुंबई नक्कीच गमावतील, महापालिकांमध्ये निवडणुकोत्तर नवीन समीकरणे: CM देवेंद्र फडणवीस
12
१० जानेवारी: गुरु-आदित्य योग: तुमच्या आयुष्यातील अडचणी निवारणासाठी उत्तम योग; करा 'हा' उपाय 
13
व्हेनेझुएलाचं कच्चं तेल खरेदी करू शकते रिलायन्स इंडस्ट्रीज; का आणि कशी बदलली परिस्थिती?
14
क्रूरतेचा कळस! जेवण वाढायला उशीर झाला म्हणून पतीने पत्नीला संपवलं; मृतदेहापाशीच बसून राहिला अन्..
15
Stock Market Today: सततच्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला; Vodafone-Idea मध्ये ५% ची तेजी
16
"सगळ्या योजना आखल्या पण याची कधी अपेक्षाच केली नाही"; ठाकरे बंधुंच्या युतीवर राज ठाकरेंचा पलटवार
17
IT हब की नरकाचे द्वार? बेंगळुरूत पहाटे ३:३० वाजताही वाहतूक कोंडी सुटेना; दोन-दोन तास...
18
५ वर्षांचं अफेअर, ३ मुलं, पण इन्स्टावरील प्रेमासाठी घर सोडलं; पतीनेच स्वहस्ते लावून दिलं पत्नीचं दुसरं लग्न!
19
Crypto वर देखरेख ठेवणं कठीण! RBI नंतर आता आयकर विभागानंही हात वर केले, प्रकरण काय?
20
रिमांड संपली, पाप उघडं पडलं! बांगलादेश दिपू हत्या प्रकरणातील १८ जण कोठडीत; त्यांनी जे कारण सांगितलं..
Daily Top 2Weekly Top 5

‘कोल्हापूर ब्रँड’खाली कर्नाटकी गूळ विकणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 12:22 IST

शेतकऱ्याला गुळाच्या गुणवत्तेनुसारच पैसे मिळतील

कोल्हापूर : कर्नाटकातील गूळ येथे आणून तो ‘कोल्हापूर ब्रँड’खाली विकणाऱ्यांवर थेट फसवणुकीचे गुन्हे दाखल करा. त्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीला दिले. गुळाची गुणवत्ता तपासणारी यंत्रणा तातडीने उभा करा, म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला गुळाच्या गुणवत्तेनुसारच पैसे मिळतील. कर्नाटकातील गुळाला आत प्रवेशच द्यायचा नाही, असेही त्यांनी सांगितले.गुळाला किमान प्रति क्विंटल ३७०० रुपये भाव मिळाला पाहिजे, यासाठी मंगळवारपासून शेतकऱ्यांनी सौदेच काढू दिलेले नाहीत. गेली चार दिवस हा पेच निर्माण झाला होता, या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्हाधिकारी रेखावार यांनी शेतकरी व समिती प्रशासनाशी चर्चा केली. कर्नाटकातील समितीत येणारी आवक थांबवली तर गुळाच्या दरात वाढ होईल, यावर शेतकरी ठाम होते.व्यापाऱ्यांची बिले तपासली तरी गेल्या दोन महिन्यांत कर्नाटकातील गूळ येथे किती आला, हे उघड होईल. असे शेतकऱ्यांनी सांगितले. ही बाब गंभीर असून, बाहेरील गूळ कोल्हापुरी म्हणून कोणी विकत असेल तर त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा. त्याचबरोबर सोमवार (दि. २८) पासून भरारी पथकासह प्रवेशद्वारावरूनच बाहेरील गुळाला प्रवेश देऊ नका, अशी सूचना त्यांनी समिती प्रशासनाला दिली. यावेळी समितीचे प्रशासक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश जगताप, सचिव जयवंत पाटील, उपसचिव के. बी. पाटील व शेतकरी उपस्थित होते.

प्रयोगशाळेवरही मर्यादा....गुळाची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी समितीने प्रयोगशाळा तयार करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सुचवले. याबाबत त्यांनी गूळ संशोधन केंद्रातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. प्रयोगशाळा तयार केली तर त्याचा अहवाल तातडीने मिळत नसल्याने जागेवर दर निश्चित होणार नाही.

व्यापाऱ्यांच्या ‘जीभेवर’च विश्वासव्यापारी गुळाच्या रव्यावर चाकू मारून तो जीभेवर ठेवतात, मग दर जाहीर करतात. या पारंपरिक पद्धतीवर जिल्हाधिकाऱ्यांनी विचारले असता आमचा व्यापाऱ्यांवर विश्वास असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली शेतकऱ्यांची फिरकीकर्नाटकातून सध्या व्यापारीच गूळ आणत आहेत. मात्र, पुढे शेतकऱ्यांनीच गूळ आणून तो येथे विकू लागले तर तुम्ही रोखणार कसे? अशी फिरकी जिल्हाधिकारी रेखावार यांनी शेतकऱ्यांची घेतली.

भरारी पथकाची सूत्रे सूर्यवंशींच्या हाती द्यासमितीचे उपसचिव राहुल सूर्यवंशी हे आक्रमक असून, त्यांनी यापूर्वी अशा प्रकारांना चाप लावला होता. भरारी पथकाची सूत्रे त्यांच्यात हातात द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनीच जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी