शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
4
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
5
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
6
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
7
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
8
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
9
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
10
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
11
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
12
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
13
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
14
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
15
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
16
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
17
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
18
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
19
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
20
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!

‘कोल्हापूर ब्रँड’खाली कर्नाटकी गूळ विकणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 12:22 IST

शेतकऱ्याला गुळाच्या गुणवत्तेनुसारच पैसे मिळतील

कोल्हापूर : कर्नाटकातील गूळ येथे आणून तो ‘कोल्हापूर ब्रँड’खाली विकणाऱ्यांवर थेट फसवणुकीचे गुन्हे दाखल करा. त्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीला दिले. गुळाची गुणवत्ता तपासणारी यंत्रणा तातडीने उभा करा, म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला गुळाच्या गुणवत्तेनुसारच पैसे मिळतील. कर्नाटकातील गुळाला आत प्रवेशच द्यायचा नाही, असेही त्यांनी सांगितले.गुळाला किमान प्रति क्विंटल ३७०० रुपये भाव मिळाला पाहिजे, यासाठी मंगळवारपासून शेतकऱ्यांनी सौदेच काढू दिलेले नाहीत. गेली चार दिवस हा पेच निर्माण झाला होता, या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्हाधिकारी रेखावार यांनी शेतकरी व समिती प्रशासनाशी चर्चा केली. कर्नाटकातील समितीत येणारी आवक थांबवली तर गुळाच्या दरात वाढ होईल, यावर शेतकरी ठाम होते.व्यापाऱ्यांची बिले तपासली तरी गेल्या दोन महिन्यांत कर्नाटकातील गूळ येथे किती आला, हे उघड होईल. असे शेतकऱ्यांनी सांगितले. ही बाब गंभीर असून, बाहेरील गूळ कोल्हापुरी म्हणून कोणी विकत असेल तर त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा. त्याचबरोबर सोमवार (दि. २८) पासून भरारी पथकासह प्रवेशद्वारावरूनच बाहेरील गुळाला प्रवेश देऊ नका, अशी सूचना त्यांनी समिती प्रशासनाला दिली. यावेळी समितीचे प्रशासक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश जगताप, सचिव जयवंत पाटील, उपसचिव के. बी. पाटील व शेतकरी उपस्थित होते.

प्रयोगशाळेवरही मर्यादा....गुळाची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी समितीने प्रयोगशाळा तयार करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सुचवले. याबाबत त्यांनी गूळ संशोधन केंद्रातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. प्रयोगशाळा तयार केली तर त्याचा अहवाल तातडीने मिळत नसल्याने जागेवर दर निश्चित होणार नाही.

व्यापाऱ्यांच्या ‘जीभेवर’च विश्वासव्यापारी गुळाच्या रव्यावर चाकू मारून तो जीभेवर ठेवतात, मग दर जाहीर करतात. या पारंपरिक पद्धतीवर जिल्हाधिकाऱ्यांनी विचारले असता आमचा व्यापाऱ्यांवर विश्वास असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली शेतकऱ्यांची फिरकीकर्नाटकातून सध्या व्यापारीच गूळ आणत आहेत. मात्र, पुढे शेतकऱ्यांनीच गूळ आणून तो येथे विकू लागले तर तुम्ही रोखणार कसे? अशी फिरकी जिल्हाधिकारी रेखावार यांनी शेतकऱ्यांची घेतली.

भरारी पथकाची सूत्रे सूर्यवंशींच्या हाती द्यासमितीचे उपसचिव राहुल सूर्यवंशी हे आक्रमक असून, त्यांनी यापूर्वी अशा प्रकारांना चाप लावला होता. भरारी पथकाची सूत्रे त्यांच्यात हातात द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनीच जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी